अपघाती मृत्यू झालेल्या संगणक अभियंत्याच्या कुटुंबीयांना दोन कोटी ४४ लाखांची नुकसान भरपाई,,

लोकअदालतीत दावा निकाली,
पुणे:*अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या संगणक अभियंत्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला आहे.
लोकअदालतीत दावा निकाली काढण्यात आला.
तडजोडीत संगणक अभियंत्याच्या कुटुंबीयांना दावा दाखल केल्यापासून एक वर्षांच्या आत दोन कोटी ४४ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळाणार आहे.
मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे प्रमुख सदस्य मे.जिल्हा, सत्र न्यायाधीश बी.पी.क्षीरसागर आणि ॲड.अतुल गुंजाळ यांच्या पॅनलसमोर झालेल्या सुनावणीत दावा निकाली काढण्यात आला.
दुचाकीस्वार ३३ वर्षीय संगणक अभियंता ४ फेब्रुवारी २०२४ रोजी सिंहगड रस्त्याने निघाला होता.
त्याच्यासोबत मित्र होता.
खडकवासला धरण परिसरातून विरुद्ध दिशेने आलेल्या टेम्पोने दुचाकीला धडक दिली.
अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या संगणक अभियंत्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचारांदरम्यान त्याचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.
त्यानंतर संगणक अभियंत्याची पत्नी, आई, बहिण आणि भाच्यांनी टेम्पोच्या विमा कंपनीविरुद्ध दावा १९ एप्रिल २०२४ रोजी मोटार अपघात न्यायप्राधिकरणाता दावा दाखल केला होता.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत