देश-विदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

मुस्लीमांच्या दुकानातून माल घेऊ नका म्हणणार्‍या घैसास बाईंना हे कोणीतरी सांगितलं पाहिजे.

समाज माध्यमातून साभार

सूरज सामंतची पोस्ट वाचा. तुर्कस्थाननं भारताच्या विरोधात पाकिस्तानला उघड पाठिंबा दिलेला आहे. त्याच तुर्कस्थानच्या national career असलेल्या टर्कीश एअरलाईन सोबत भारताची सगळ्यात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोचा कोड शेअर व्यवसाय चालू आहे. दररोज तीसहून अधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणं या कोड शेअर खाली उडतात ज्याचा फार मोठा फायदा टर्कीश एअरलाईन काहीही न करता फक्त नाव वापरू देण्यासाठी साठी करते. इस्तंबूलचं लोकेशन स्ट्रॅटेजिक आहे.एकीकडे आशिया, दुसरी कडे रशिया, तिसरीकडे युरोप आणि चौथीकडे आखात याच्या मध्यभागी इस्तंबूल वसलेलं आहे. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार कोणतीही आंतरराष्ट्रीय एअरलाइन दुसऱ्या देशातून तिसऱ्या देशात उड्डाण करू शकत नाही. डिपार्चर किंवा डेस्टीनेशनपैकी एक त्या देशातंच असावं लागतं. म्हणजे इंडिगोची आंतरराष्ट्रीय फ्लाईट मुंबई-लंडन-मुंबई असं करू शकते पण मुंबई-लंडन-पॅरीस-मुंबई असं उड्डाण करता येत नाही. इंडिगोचं कोड शेअर असल्यानं मुंबई-इस्तंबूल जे विमान इंडीगो म्हणून जातं त्याला इस्तंबूलचा थांबा घेतला की पुढे टर्कीश एअर म्हणून पुढे लंडनला जाता येत. साहजिकच इस्तंबूलच्या एकमेवाद्वितीय भौगोलिक स्थानाचा तुर्कस्थान फायदा घेतं.

आता तुर्कस्थान मुस्लीम देश आहे आणि त्यापेक्षा जास्त म्हणजे त्यानं पहलगाम नंतर पाकिस्तानला उघड पाठिंबा दिला आहे. पण एवढं असूनही इंडीगोचा त्यांच्यासोबतचा त्यांनाच खूप फायदा देणारा धंदा जोरात सुरू आहे आणि पुण्यातील अनेक घैसास प्रवासही करत आहेत. एका शत्रुराष्ट्राशी युद्धसंभाव्य काळात धंदा कसा काय होऊ शकतो? घैसास बाईंनी सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यास काय हरकत आहे?

युरोपची अर्थव्यवस्था डळमळीत आहे. पण त्याआधीच ‘कनेक्टीव्हीटी जंक्शन्स’ म्हणून दुबई (एमिरेट्स), अबुधाबी (एतिहाद एअरवेज), दोहा (कतार एअरवेज) यांनी अत्यंत अत्याधुनिक विमानतळं + मजबूत पायाभूत सुविधा + एअरपोर्ट टुरिझमच्या नव्या अद्भूत कल्पना + स्वतःच्या अतिशय दर्जेदार एअरलाईन्स यांच्या बळावर खूपच मोठी मुसंडी मारलेली असून युरोपातील एअरलाईन्स पेक्षा कितीतरी मोठ्या अशा या तीन एअरलाईन्स झालेल्या आहेत. हे तीनही मुस्लीम देश आहेत.

आपली उलट अधोगती आहे. खरं म्हणजे मुंबईचं आपल्याला इस्तंबूल करणं शक्य होतं आणि एअर इंडियाची कतार एयरवेज करणं शक्य होतं पण थापेबाजी आणि फोकनाडपणात अकरा वर्ष गेल्यानं आपली ती संधी हुकली.

दुसर्‍या बाजूला एक खाजगी एअरलाईन स्वातंत्र्य मिळाल्यामिळाल्या पंडीत नेहरूंनी 49 टक्के शेअर विकत घेऊन सरकारी करून घेतली. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय अवकाशात भारताचा महाराजा तब्बल पन्नास वर्ष झोकात उडत होता. प्रफुल्ल पटेल नावाच्या एका भ्रष्ट मंत्र्यानं आधी व्याह्याच्या जेट एअरवेजला पुढावा द्यायचा म्हणून हा महाराजा नागडा केला आणि नंतर तर बुद्धीदरिद्री राजवट भारतात आली. जय श्रीरामच्या पुढे काहीही सुचत नसलेली राजवट. या राजवटीनं महाराजा पुन्हा टाटाला विकून टाकला.

परिस्थिती इतकी वाईट आहे की अमृतकालात भारताला ऑफिशिअल कॅरियर देखील शिल्लक राहीलेलं नाही. मोदी सरकार महाराजा विकून टाकत होतं तेव्हा इंडिगो मात्र पंख पसरवत होतं.

थापेबाजी आणि फोकनाडपणाला लोकमान्यता मिळाली की अधोगतीला सीमा रहात नाही ती अशी.

जाता जाता- 1995-96 साली पुण्याहून दिल्लीला फक्त दोन फ्लाईट होत्या. दुपारी 4.20 वाजता इंडियन एअरलाईन्स आणि लगेच 4.30 वाजता जेट एअरवेज. आज तीसेक फ्लाईट दिल्लीला जात असतील पण दोनच कंपन्या खऱ्या अर्थानं शिल्लक आहेत त्या म्हणजे इंडीगो आणि एअर इंडिया. दर त्यांच्या मनमानीनं चढतात उतरतात. अगदी आदल्या दिवशी बुकींग केलं तर परिस्थितीनुसार 40 हजारच्या आसपासही तिकीट असतं.

खाजगीकरणात लोकांचा प्रचंड फायदा होतो कारण स्पर्धा वाढते असं आपल्याला तेव्हाचा फोकनाड विरोधी पक्ष सांगत होता. आता प्रचंड पैसे मोजून तिकीटं घेणाऱ्या लोकांनी ‘कुठे आहे फायदा’ असा प्रश्न विचारायला हवा.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!