डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीर उभा राहाणाऱ्या त्यागमुर्ती माता रमाईचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन यूवक युवतीने मार्गक्रमण करावे

नळदुर्ग शहरात विविध ठिकाणी त्यागमुर्ती रमाईला अभिवादन
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्यात माता रमाईने खुप मोठे योगदान दिले आहे
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र प्रयत्न करून देशासाठी
बलाढ्य महान संविधान तयार केले डॉ बाबासाहेब आंबेडकर हे बाहेर देशात उच्च शिक्षणासाठी गेले आसता आपल्या मेहनतीच्या कमाईतून आपल्या पतीला देत आसतं परदेशात आसताना रात्रंदिवस प्रंपचाची काळजी केली नाही अत्यंत मनमिळाऊ सुशिल , होत्या आपल्या मुलांचं निधन झाल तरी ही देशाच्या आणि समाजाच्या हितासाठी बाबासाहेबांना मदत करीत राहिल्या त्या महान त्यागमुर्ती माता रमाईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नागरीक यूवक व युवतीनी मार्गक्रमण करावे आसे प्रतिपादन तुळजाभवानी विद्यामंदीर तुळजापूर येथील मुख्याध्यापिका
सुरेखा साळुंके यांनी केल्या
नळदुर्ग येथे जिल्हा परिषद कन्या प्रशालेत माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वार्षिक स्नेह सम्मेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळेस त्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तज्ञ शिक्षक तथा पत्रकार ॲड पांडुरंग पोळे , बसवेश्वर हायस्कुल जेवळी येथील नुतन प्राचार्य महादेव भोसले पत्रकार दादासाहेब बनसोडे उपस्थित होते . डॉ आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लीश मिडीयम स्कुल चे प्रमुख मुख्य प्रवर्तक मारुती खारवे ,जी एम चौक डॉ आंबेडकर नगर भिमनगर इंदिरानगर त्यागमुर्ती माता रमाईच्या प्रतिमेचे पूजन करून पेढे व लाडु वाटत करण्यात आले अजयकुमार बागडे यांच्या कडून शालेय उपयोगी वस्तुचे वाटप करण्यात आले . प्रमोद लोंढे यांच्या कडून भारतीय संविधानाचा ग्रंथ देऊन दादासाहेब बनसोडे यांनी मान्यवरांचा सत्कार केला यावेळी रि पा ई जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे कार्याध्यक्ष
महादेव कांबळे , मधुशिला बागडे उमेश गायकवाड ,पपू कांबळे आय्यापा भांगे , पार्वती वाघमारे , मिरा थोरात , कार्तिक बनसोडे , सह अनेक नागरीक उपस्थित होते .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत