देशभारतमहाराष्ट्रराजकीयविचारपीठ

भारतीय लोकशाही एक दिवा स्वप्न ,,,,!


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
ऍड अविनाश टी काले , अकलूज , तालुका माळशिरस , जिल्हा सोलापूर ,, मो न 9960178213
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
स्वातंत्र्य पूर्व काळात देशात सामाजिक राजकीय अश्या सर्व पातळीवर वैचारिक घुसळण जोरकस रित्या झाली ,,
तत्कालीन काळात बहुसंख्य जनता अशिक्षित होती पण त्यांचे नेतृत्व करणारे नेते हे उच्च शिक्षित , जागतिक वैचारिक प्रवाह जाणणारे नेते होते ,
धर्म वादी , अर्वाचीन संस्कृती प्रिय जैसे थे वृत्तीचा समूह ही अस्तित्वात होता पण तो मर्यादित शक्ती समूह होता ,, आणि त्यांच्या हातात धर्म हे हत्यार होते ,,
अर्थात देशाची जडण घडण प्रगत असलेल्या इतर राष्ट्रा सारखी करण्यासाठी नवीन विचार नवीन दिशा आणि कांहीं सांस्कृतिक बदल कायद्या द्वारे स्थापित करून स्वतंत्र नागरिक घडविण्यास प्राधान्य क्रम होता ,
पारंपारिक शेती उत्पादन आणि ग्रामीण उत्पादन व्यवस्था , पारंपारिक दळण वळणाची साधने असताना त्यात अमुलाग्र बदल घडवून आणत भाक्रा नांगल सारखी महाकाय धरणे , जल विद्युत प्रकल्प उभारणी सह देशाच्या विकासाचा रोड मॅप निर्माण झाला ,
ना साम्यवादी ,, ना भांडवल दारी अर्थव्यवस्था उभी करताना सरकारी संस्थात्मक उभारणी सह सहकार सारखी अर्थव्यवस्था अंगिकारली गेली ,,
भारतीय समाजाला भारतीयत्व प्रदान करण्यासाठी जात धर्म , लिंग , प्रांत , भाषा भेद बाजूला सारण्यात आले ,,
प्रौढ मतदान व्यवस्थेच्या माध्यमातून स्वायत्त निवडणूक आयोगाच्या द्वारे सरकारे निवडली जात होती , त्यात पारदर्शीपणा होता ,,
तत्कालीन काळात छोटासा असलेला धार्मिक समूह संघटनात्मक बांधणी आधारे हळू हळू देशभर विस्तारित होत होता ,,
आपले राष्ट्र असे होते , त्यावर आक्रमणे झाली , त्या आक्रमकांनी आपल्या जनतेवर अत्याचार केले , आपल्या संस्कृतीला नख लावले , त्या मूळ संस्कृतीला आपल्याला पुनर्जीवित करायचे आहे ,, अशी वैचारिक मांडणी करत , तत्कालीन व्यवस्थेचे लाभार्थी असलेल्या समूहात त्यांनी वैचारिक प्रावह रुजविण्याचा प्रयत्न व्यापक पातळीवर सुरू ठेवला ,,
देशात अस्तित्वात असलेल्या प्रत्येक प्रवाहात , प्रत्येक संघटनेत , प्रत्येक पक्षात आपल्या विचारांची माणसे असली पाहिजेत हे त्यांनी ठरवले , आणि त्या नुसार समर्पित वृत्तीने ती माणसे आपले विचार धन जसे जमेल तसे इतर पक्ष संघटनेत ही पेरत राहिले
हा वैचारिक घुसखोरी चां भाग इतका जबरदस्त होता की प्रणव मुखर्जी सारखे काँग्रेस चे सर्वोच्च नेते हे संघाचे होते हे समजण्यासाठी त्यांना सर्वोच्च पदावरून निवृत्त झाल्या नंतर ते जेंव्हा उघड रित्या संघाच्या कार्यक्रमात सहभागी झाले तेंव्हा समजले ,,
तत्कालीन काँग्रेस पक्षाने राजकीय नेते आणि त्यांची राजकीय घराणी निर्माण केली , पण हीच घराणी वैचारिक दृष्ट्या काँग्रेस ची राहिली नाहीत तर वैचारिक दृष्ट्या ते संघाचे वाहक बनले ,,
मुंबई आज तक ने जी यादी सांगितली त्या नुसार निवडून येण्याची क्षमता असलेले दिग्गज नेते , आमदार खासदार जवळपास २५० नेते त्यांच्या गोटात जाऊन स्थिरावले आहेत ,,
