इतिहासाच पुनरलेखण झालं पाहिजे

- सुषमा अंधारे –
( राहुल हंडोरे यांजकडून )
अंबरनाथ दि. 20 फेब्रुवारी
छत्रपती शिवाजी महाराज यांचे बद्दल चुकीचे विधाने केली जात आहेत. आक्षेपारहं लिखाणे केली जात आहेत या कारणास्तव इतिहासाचे पुनरलेखन झाले पाहिजे, इतिहास विकृत करणाऱ्या विरोधात कारवाई झाली पाहिजे असे उदगार गणराज्य संघाच्या संस्थापक अध्यक्षा सुषमा अंधारे यांनी अंबरनाथ येथील मेटलनगर विभागातील अण्णाभाऊ साठे सभागृहात प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना काढले. अध्यक्षस्थानी नितीन इनकर होते.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून अंबरनाथ येथे गणराज्य संघाची स्थापना व विभागीय कार्यालयाचे उदघाटन सोहळा या प्रसंगी सुषमा अंधारे या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास मांडण्याचे भाष्य केले होते परंतु प्रथम दर्शनी हा गुन्हा होत नाही असे पुण्याचे पोलीस अधीक्षक यांनी म्हटले आहे त्यास अप्रत्यक्ष रित्या शासनाने क्लीन चिट दिली आहे. महाराष्ट्राचे भूतपूर्व राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे बद्दल अवमानकारक टिप्पणी केली होती त्याला सुद्धा महाराष्ट्र शासनाने क्लीन चिट दिली होती. शिवरायांचा अवमान होत असतांना भाजपा गप्पगार का आहे असा प्रश्न ही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.
गणराज्य संघाच्या अंबरनाथच्या अध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची तर ठाणे जिल्हा अध्यक्षपदी महेश इनकर यांची नियुक्ती घोषित केली. विकास गांगुर्डे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर महेश इनकर यांनी प्रास्तविक केले. अक्षय माने यांनी आभार प्रदर्शन केले. या प्रसंगी योगेश चालवादी, आक्रमखान, अनिल गायकवाड, संजली गायकवाड, युवानेते गागुर्डे, आदिनी आपले विचार मांडले. शितल भंडारे आणि संच यांनी शाहिरी जलसा कार्यक्रम सादर केला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत