देशभारतमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

ओबिसिनो! अन्याया विरुद्ध देव, धर्म, शासन यांना प्रश्न न विचारणे. म्हणजे गुलामी होय.

राजाराम पाटील.

लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये झालेली मतांची चोरी,बिहारमधील मतदार फेर आढावा मोहीम या दोन मुद्द्यांवर लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांच्या “इंडिया” आघाडीने संसद भवनातून मोर्चा काढला.
सुमारे ३०० खासदार या मोर्चात सहभागी झाले होते.
लोकशाहीची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.
निवडणूक आयोग खासदारांना भेट देत नाही.
सरकारला प्रश्न विचारणारा आज देशद्रोही आहे.
अन्याय सहन करणारा देशप्रेमी,देशभक्त आहे.

मी स्वतः २०१९आणि २०२४ ची लोकसभा निवडणूक लढलो आहे.
निवडणूक यंत्रणा आणि ईव्हीएम मशीन भ्रष्ट आहेत. असे मलाही वाटते.
परंतु मला मतदान करणाऱ्या मतदारांना जागे करणे याला उपलब्ध साधनं, संपत्तीतील कमतरतेमुळे अडचणीचे ठरते.
अर्थात मी गरीब आहे .
म्हणजे शूद्र जातीत ओबीसी म्हणून जन्म घेणे. हे एक कारण आहे.
अर्थात मागास वर्गीय माणसाने देव धर्म समाज यांनी विषमतेच्या आधारावर निर्माण केलेल्या परिस्थीत स्वतःस सिद्ध करणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे.

माझ्या जीवन संघर्षात मी निराश नाही.
ज्यांनी ही विषमता निर्माण केली.
त्या ब्राम्हण क्षत्रिय वैश्य जातींच्या प्रस्थापित काँग्रेस भाजपा या राष्ट्रीय पक्षांना ओबीसींवर गुलामी लादण्यासाठी प्रचंड मोठा प्रवास करावा लागला.

या गुलामी विरोधात महात्मा जोतिबा फुले,क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले,राजर्षी शाहू महाराज डॉ बाबासाहेब आबेडकर यांनी स्त्रीशूद्र अतिशूद्र यांच्या जागृतीचा ,प्रबोधनाचा जो प्रवाह सुरू केला.
त्याचे महासागरात रूपांतर आता होत आहे.म्हणूनच भाजपा विरुद्ध काँग्रेस आज उभे आहेत.

मनुस्मृतीच्या वैदिक हिदू तत्वद्न्यानाचा फायदा भारतातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी घेतला आहे.
ज्यांचे प्रमुख ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आहेत.
त्यांचा स्वभाव ओबीसी एससी एसटी आणि स्त्रिया यांना गुलाम करून लुटण्याचा आहे.
इतिहासाने ही गोष्ट सिद्ध केली आहे.

ओबीसींच्या शोषणास उच्चवर्णीय जबाबदार आहेत.
हे खरे आहे.
परंतु भारतीय संविधानाने आम्हास अभिव्यक्ती स्वातंत्र्य देऊनही ओबीसी आपल्या अन्याय अत्याचार याविरोधात बोलत नसतील?
तर त्यांचा मानस शास्त्रीय शोध २०२५मध्ये म्हणजे आमच्या (वर्तमान) काळात घ्यावा लागेल.
आमच्या देशाच्या गुलामीचा भूतकाळ सर्वांना माहित आहे .
तो आम्हा शूद्र ओबीसींच्या गुलामीचा आहे.

भविष्यकाळ आमच्या गळ्यात पुन्हा
गुलामीच्या शृंखला घेऊन येऊ नये?
म्हणून आजचा वर्तमान समजून घेऊन,स्वतःस बदलण्याची हिंमत ओबीसी जातींनी ठेवली पाहिजे.

मला माझ्या गुलामीची जाणीव कुणी करून दिली असेल ?
तर फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या बंधू भगिनींनी,
ती करून दिली.
अर्थात ओबीसींना मोक्ष मुक्ती द्यायला निघालेला इथला हिंदू धर्म?
आकाशातल्या मुक्तीच्या नावावर, जमिनीवरची गुलामी आमच्यावर लादतो.
ही गोष्ट जगाला माहित नाही.

जगातील वर्णभेद,वंशभेद,लिंगभेद,कामगार मालक वाद,मानवी गुलामी यांच्यासारखी ,जन्माधारित मानवी गुलामी आमच्याकडे देव, धर्म ,उच्चजातीय शासक यांनी लादली आहे.

हे आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सागितले.
ओबीसी लोकांनी आपली गुलामी जगाला सोडा?
देश, राज्य स्तरावर, आपली गुलाम जात, आणि स्वतःच्या माता पिता ,पत्नी मुले ,भाऊ बहीण यांनाही समजाउन सागितलेली नाही.

