देश-विदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

हिंदू मुस्लिम : एकी बेकी

जगाच्या पाठीवर अनेक देशात इंग्रज पोर्तुगीज डच फ्रेंच यांचे राज्य होते.यांनी व्यापाराचे निमित्त करून विविध देशात वसाहती स्थापन केल्या ,आणि कालांतराने त्या त्या देशावर आपली सत्ता स्थापन केली.यात इंग्रजी सत्ता आघाडीवर होती.असे म्हणतात की,इंग्रज सत्तेत सूर्यच मावळत नव्हता,याचा अर्थ पृथ्वीच्या गोलार्धातील पूर्व पश्चिम भागातील देशावर त्यांचीच सत्ता होती. एव्हढा साम्राज्यवादी इंग्रज राणी व्हिक्टोरिया होती.तिची सत्ता हटविणे सोपे नव्हते.पण कालांतराने ते सोपे झाले.कारण सर्व वसाहतवादी देशातील सर्वच जनता इंग्रज डच फ्रेंच या परकीय साम्राज्यवादी राजा विरोधात बंड करून उठली.आपल्या देशात बन 1857 ले पाहिले सैन्यातील शिपायचे बंड,नंतर नाविक सैन्याचे बंड झाले.आणि स्वातंत्र्याचा पाया रचला गेला.आपल्याच देशात नव्हे तर संपूर्ण जगात इंग्रज राजवटीविरुद्ध त्या त्या देशांची जनता बंड करायला लागली,म्हणून इंग्रज राणीचा आत्मविश्वास धैर्य खचले.आणि तिने ज्याचे त्यांना स्वातंत्र्य बहाल करण्याचे ठरविले.
इकडे भारतात इंग्रज सरकारनेच भारतीयांची संघटना स्थापन केली,तिचे नाव ” काँग्रेस ” ठेवले.या काँग्रेस मध्ये हिंदुत्ववादी टिळक हेडगेवार,सावरकर,जिना गांधी एम.एन.रॉय ही मंडळी मागे पुढे होती.याच काँग्रेस नी पण स्वातंत्र्याची मागणी आणि नंतर स्वातंत्र्याची लढाई सुरू केली.
परंतु काँग्रेसमधील नेत्यात मतभिन्नता होती.जर भारत स्वतंत्र झाला तर स्वतंत्र भारतात सत्ता कुणाची असेल ? यावरून वादाला तोंड फुटले.हेडगेवार आणि सावरकर म्हणाले ” स्वतंत्र भारतात हिंदुराष्ट्र म्हणून असले पाहिजे,जिनाने द्वि राष्ट्रवाद ची मागणी केली,हिंदू मुस्लिम यांचे स्वतंत्र राष्ट्र असावे,असे ते म्हणाले,गांधी आंबेडकर सहिष्णू धर्मनिरपेक्ष राष्ट्राची कल्पना नव्हे मागणी नव्हे हट्ट धरला.एम एन रॉय कम्युनिस्ट होते,त्यांनी समाजवादी धर्मविहिन राष्ट्राची मागणी केली.या सर्वांचे मत एक नव्हते ,तरी एकत्र इंग्रजांविरुद्ध होते.याचे कारण सर्वजण ” साम्राज्यवाद ” या तत्त्वाचे किंवा संकल्पनेच्या विरोधी होते.या एका गोष्टीवरून सारे एक होते. नंतर विभक्त झाले.याचे कारण,
गांधीजींनी ” हिंदू मुस्लिम ऐक्याची ” घोषणा दिली,हे ऐक्य आर एस एस चे गोळवलकर ,हिंदुमहसभेचे सावरकर,मुस्लिम लीग चे जेना यांना मान्य नव्हते.परंतु हा विचार कम्युनिस्ट आणि देशातील आम् जनतेला मान्य होता,म्हणून हे गांधीजींच्या लढ्यात भाग घ्यायला लागले.सावरकर जेनाच्या मागे हिंदू मुस्लिम गेले नाहीत.त्यांचे नेतृत्व स्वीकारले नाहीत.हिंदुं मुस्लिम ऐक्य झाल्यामुळे आणि कम्युनिस्ट यांचा सशस्त्र लढ्या मुळे आणि जागतीक युध्दा मुळे साम्राज्यवादी बलाढ्य इंग्रज सरकार हादरले,आणि स्वातंत्र्याची लढाई यशस्वी झाली.
हा स्वातंत्र्याचा इतिहास पाहता स्वातंत्र्याच्या लढाईत प्रथम सहभाग असलेले सावरकर हे नंतर लढाईच्या उत्तरार्धात बाजूला झाले.कारण स्वातंत्र्या नंतर काँग्रेस सत्तेत.येईल आणि हिंदुराष्ट्र होणार नाही,तर हिंदू मुस्लिम ऐक्याचेच राष्ट्र असेल हे त्यांना समजले होते,म्हणून त्यांनी अंग काढले.इंग्रजाच्या फितवणी वरून जिना स्वातंत्र्य लढ्यात टिकले,कारण त्यांना स्वतंत्र पाकिस्तान देण्याचे इंग्रजांनी आश्वासन दिले होते.सारी म्हणजे बहुसंख्य हिंदू गांधींच्या मागे होते,म्हणून सावरकर गोळवळकरचा नाईलाज झाला. जिनांचा हेतू साध्य झाला,पण गोळवलकर सावरकर नाराज झाले.ती नाराजी लोकशाही निवडणुकीचा फायदा उठाऊन 90 वर्षानंतर का होईना त्यांनी सत्ता काबीज केली.आता सत्ता हाती असल्यामुळे पोलिस,कर्मचारी,अधिकारी,सैन्य यांचे हातात असल्यामुळे यांचा वापर करून यांना हवा असलेला हिंदुराष्ट्र नक्कीच स्थापन करणार आहेत.
परंतु त्याचे दुष्परिणाम होऊन तेही टिकणार नाही.कारण या देशात दलीत,sc st ओबीसी हा बहुजन समाज मोठा आहे,संविधानाने यांना समजिक संरक्षण आणि आरक्षण दिले आहे,संविधानाने या बहुजनांचे शिक्षण ,रोजगार,आरोग्य याची काळजी घेतली आहे,हे सर्व मनुस्मृती च्या द्वारे नष्ट होणार आहे.कारण हे सरकार मनुस्मृतीचे कायदे राबवणार आहे,असे त्यांचे हितकारक,प्रवक्ते,प्रतिनिधी उघडपणे बोलून दाखवीत आहेत.
बहुजन समाज परत बंड करून उठेल,प्रतिक्रांतीला विरोध करतील,क्रांती करतील,परत हिंदुमुसलिम एकी करतील आणि आपले हातून गेलेले आपले स्वातंत्र्य परत मिळ वितील हे नक्कीच.
लेखक : दत्ता तुम वाड,सत्यशोधक समाज नांदेड.दिनांक : 21 फेबृ.2025.फोन: 9420912209.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!