दिन विशेषमराठवाडामहाराष्ट्रमुख्यपान

नळदूर्ग शहरातून सोलापूर कडे जाणारा जुना राष्ट्रीय महामार्ग चालू करा

अन्यथा तिव्र अंदोलन छेडण्यास भाग पाडु नका :- जितेंद्र कानडे

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

नळदुर्ग शहरातील जुना राष्ट्रीय महामार्ग त्वरित चालू न झाल्यास या पेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख,जिल्हा परिषद सदस्य डॉ जितेंद्र कानडे यांनी नळदुर्ग येथील रास्ता रोको आंदोलन प्रसंगी दिला
नळदुर्ग शहरातून गेलेला राष्ट्रीय महामार्ग बाह्यवळण रस्ता केल्यामुळे मुर्टा पाटी ते खंडोबा पणन येथून बंद करण्यात आला आहे. तो रस्ता त्वरित चालू करण्यासाठी महाविकास आघाडी कडून आज रविवार दिनांक १७/ ०५ / २०२६ रोजी सकाळी दहा वाजता नळदुर्ग बस स्थानकासमोर राष्ट्रीय महामार्गावर एक तास
रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ जितेंद्र कानडे म्हणाले की नळदुर्ग शहर हे ऐतिहासिक व पर्यटन शहर म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच श्रीखंडोबाचे तीर्थक्षेत्र ही आहे. या ठिकाणी अनेक भाविक व पर्यटक दररोज मोठ्या संख्येने येतात परंतु भारतीय जनता पार्टीच्या सरकारने या शहराचे महत्त्व कमी करण्यासाठी शहरातून गेलेला जुना राष्ट्रीय महामार्ग मुर्टापाटी व खंडोबा पण येथून बंद करून शहराचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न चालवला आहे, यामुळे पर्यटनावर परिणाम झालाच आहे,उलट शहरातील व्यापार ही बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने नागरिकांना याचा त्रास होत आहे. गोलाई येथून उड्डाणपुला खालून वळण घेत असताना जड वाहनांचा अपघात होत आहे. तसेच नवीन केलेल्या बाह्य वळण रस्त्यावरही मोठे खड्डे पडले असल्याने वाहन चालवताना त्रास होत आहे, अणदुर नळदुर्ग ला जोडणारा पणन जवळील रस्ता महत्वाचा आहे.यामुळे जुना राष्ट्रीय महामार्ग चालू होणे गरजेचे आहे,तो जर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने त्वरित चालू न केल्यास यापेक्षाही आणखी तीव्र आंदोलन महाविकास आघाडी कडुन केले जाईल याची दखल घ्यावी, असे ते म्हणाले,
याच रास्ता रोको आंदोलनावेळी बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पनेतेक्षाचे नेते प्रशांत नवगिरे म्हणाले की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जनतेच्या सहनश्रेष्ठीचा अंत पाहू नये,जर हा महामार्ग त्वरित चालू न झाल्यास शिवसेना त्यास आक्रमकपणे उत्तर देईल व संबधीत अधिकाऱ्यांचे प्रसंगी कपडेही फाडू असे म्हणाले,नळदुर्ग शहरातून गेलेला जुना रस्ता हा पुन्हा पूर्व चालू करावा यामुळे नागरिकांचे व्यापाऱ्यांचे वैयक्तिक शहराचे नुकसान होत आहे, तो आम्ही खपवून घेणार नाही. असाही इशारा त्यांनी दिला,
यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदीप जोशी, नगरसेवक मारुती खारवे, नगरसेवक व ईमाम शेख, संतोष पुदाले, यांनीही मार्गदर्शन केले,
रास्तारोको वेळी जळकोट अणदुर व अक्कलकोट कडे जाणाऱ्या वाहनांची मोठी कोंडी झाली होती. मागन्याचे निवेदन नळदुर्ग पोलिस ठान्याचे पोलिस निरीक्षक यांना देन्यात आले.रास्ता रोकोस धाराशिव जिल्हा उ. बा.ठा शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर जितेंद्र कानडे,धाराशिव जिल्हा शिवसेना उबाठा नेते प्रशांत नवगिरे,शिवसेना तुळजापूर तालुका शेतकरी सेना प्रमुख बाळकृष्ण घोडके,कृष्णात मोरे,अनिल छत्रे, नळदुर्ग शहर उ बा ठा शिवसेना प्रमुख संतोष पुदाले, सरदार सिंग ठाकूर,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नगरसेवक मारुती खारवे, नगरसेवक इमाम शेख, नगरसेवक सुधीर पोतदार, नगरसेवक आकाश कुलकर्णी,नसीर इनामदार,फारुख कुरेशी, शेतकरी संघटनेचे दिलीप जोशी,शिवसेनेचे राजेंद्र जाधव,दत्ता भोसले, कल्याण करपे, बालाजी गायकवाड, अमित शेंडगे,श्याम कनकधर, ओंकार कलशेट्टी, सोमनाथ म्हेञे व सज्जाद मोजन, अहमद इनामदार, समीर शेख, साजिद काजी, उपस्थित होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!