आज प्रश्न असा आहे.
आमच्या नसा नसात भिनलेले हे गुलामीचे विष काढून टाकण्यासाठी काय करावे?
हे ओबीसींना समजत नाही.
मी छोटासा प्रयत्न वयाच्या पस्तीशीत सुरू केला.
कारण याच वयात आंबेडकरी लोक मला भेटले.
ही भेट अगोदर व्हायला हवी होती.
आज परिस्थिती इतकी भयानक आहे की तुम्हास कसे समजाउन सांगू.?

पूर्वी ज्यांच्याकडे देव धर्म यांची मालकी होती.
त्या ब्राह्मणी लोकांनी तसा धर्म आमच्यावर लादून ओबीसींना गुलाम केले.
देव, देवळे ,धर्म ,कर्मकांड कमी पडले.
म्हणून क्षत्रिय जातींकडे तलवार देऊन आमच्यावर गुलामी लादली.
क्षत्रिय कमी पडले ?
म्हणून लोकांवर आर्थिक गुलामी लादण्यात आली.
ती वैश्य जातींकडून.
आज अदानी अंबानी लोढा हे ओबीसींना विकता विकता देशच विकू लागले.

फार संघर्षाने आम्ही देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.
संविधान आणि आमची आजची लोकशाही मिळविली.
परंतु ओबीसींच्या व्यक्तिगत जीवनात आज प्रश्न विचारणारा, बुद्ध ,चार्वाक, पेरियार ,डॉ बाबासाहेब आंबेडकर आम्ही रुजवू शकलो नाही.

आगरी कोळी, कराडी, भंडारी जातीत जमिनीच्या घरांच्या व्यवसायांच्या संघर्षात मी लढतो आहे.
धार्मिक गुलामीमुळे ते तर्क सोडून जगतात..
त्यात धार्मिक सण ,उत्सव आले की ओबीसी हक्कांच्या लढाया थंड पडतात.

जे मानवी कामाचे तास,पैसे,प्रयत्न लोकांनी स्वतःच्या न्यायासाठी अधिकारासाठी ओबीसीनि लावले पाहिजेत .
ते धर्म ,देव,देवळे,उच्च वर्णीय राजकीय पक्ष वाढवण्यासाठी लावले जातात.

माझ्या ओबीसी जातीला न्याय देताना मला गरिबीस सामोरे जावे लागते.
कारण न्यायासाठी पैसे लागतात?
हा विश्वास स्वर्ग,नर्क,पुनर्जन्म,देव,चमत्कार,पुरोहित भटजी यांनी संपविला आहे.

न्यायाचे संविधानिक तत्वद्न्यान आम्ही ओबीसी जातीत अजूनही निर्माण करू शकलो नाही.

उच्च जातीय लोकांना त्यांच्या सत्तेसाठी आमच्या शोषणासाठी, राजकीय पक्ष ,सत्ताधारी यांना देव धर्म यांची प्रचंड अनुकूलता आहे.
माझी ओबीसी बांधवांना एवढीच विनंती आहे.
रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना शांत बसून तुमच्या दिवस भरात आलेल्या समस्यांना प्रश्न विचारा.
हे प्रश्न कुणी निर्माण केले.?
आज माझ्यासारख्या छोट्या सामान्य कार्यकर्त्यां समोर जो प्रश्न आहे.
तो असा सांगूनही ,समजाऊनही जी गुलामी आमच्या ओबीसींना समजत नाही.
त्यासाठी काम कसे करायचे.?यासाठी साधने आणायची कुठून?
अगदी मी मदत घेऊन जरी गेलो?
तरी साविधानिक संघर्षावर ओबीसी बांधवांचा विश्वास नाही.
हा विश्वास निर्माण करणे ही भाजपा काँग्रेस किंवा कोणत्याही उच्चवर्णीय राजकीय पक्षांची जबाबदारी नाही.
ती आम्हा ओबीसींची जबाबदारी आहे.

आज देशात वैश्य अदानी अंबानी मोदी ही यांची सत्ता आहे.
पूर्वी ब्राह्मण क्षत्रिय यांची होती.
महाराष्ट्रात मराठा ब्राह्मण यांची सत्ता सातत्याने आलटून पालटून होती.

बदल झालाच तर मुंबईत धारावी मार्गे अदानी अंबानी यांची सत्ता येईल.
छत्रपती शिवराय, फुले , शाहू,आंबेडकर,यांच्या स्त्री शूद्र अतिशूद्र यांच्या रयतेचे काय?

या प्रश्नाचे उत्तर छत्रपती शिवराय यांच्या आरमारात लढणाऱ्या, जागतिक सागरी व्यापारी आगरी कोळी कराडी भंडारी ओबीसींना द्यावे लागेल.

लोकनेते दि बा पाटील यांनी दिलेला तो स्वातंत्र्या नंतरचा लढवय्या ओबीसींचा वारसा आहे.

जय ओबीसी .
राजाराम पाटील.
उरण रायगड.
८२८६०४१४६३.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!