अनेक प्रादेशिक पक्षाचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे , आणि अनेक प्रादेशिक पक्षाचे दुसऱ्या फळीतील नेते भाजप चे कळपात घुसले आहेत
हे घुसणे केवळ बंडखोरी किंवा गद्दारी नाही , राजकारणाची त्यांची सुरुवात ही महत्वकांक्षी असण्यातून च झालेली होती ,
ज्यांचा वैचारिक प्रवाह हिंदुत्वाशी निगडित होता त्यांच्या दृष्टीने भाजप कडे सरकणे त्या विचार प्रवाहाशी एकरूप असण्याची च बाब होती
पण जे या प्रवाहाचे नव्हते , ते ही जेंव्हा त्यांचे कडे सरकतात तेंव्हा हे प्रभावित होणे नसते तर त्यात त्यांची स्वतःची राजकीय ईच्छा आणि फायद्या चे व्यक्तिगत स्वार्थाची गणिते असतात ,,
आपल्या विचार प्रवाहाच्या विरोधी विचार प्रवाहाला गढूळ आणि दूषित करण्यासाठी अशी दलाल मंडळी त्यांना हवी असतात ,, आणि नवे नवे दलाल निर्माण व्हावेत म्हणून त्यांच्या कडे आलेल्या दलालांना त्यांना सांभाळावे लागते ,,
एखाद्या शिकाऱ्याने पक्षाची शिकार करण्यासाठी आंथरलेल्या फासात इतरांना अडकविण्यासाठी पाळीव पक्षी ठेवावा लागतो ,, त्या पाळलेल्या पक्षाला दाना पाण्याची व्यवस्था केलेली असते ,, आणि एवढ्या अल्पश्या गुंतवणुकीच्या बदल्यात चळवळी संपतात ,,
हे सगळीकडे घडले ,, ज्यात मार्क्स वादी पासून आंबेडकर वादी पर्यंत ,,,
घडले ,,
दुसऱ्या बाजूला सत्ता कोणाची ही असताना प्रशासनात संघ विचाराची माणसे उच्च पदस्थ म्हणून राहिली आणि त्यांचा अजेंडा ही राबवत राहिले ,,
परिस्थिती प्रतिकूल असताना शांत राहणे , तरीही सतत कार्यरत राहणे , आणि अचूक वेळ येताच परिस्थिती अनुकूल बनता च आक्रमक बनणे ही त्यांची रणनीती होती ,,
राजू परुळेकर यांच्या सारख्या दिग्गज अभ्यासू पत्रकाराने जनता पक्षाच्या राजवटी बद्दल जे विधान केले ते १००%खरे आहे ,,
जय प्रकाश नारायण सारख्या दिग्गज नेत्याने संपूर्ण क्रांती चां नारा देत सर्व पक्षियांची एक फळी उभारण्याची केलेली सुरुवात जनता पक्षाचे निर्मितीत झाली आणि त्यांनी “जन संघाला” समवेत घेऊन देशभर मोठ्या प्रमाणावर मान्यता मिळवून दिली ,,
थोड्याच अवधीत त्याचे रूपांतर भारतीय जनता पक्ष या गोंडस नावाने झाले ,, आणि राजकीय पक्ष म्हणून सगळ्या पक्षासी ते राजकीय समझोता करत स्वतःचा विस्तार करत राहिले ,,
हा विस्तार नेत्यांचा नव्हता तर विचाराचा होता ,,
माओ स्ते तुंग यांचे एक विधान आहे जर तुम्हांला कांहीं दिवसाची तयारी करायची असेल तर फुले लावा , कांहीं वर्षाची तयारी करायची असेल तर झाडे लावा आणि शेकडो वर्षाची तयारी करायची असेल तर माणसे लावा (पेरा)
संघाने माणसे पेरली ,, समाजात त्यांचा विचार प्रवाह रुजवला ,,
काँग्रेस सारख्या सत्ता सत्तेचे राजकारण करताना निवडणुका जिंकण्याचे शास्त्र म्हणून आर्थिक सामाजिक राजकीय दबंग घराणी निर्माण करत होते , आणि संघ सत्ता विहीन राहून विचाराची माणसे घडवत होती ,,
मानवी मनात स्व देश , स्व धर्म इतकेच काय स्व जात प्रेम हे नैसर्गिक रीत्या वसत असते , त्या प्रति अस्मिता ही असतात त्याची नाळ संघाने पकडली , तिला आकार दिला ,,
“हिंदू कोण?” या प्रश्नाचे उत्तर देताना त्याची जी परिभाषा सावरकर यांनी केली ती अशी होती
” ज्याची जन्म भूमी , मातृभूमी , पितृभूमी, आणि पुण्य भूमी आहे असे आसेतू हिमाचल ते कन्या कुमारी पर्यंत असलेले लोक हे हिंदू आहेत ,,
यातील पुण्य भूमी हा शब्द साधा शब्द नाही ,, तो खरा व्यापक आहे आणि ज्या धर्माच्या आस्था पुण्य भूमी देशाचे बाहेर आहेत त्यांना परकीय ठरवतो ,,
मग त्या आस्था मक्का , मदिना येथे असोत किंवा जेरुसलेम येथे ,,,
ज्यांच्या संस्कृती बाहेरून आलेल्या होत्या त्यांच्या खान पान , राहणीमान , पेहराव , भाषा , आणि संस्कृती यात प्रचंड तफावत होती , आणि ही तफावत कधीच न मिटणारी होती ,,
निधर्मी राजवट विचारसरणी द्वारे त्या बाबीला साईड लाईन करण्याचे धोरण आखले गेले पण ही बाब साईड लाईन जनतेतून झाली नाही
धर्म आणि स्व जात प्रेम घेऊन च भारतीय बहुसंख्य जनता स्वतःचे जीवन जगत होती जगत आहे आणि हेच वास्तव आहे ,,
तिचे भारतीय करण झालेच नाही ,,
बहुजन चळवळी नी ब्राम्हणी व्यवस्थेला “युरेशियन” सबोंधून त्यांना मुल निवासी पासून वेगळे करण्याची रणनीती आखली तरी हे स्वीकारले गेले नाही याचे कारण ज्या आस्था बहुजनांच्या होत्या त्या आस्थाच्या पूजनाचे धार्मिक विधी करण्याचे अधिकार याच मंडळी कडे होते व आज ही आहेत ,,
एकंदरीत त्यांना व्यवस्थे पासून अलग करण्या साठी केले जाणारे हरेक प्रयास हे अपयशी ठरणारे होते ,, एका अर्थाने आर्य अनार्य असे भेद इतिहास कालीन बनून गेले होते ,,
भारतीय वर्ण व्यवस्था , तिची जात व्यवस्था अबाधित राहिली आणि त्या आधारे चालणारे राजकारण ही समांतर चालत राहिले ,,
मधल्या काळात भारतीय राज्य घटनेने राजकीय व्यवहार धर्म जात लिंग प्रांत भाषा भेद विरहित ठेवण्याचा प्रयत्न केला ,, तो ही आत्ता पराभूत होत आहे ,,
संघाने कोणतीही राजकीय साधन सुचिता न मानणाऱ्या मोदी चे हाती सत्तेची कमान देऊन संपूर्ण घटनात्मक व्यवस्था अमानुष रित्या चिरडून टाकली आहे ,,
लोकशाहीचे चार ही खांब त्यांनी उखडून फेकले आहेत किंवा त्यांचे वर त्यांचे अधिपत्य आहे
संघ प्रमुख मोहन भागवत म्हणले होते , संघ भारतीय लष्कराची जागा घेऊ शकतो ,,
या विधानाला हलक्यात घेण्यात आले होते , लष्करी सर्वोच्च सेनापती पद हातात घेतल्या नंतर शिल्लक काय उरते?
हातात लाठी घेऊन हे काय लढाई लढणार? असे प्रश्न बालिश प्रश्न होते ,, देशाचे अंतर्गत भागात विरोधी शक्तीचे दमन करण्यासाठी याच लाठ्या उपयोगाच्या होत्या , जेसीबी आणि बुलडोझर उपयोगाचे होते हे सिध्द झाले आहे
बहुजन ही संकल्पना फसवी ठरली आहे ,, कोणत्याही कारणावरून दोन समुदायात संघर्ष पेटवता येतो आणि असा संघर्ष पेटला तरी राज्यकर्ते म्हणून त्याचे कडे पाहायचे नाही हे सूत्र त्यांनी अंगीकारले आहे ,
बहुजन आपापसात लढून कमजोर होतील , त्यांना हर प्रकारे कमजोर केले जाईल ,, अजगराणे हळू हळू विळखा आवळत न्यावा तसे हे घडत आहे ,,
आपण ज्याला समृध्दी महामार्ग म्हणून सबोंधतो तो मार्ग या दमन शक्ती साठी निर्माण केलेला राजमार्ग आहे ,,
हुकूमशाही विरोधात केलेले कोणतेही बंड क्षणार्धात कुचलले जाईल याची तजवीज होत आहे ,,
निवडणुकी द्वारे तुम्ही संघाला हरवू शकत नाही ,, न्यायालया द्वारे त्याला थोपवू शकत नाही ,,
भाजप प्रणित हुकूमशाही देशात स्थापित झाली आहे ,, आणि
लोकशाही हे दिवा स्वप्न ठरलेले आहे
🙏🙏🙏🙏

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!