दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

जग बदलण्याची गरज _______

कोम्रेड अण्णाभाऊ साठे म्हणाले ” जग बदल घालुनी घाव ,सांगून गेले मला भीमराव “. कार्ल मार्क्स नी सांगितले ” जगातील कामगार नो एक व्हा,आणि क्रांती करा “. डॉ.बी.आर.आंबेडकरांनी सांगितले ” शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा” ज्योतिबा फुले नी सांगितले ” शेटजी भटजी यांनी चालविलेले शोषण थांबायला हवे”. जगात आर्थिक आणि सामाजिक विषमता आहे.ती नष्ट झाली पाहिजे,म्हणून अनेक विचारवंत संत महामानव यांनी जग बदलण्याचा प्रयत्न केला.अजूनही समाजवादी समतावादी विचारवंत आणि कार्यकर्ते व्यक्तिगत आणि संघटित प्रयत्न करताना दिसतात.तरीही जग बदलत नाही.म्हणजे जगात समता स्वातंत्र्य बंधुभाव न्याय नाही.गरीब वर्ग अभावग्रस्त जीवन जगत आहे.याचा अर्थ त्यास सकस समतोल आहार मिळत नाही.भरजरी कपडे मिळत नाहीत.2bhk घर नाही.मुलांच्या दर्जेदार शिक्षण आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी पैसा नाही.पाण्याची गरज पण पूर्ण होत नाही,ही गरीब वर्गाची अवस्था आहे.मध्यम वर्ग अल्पसंतुष्ट आहे.पगार घट्ट.महागाई भत्ता मिळतो.नोकरी कायम.मग चिंता कसली ? कुणाची ,? इतरांची चिंता का करायची ? कारण त्यांचे नशीबच तसे.ते त्यांना भोगावेच लागते.महागाई भ्रष्टाचार बेकारी याचे चटके गरिबांना बसतात,ते त्यांनी भोगावे,त्यासाठी आम्ही का प्रयत्न करावेत ,त्यांचा प्रस्न त्यांनी सोडवून घ्यावा.तो आमचा प्रस्न नाही.आमचे प्रस्न संपलेत.आम्ही आमचे सुखी खुशाल मस्त जीवन जगतो आहोत,ज्याचे पोट दुखते त्यांनीच ओवा खायचा असतो.” अशी मानसिकता मध्यम वर्गीय समाजाची आहे.समाज बदलण्याची गरज श्रीमंतांना तर नाहीच.गरज आहे ती फक्त गरीब वर्गाची.हा वर्ग तर अशिक्षित ,अज्ञानी,अडाणी, भोळा,असंघटित आहे. पोट भरण्याच्या दनंदिन जीवनात त्याला संघटित व्हायला वेळच नसतो.कारण गरीब वर्ग हा श्रमिक कष्टकरी आणि हतावरचे पोट असलेला समाज आहे,या वर्गात शेतकरी शेतमजूर गिरणी कामगार ,मिस्त्री ,बांधकाम कामगार,हमाल,कारागीर,याचा समावेश होतो.रोज न चुकता काम करावे तरच घर खर्च मिळतो,एक दिवस काम नाही केले तर चुल पेटत नाही,अशी या वर्गाची अवस्था आहे.जग बदलण्याची खरी गरज याच वर्गाची आहे.म्हणून मार्क्स म्हणाला की हाच वर्ग क्रांती करू शकतो.मध्यम किंवा श्रीमंत क्रांती करू शकत नाहीत.कारण क्रांती करण्याची गरज त्यांना नाही.कारण त्यांचे प्रस्न सुटलेले असतात.क्रांतीची खरी गरज गरीब वर्गाची आहे,म्हणून या वर्गास जर त्याच्या गरिबीचे कारण हे देव धर्म किंवा नशीब नसून शोषण हे मूळ कारण आहे.,तुझ्या श्रमाची चोरी होते आहे,ती कशी? हे जर त्यास समजून सांगितले.आणि तूच जग निर्माता आहेस.तू श्रम नाही केलेस तर एकही वस्तू निर्माण होणार नाही.आणि या जगात जे काही निर्माण झाले आहे,जी संपती निर्माण झाली, उदा.शेती,कारखाने,उद्योग,सेवक्षत्र,हे सारे श्रम केल्यानेच.यंत्र निर्माण होतात श्रम यातूनच.अन्नधान्य ,व्यापार,दळणवळण,हॉटेल सेवा इत्यादी साठी श्रम च लागतात.एकंदरीत श्रम नाही तर काहीच नाही.श्रीमंत आणि मध्यम वर्गाची ऐश ही गरीब वर्गा चे जीवावरच.जर समजा गरीब वर्ग संघटित होऊन श्रम च करायचे नाही असे ठरविले तर सारे जग बंद पडेल.मध्यम श्रीमंत हैराण होतील.याची जाणीव या दोन वर्गास असायला हवी.गरिबांचा यांनी विचार नाही केला तर एक ना एक दिवस रशिया चीन कंबोडिया या देशात जी क्रांती श्रमिक यांनी केली,तसेच इथे घडणार.नव्हे जगात परत साऱ्याच देशात फ्रांस जर्मनी रशिया चायना कांबोडियाची क्रांती अजून एकदा घडणारच आहे.नव्हे,जो पर्यंत जगातील गरीबी ,बेकारी,महागाई,भ्रष्टाचार, अन्याय अत्याचार बंद होणार नाही,तो पर्यंत अशा श्रमिक क्रांत्या होतच राहतील,हे सत्य समजून घेण्याची गरज आहे.भारतात श्रमिक एकजूट न होण्याचे कारण देव दैव धर्म जात ही कारणे आहेत.या गोष्टी श्रमिक कष्टकरी शेतकरी शेतमजूर कारागीर छोटे व्यापारी, चतुर्थ आणि तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांच्या जेंव्हा लक्षात येतील,तेंव्हा या सर्व गोष्टींचा त्याग करतील,किंवा बाजूला ठेवतील आणि संघटित होतील,शिक्षित होतील ,यांचे जाणीव जागृती येईल आणि एक ना एक दिवस क्रांती करतील,आणि हा वर्गीय आणि जातीय धर्मीय समाज व्यवस्था उद्ध्वस्त करतील,तेंव्हाच सारे जग पर्यावरण युक्त समता मूलक बंधुभावाचे जीवन जगेल.यासाठीच संत,महामानव, दृष्टये पुढारी,कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.आशा ठेऊ आज ना उद्या जग बदलणार च . _. लेखक : दत्ता तुम वाड.सत्यशोधक समाज नांदेड.दिनांक: 28 मे 2024.फोन: 9420912209.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!