देशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

स्वाभिमान दाखवला की खून करणार असाल तर या पुढे स्वाभिमानी नर शिल्लक राहतील काय?

समाज माध्यमातून साभार

शहीद करकरे यांच्या स्वाभिमानी स्वभावाने स्वकीय अतिरेक्यांनी त्यांचा बळी घेतला. आता किती करकरे शिल्लक असतील हा संशोधनाचा भाग आहे. स्वाभिमान दाखवला की खून करणार असाल तर या पुढे स्वाभिमानी नर शिल्लक राहतील काय? हा खरा प्रश्न आहे. गोध्रा कांडाला जबाबदार असणाऱ्यांचा कर्दनकाळ असलेले स्वाभिमानी आय पी एस अधिकारी इमानदारी दाखवायला गेले आणि आयुष्यभर तुरुंगात डांबले गेले. इथली न्याय व्यवस्था कुठे आहे, बर्फा सारखी थंडगार होऊन बसणार आहे की, देशातील देशाच्या गद्दाराना यमसदनी पाठवणार आहे. इथे देशाबद्दल कुणाला काही देणे घेणे नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जो तो या खूनी ड्रॅक्युलांच्या तावडीत न सापडता आपापला जीव कसा वाचेल याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मग पोलिस शिपाया पासून ते सर्वोच्य न्यायालया पर्यंत हेच चित्र बघायला मिळत आहे. सगळीकडे यांच्या विरोधातील तलवारी म्यान झालेल्या आपण बघतो आहोत. सामान्य माणसांच्या हाती धर्माचा खुळखुळा देऊन त्याची मती गुंग करण्यात आली आहे त्याला धर्म राष्ट्रा पेक्षा प्रिय वाटतो आहे. त्याची अशी समजूत केली आहे की राष्ट्रा असो अथवा नसो धर्म असला पाहिजे मग पुन्हा देश गुलाम झाला तरी चालेल पण धर्म मेला नाही पाहिजे. देश जेव्हा जेव्हा गुलाम झाला तेव्हा सामान्य माणसं धर्मालाच चिकटून बसलेली आपण पाहिली आहेत मग आपण गुलाम झालो किंवा कसे याच्या बाबतीत कुणाला काही देणे घेणे नव्हते. हा गुलाम झाल्यावर शतकोत्तर आम्हाला जाग आली खरी पण ती सुद्धा जेव्हा धर्माच्या ठेकेदारांची ठेकेदारी संपुष्टात आली तेव्हा. देशाच्या गद्दाराना हिंदू राष्ट्र आणावयाचे आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे हे जनतेने समजून घेतले पाहिजे. सद्या हे राष्ट्र हिंदुराष्ट्र नाही तर मुस्लिम राष्ट्र आहे का? याचा विचार झाला पाहिजे की नको. मग हे राष्ट्र हिंदुराष्ट्र असताना सुद्धा हे म्हणतात हिंदूराष्ट्र करायचे आहे याचा अर्थ असा आहे की, हिंदू राष्ट्राला ब्राह्मणी राष्ट्र करायचे आहे आणि सर्वंकष सत्ता पुन्हा ब्राम्हणांच्या हातात घ्यायची आहे हा डाव ओळखला पाहिजे. ते सतत सरडा रंग बदलतो तसे सरड्या सारखे धर्म बदलतात त्यांचा धर्म कधी ब्राह्मण असतो, कधी हिंदू असतो, कधी सनातनी असतो ही लबाडी ओळखा तरच देशासाठी बलिदान देणारे जहाँ मर्द यांना न्याय मिळेल आणि निधड्या छातीने मर्द समोर येतील नसता अगोदर मोगलांच्या, नंतर इंग्रजांच्या आणि आता पुन्हा ब्राह्मणांच्या गुलामीत खितपत पडलेच म्हणून समजा.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!