विदर्भ

भरधाव ट्रक रिक्षावर उलटून भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू, ४ जण जखमी.

चंद्रपूर जिल्ह्यात भरधाव ट्रक एका ऑटोरिक्षावर उलटल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. या भाषण अपघातामध्ये रिक्षाचालकासह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी आहेत. जखमींना उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा काल (बुधवार) अपघात रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
चंद्रपूर शहरातील बल्लारपूर बायपास मार्गावर रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव ट्रक ऑटोरिक्षावर उलटली त्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे.तर यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. संगीता चाहांदे (वय 56 वर्षे, रा. गडचिरोली), अनुष्का खेरकर (वय 22 वर्षे, रा. बल्लारपूर), प्रभाकर लोहे आणि ऑटो चालक इरफान खान (वय 49 वर्षे, रा. बाबूपेठ) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.ट्रक अष्टभुजा मंदिराजवळील रेल्वे उड्डाणपुलावरुन भरधाव वेगात येत होता. अचानक ट्रक चालकाचे नियंत्रण सुटलं आणि ट्रक शेजारुन जाणाऱ्या एका ऑटोरिक्षावर उलटला. ट्रकखाली चिरडल्याने ऑटोमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, यामध्ये रिक्षाचालकाचाही समावेश आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना उपाचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राजकला मोहूर्ले, गीता शेंडे, दशरथ बोबडे अशी जखमींची नावे आहेत. एकाची ओळख अद्याप पटलेली नाही.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!