महाराष्ट्रमुख्यपानराजकीय
फडणवीस,महाजन तुमची कसोटी!

शिवराम पाटील
मराठा आरक्षणाचे वारे वाहात आहेत.वाऱ्याची दिशा वारंवार बदलल्यामुळे ते वादळ बनले.या वादळात गिरीश महाजन यांनी आपली आरती लावून घेतली.आश्वासन देऊन असो कि धमकी देऊन असो , आंदोलन तीन वेळा गुंडाळले.म्हणे आम्ही आरक्षण देऊ.आरक्षण म्हणजे जसे किराणा दुकानातील बिस्कीट आहे कि मामाच्या दुकानातील संत्रा आहे?मागणारे हक्क समजतात.देणारे बिस्कीट समजतात.तरी पण जर आश्वासन दिले आहे तर ते पार पाडलेच पाहिजे.नाहीतर चिटींग झालेले आंदोलन करणारे मराठे फडणवीस आणि महाजन यांच्या डोक्यावर केस उगवू देणार नाहीत.आत्ताच लोकसभेत कान कापून हातात दिला आहे.
आता तिसऱ्यांदा भाजपचे नरेंद्र मोदी हिंदुस्थान चे शहेनशहा बनले आहेत.सिंहासनाची कल्हई उतरली असली तरीही हात पाय बरे आहेत.बसू शकतात.आता लोकसभेचे अधिवेशन चालू आहे.लोकसभा म्हणजे कबड्डी,खो खो चे मैदान नाही.तो तमाशाचा ,जलशाचा आखाडा नाही.तेथे कायदे बनवले जातात.कायदे दुरूस्त होतात.कायदे रद्द होतात.असे अनेक कायदे मोदींनी मनमानी करुन तालिबानी पद्धतीने करवून घेतलेत.विरोधकांना इडी नोटीसची झेरॉक्स दाखवून चूप बसवले.तर मग मराठा आरक्षणाचा कायदा करून घेतला पाहिजे.जर तसे केले नाही तर पुन्हा फडणवीस महाजन भाजप यांना पंकजा मुंडें सारखा सन्मान करतील.मराठाच काय ,इतर जाती जमाती सुद्धा विश्वास ठेवणार नाहीत.महाजन यांच्या जामनेर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान मराठ्यांचे आहे.त्याहून निम्मा बंजारा समाजाचे आहे.दोन्ही समाजाला महाजन यांनी बगलेतून पुड्या पाजलेल्या आहेत.त्याचा क्युअरींग इफेक्ट ऐवजी साउंड इफेक्ट झाला आहे.जर महाजन खोटे पडले,लबाड साबित झाले तर महाजन यांना पुन्हा जामनेर मतदारसंघात निवडून देणार नाहीत.मतदारसंघ बदलून घ्यावा लागेल.
गिरीश महाजन अनेकदा आमदार झाले.मंत्री झाले.त्यांनी विधानसभेत अजूनही एकही प्रस्ताव मांडलेला नाही.आमदार म्हणून कोणताही आवाज काढलेला नाही.इकडच्या सोंगट्या तिकडे, तिकडच्या सोंगट्या इकडे फिरवणे हे आमदाराचे, मंत्रीचे काम नाही.जे महाजन करीत आले आहेत.इकडची शाक भाजी तिकडे आणि तिकडची मटण मुर्गी इकडे करणारा माणूस शातीर असतो.विधानसभेत महाजन यांचे काहीच काम नाही .काहीच गरज नाही.जा निघा,दिल्लीत जा.
फडणवीस आणि महाजन यांनी महाराष्ट्र विधानमंडळात न बसता दिल्लीत लोकसभा समोर ठाण मांडून बसले पाहिजे.मोदी साहेब,काहीही करा.मराठ्यांना आरक्षण द्या.कसे ही द्या, कोठूनही द्या.भारतात द्या किंवा चीन पाकिस्तान मधे द्या.पण द्याच.नाही दिले तर आम्ही विधानसभा निवडणुक लढवणारच नाहीत.प्रचाराला गेलो तर लोक शेण मारतील.आम्हाला खोटारडे,लबाड लांडगा म्हणतील.आता तुम्ही आमच्या पेक्षा जास्त चलाख आहात. गुरूजी,चेल्यांना वाचवा.आम्ही किती वेळा खोटे बोलायचे?केंव्हातरी उघड होईलच.आता मात्र आमची महाराष्ट्रात खैरियत नाहीत.लबाडीचे राजकारण संपले.आम्ही संपलो.
… शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव
२८/६/२०२४
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत