किल्लारी येथे विशाल पाचवी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन केंद्रिय मंत्री मा रामदासजी आठवले राहाणार उपस्थित

धम्म परिषदेस हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे पुजनिय भन्ते धम्मसार थेरो यांचे आवाहन
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
महाराष्ट्र व मराठवाड्यातील तमाम आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते बौद्ध उपासक आणि उपाशिकानी मौजे किल्लारी येथे होऊ घातलेल्या दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी पाचव्या विशाल धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे तथागतांचा बौद्ध धम्म आजचे आचरणात आणण्यासाठी समता स्वतंत्र बंधुता आणि न्याय समानता आणि अखंडचा व लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये धम्म परिषदेचे आयोजन करणे खुप महत्वाचे आहे बौद्ध संस्कारांचे जतन आणि पठण करण्यासाठी बौद्ध धम्म परिषदा झाल्याच पाहिजेत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला विजयादशमीच्या दिवशी बौद्ध धम्माचा स्वीकार केला प्रत्येक गावात बौद्ध विहाराची निर्मिती व्हावी भारतीय संविधानाचे महत्त्व जनतेला समजावून सांगावे तथागतांच्या बौद्ध धम्माच्या संदर्भात प्रत्येक मानवाची गोडी निर्माण व्हावी , प्रत्येक बौद्ध विहारात असणारे बौद्ध भिक्षू यांचा आदर निर्माण व्हावा , आंबेडकरी चळवळीतील प्रत्येक कार्यकर्ता सक्षम बनावा प्रत्येक मानवाने सदाचारी चे जीवन जगावे या साठी बाबासाहेबांनी दिलेला पवित्र बौद्ध धम्म हा विशाल सागरासारखा आहे खूप मोठा आहे आणि खूप महान सुद्धा आहे या धम्मा मधून भारतीय संविधानाची निर्मिती झाली असून हा तर बौद्ध धम्माचे संस्कार घेण्यासाठी ऐकण्यासाठी तमाम आंबेडकरी चळवळीतील श्रद्धा संपन्न बौद्ध उपासक आणि उपासिकांनी मौजे किल्लारी येथे होऊ घातलेल्या विशाल पाचव्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे या धम्म परिषदेचे अध्यक्ष पुजनिय भंते डॉ उपगुप्त महाथेरो हे असणार असून या धम्म परिषदेला विशेष निमंत्रण म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री माननीय रामदासजी आठवले रिपाइं महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे व औसा तालुक्याचे विद्यमान आमदार अभिमन्यू पवार उपस्थित राहणार आहेत .रिपाई प्रदेश युवक अध्यक्ष पप्पू कागदे रिपाई लातूर जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब कांबळे व
दैनिक लोकमतने लंडन येथे महाराष्ट्ररत्न पुरस्कार देऊन सन्मानित केलेल्या माजी मंत्री उदगीर तालुक्याचे आमदार संजय बनसोडे , व्यवस्थापकीय संचालक रस्ते विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य डॉ अनिलकुमार गायकवाड , बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष मा बाबुराव पोटभरे यांचा विशेष सत्कार समारंभाचा कार्यक्रम ही आयोजित करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर भिमगितांचा जंगी कार्यक्रम होणार आहे यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुज्य भन्ते म्हणते धम्मसार थेरो हे करणार असून उपस्थित पुजनिय भिक्ख्यु संघास चिवरदान प्रा डॉ अशोक नारायण गायकवाड , प्रा डॉ दशरथ पंढरी कांबळे , राजेंद्रप्रसाद सुधाकर कांबळे , रेश्मा महादेव नागनाथ वाघमारे , शीला रविकांत शिरसाठ , इंदुबाई श्रीपती गायकवाड , बाबासाहेब निळकंठ सोनकांबळे विलास राजेंद्र सुरवसे , वरील सर्व पूजनीय भिक्खू संघास चिवरदान करणार असून खालील भिख्यू संघास लोहारा तालुक्याचे सहाय्यक कृषी अधिकारी किशोर चंद्रकांत गायकवाड हे भोजनदार देणार आहेत लातूर व धाराशिव जिल्ह्यातील श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांनी मौजे किल्लारी तक्षशिला बुद्ध विहार तथागत बुद्ध गार्डन ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे किल्लारी येथे होऊ घातलेल्या धम्म परिषदेस हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून धम्मदेसनाचा लाभ घ्यावा असे आवाहन धम्म परिषदेचे आयोजक पूज्य भंते धम्मसार थेरो यांनी केले आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत



