कोकणाच्या जनतेत असलेली संघटनात्मक ताकद कुठेही नसल्याने ती भारतीय बौद्ध महासभा ही मातृ संस्था वाढविणेसाठी कामी लावावी -ॲड. डॉ. एस के भंडारे

कणकवली – भगवान बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी धर्मांतरांनंतर त्याकाळी जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर बौद्ध विकास संघ स्थापन केले गेले. त्याद्वारे स्थानिक आणि मुंबई अश्या दोन टीम बनवून गावाची भावकी छान पद्धतीने विकसित केलेली आहे. एवढेच नाही तर आपल्या समाजाच्या वसाहतीचे नाव कोकणात सर्वत्र “बौध्दवाडी ” असे नाव पाहायला मिळते तसेच गावाच्या कार्यात बौध्द महासभा व स्थानिक संघ, मंडळे एकत्रित काम करतात,काही ठिकाणी भावकीत वाद निर्माण होऊन एकत्रित येत नाहीत. पण आजची परिस्थिती बदललेली असून समतेचे विरोधक केंद्र, राज्य व विविध ठिकाणी आरुढ झालेली असून ते बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेले अधिकार, आरक्षण, शैक्षणिक सवलती इत्यादी समतेच्या सवलती काढून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ते थांबविण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ भीमरावसाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा ) ने मिशन : 25 सुरु केले असून त्या अंतर्गत विविध मंडळे, संस्था, संघटना, विहारे जोडो आणि संविधान समर्थक जोडो अभियान सुरु केले आहे त्यामुळे कोकणाच्या जनतेत असलेली भावकीची संघटनात्मक एवढी मोठी ताकद कुठेही नसल्याने आणि बौद्ध म्हणून एक असल्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) ही मातृ संस्था वाढविणेसाठी ताकद कामी लावावी असे प्रतिपादन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा ) चे ट्रस्टी /राष्ट्रीय उपाध्यक्ष, केंद्रीय कार्यालय प्रमुख ऍड डॉ एस के भंडारे यांनी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर पी एच डी प्राप्त केल्याबद्दल आणि बौद्ध धम्म चळवळीत चालू असलेल्या अमूल्य योगदानाबद्दल शिवडाव बौद्ध विकास संघ यांच्यातर्फे शिवडाव ता. कणकावली जि. सिंधुदुर्ग येथील दिनांक 12/8/2026 रोजीच्या कौटुंबिक स्नेह बैठकीत सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले.भंडारे यांच्या अत्यंत मुद्देसूद व चोखपणे मांडलेल्या विचाराने कार्यकर्ते प्रभावित झाले. याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभा सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष आनंद कासार्डेकर, जेष्ठ सल्लागार भास्कर तांबे गुरुजी, भाई सुनिल तांबे, कार्यक्रमाचे व शिवडाव बौध्द विकास संघ गाव शाखा अध्यक्ष अध्यक्ष कवी सिद्धार्थ गोपाळ तांबे इत्यादीनी आपले विचार स्पष्टपणे मांडून धम्म चळवळ अधिक गतिमान करण्याची गरज असल्याची आवश्यकता व्यक्त केली.या कार्यक्रमाचे अतिशय छान सूत्रसंचालन संदेश तांबे यांनी केले आणि या कौटुंबिक सत्कार कार्यक्रमाचे आयोजन मंत्रालयातून स्वेच्छा सेवानिवृत्ती स्वीकारलेले ऍड डॉ भंडारे परिवाराचे मित्र, शिवडावचे सुनिल तांबे यांनी केले होते.यावेळी शिवडाव बौद्ध विकास संघ मुंबई , भारतीय बौध्द महासभा यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद उपस्थित होते. यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने ऍड डॉ भंडारे आणि त्यांच्या पत्नी सुमेधा भंडारे यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास प्रामुख्याने भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस संजय पेंडूरकर, जिल्हा संरक्षण उपाध्यक्ष दिलीप कदम , मेजर अरुण जाधव , जिल्हा पर्यटन सचिव शंकर कदम , कणकवली तालुका कोषाध्यक्ष महेंद्र कदम,शिवडाव शाखेचे अध्यक्ष आप्पा पवार, शिवडाव बौद्ध विकास संघाचे सचिव अमीर तांबे,सुधीर तांबे इत्यादीनी सहभाग नोंदवीला. कार्यक्रमा दरम्यान तीन वेळा लाईट गेली, पाऊस होता तरी सुद्धा कार्यक्रम अखंडपणे उत्साहात पार तब्बल रात्री 11 वाजता पडला. ऍड डॉ भंडारे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आपल्या दौऱ्यात कणकावली,देवगड, वैभववाडी, सावंतवाडी तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन ठिकाणाना भेट दिली.या काळात त्यांनी त्यांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील पुस्तक लिहून पूर्ण केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत



