महाराष्ट्र संताची भूमी आणि स्वराज्याची रयत तुमच्या बाप दादाची मालमत्ता नाही.

हरिदास भिसे पुणे.
मो. 9923742372
महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्यामध्ये संतांच्या पवित्र भूमीत विदेशी ब्राह्मणांनी नंगानाच मांडलेला असून खूप खतरनाक धुमाकूळ घातला जात आहे याचे येणाऱ्या पिढीवर खूप मोठा परिणाम होऊन पुढच्या शंभर पिढ्या तरी गुलामीत जगतील याबद्दल तीळ मात्र शंका नाही. म्हणून बहुजन समाजातील मराठा, एस्सी, एसटी, ओबीसी, आणि मायनॉरिटीज लोकांनी एकत्र येऊन जागृत झालं पाहिजे आणि ही ब्राह्मणी व्यवस्थेची पेशवाईची सत्ता उलटून टाकली गेली पाहिजे तरच छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य टिकून राहील. अन्यथा याला आपण सर्वजण जबाबदार आहोत याची इतिहासामध्ये नोंद घेतली जाईल म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांशी गद्दारी केली असाच त्याचा अर्थ होईल. विदेशी ब्राह्मणांच्या सत्तेमध्ये महाराष्ट्रात काय काय घडत आहे याचचे विश्लेषण आपण लेखात पाहणार आहोत. 9 ऑक्टोबर 2024 ला भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांचा दिवसाढवळ्या कुऱ्हाडीचे घाव घालून संगलीमध्ये खून करण्यात आला. त्याच दिवशी शिरूरच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अशोक पवार यांचा मुलगा ऋषिकेश पवार यांचे अपहरण करून, त्याला विवस्त्र करून एक महिलेसोबत त्याचे अश्लील व्हिडीओ-फोटो शूट करून त्यांना 10 कोटींची खंडणी मागण्यात आली. पण एक मित्राच्या मदतीने त्या मुलाने स्वतःची सुटका करून घेतली. पुण्यातील भाजपचेच आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची हडपसर भागातून अपहरण करून हत्या करण्यात आली. 12 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते आणि आमदार झिशान सिद्दीकी चे वडील बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. निवडणुकीदरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या गादीवर हल्ला होऊन ते जखमी झाले. लोकसभा निवडणुकीनंतर निलेश लंके यांचा पीए निलेश झावरेवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केला. नांदेड मध्ये तर देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात पोस्ट टाकली म्हणून लोहा तालुक्याचे ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख संतोष वडवळे यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी फार्महाऊसवर नेऊन बेदम मारहाण केली आणि त्याची दोन बोटेच तोडली. पण इथे गुन्हेगार सुरक्षित आहेत. लाडक्या बहिणीच्या नावाने गळे काढून काढून ओरडणाऱ्या ह्या सरकारच्या काळात गेल्या फक्त 8 महिन्यात महाराष्ट्रातून 26000 महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत. म्हणजे दर महिन्याला 3250 मुली-महिला बेपत्ता आणि दररोज 108 मुली महिला राज्यातून बेपत्ता होत आहेत. दररोज राज्यात महिला अत्याचाराच्या 121 तक्रारी दाखल होतात. पण सांगायला इथे महिला सुरक्षित आहेत. बदलापूर मध्ये चिमुकलीवर अत्याचार झाला. आरोपीचे एन्काऊंटर करण्यात आले मात्र संस्थाचालक आरएसएस शी संबंधित असल्यामुळे त्यांना लागलीच जमीन देण्यात आला आणि पुढेही त्यांना धक्का लागेल अशी शक्यता नाही. नवी मुंबईतील एनआरआय पोलीस स्टेशन हद्दीतील राहणारी 30 वर्षीय विवाहित महिला 6 जुलै 2024 रोजी सकाळी शिळफाटा घोळ गणपती मंदिरात पूजेसाठी गेली. या मंदिरात श्यामसुंदर प्यारचंद शर्मा (वय ६२, कोटा, राजस्थान), संतोष कुमार रामयज्ञ मिश्रा (४५) रा. प्रतापगड, यूपी, राजकुमार रामफेर पांडे (५४) रा. प्रतापगड, यूपी या तीन पुजाऱ्यांनी तिला भांग मिश्रित चहा दिला. शुद्ध हरपलेल्या पीडितेवर रात्रभर या पुजाऱ्याच्या वेषातील नराधमांनी आळीपाळीनं सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर त्यांनी पीडितेला मंदिरामागील बाजूस खोल दरीत नेऊन तिची हत्या केली. भर मंदिरात हिंदू स्त्रियांवर पुजाऱ्यांद्वारे च बलात्कार व हत्या होत आहेत हे पाहून खरंच हिंदू धोक्यात असल्याची खात्री पटते.
कल्याणमध्ये तेरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. भिवंडी बायपास हद्दीत कब्रस्थान जवळ तिचा विवस्त्र मृतदेह आढळून आला. पुणे जिल्ह्यातील राजगुरू नगरमध्ये दुर्गा मकवाने- कार्तिकी मकवाने या दोन लहान बहिणींची हत्या करण्यात आली. शहराबाहेर या दोघींचे मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत सापडले. पुण्यातीलच धनकवडी परिसरातून 16 वर्षीय मुलीचं तिच्या आईसमोर डोक्याला बंदूक लावून अपहरण करण्यात आलं. पुण्यातीलच मावळ तालुक्यात विसापूर किल्ला परिसरात पोलीस बंदोबस्तात असणाऱ्या सचिन सस्ते नावाच्या पोलिसाने चॉकलेट चे आमिष दाखवत एका 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला. यासोबतच पुण्यातीलच कोयता गॅंग महाराष्ट्रभर सर्वश्रुत आहेच.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या मस्साजोग गावचे सरपंच आणि भाजपचे बुथप्रमुख संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर रोजी अपहरण करून त्यांची अतिशय निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली होती. कारण काय तर एक पवनचक्की प्रकल्पात खंडणी मागण्यास विरोध केला. या प्रकरणातील वाल्मीक कराड, सुदर्शन घुलेसह चार फरार आरोपींच्या शोधासाठी सीआयडीची नऊ पथके आणि १५० पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले. फडणवीस रोज म्हणायचे की आम्ही कुणालाच सोडणार नाही पण तब्बल २२ दिवस उलटूनही हे आरोपी सापडले नाहीत. शेवटी 23 व्या दिवशी वाल्मिक कराड हा आरोपी पुण्यामध्ये पोलिसांना शरण आला. (पोलीस शोधू शकले नाहीत). त्यानंतर ४-५ दिवसांनी पुण्यातूनच यातील आरोपी घुले आणि सांगळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हे सर्व पुण्यातूनच कसे घडले ते विचारू नका. आज या प्रकरणातील आरोपी वाल्मिकी कराड यावर 10 गंभीर गुन्हे दाखल असूनही त्याला पिस्तूलाचा परवाना मिळाला आणि सरकारी सुरक्षा सुद्धा मिळाली. 12 डिसेंम्बर ला गुन्हा घडला आणि 13 डिसेंम्बर ला हा कराड मध्यप्रदेशातील उज्जैन मंदिरात होता. तेथील फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले. त्या फोटोत कराड चे सुरक्षारक्षक दिसत आहेत. मग पोलिसांना त्याचवेळी त्या सुरक्षा रक्षकांना आदेश का दिले नाहीत की वाल्मिक कराड ला अटक करून घेऊन या म्हणून❓ हे सर्व गृहखात्याच्या मेहरबानी शिवाय शक्य आहे❓ बर मृत संतोष देशमुख हे भाजपचे बुथप्रमुख पण एक आ. सुरेश धस सोडले तर इतर कुणीही भाजप-आरएसएस नेता या प्रकरणावर आक्रमक होताना दिसत नाही. सरकारी वकिलही संतोष देशमुखांची बाजू मांडण्यापासून माघार घेतात, किती ती दहशद❓10 डिसेंम्बर 2024 रोजी परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली होती. यानंतर हिंसाचार उफाळला. यावेळी केलेल्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये अटक करण्यात आलेल्या सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या तरुणाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. पोलिसांनी हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले पण शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवालात सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूचे कारण Shock following multiple injuries असे नमूद करण्यात आले आहे. यावरुन परभणी पोलिसांच्या कोठडीत त्याला जबर मारहाण झाल्यामुळेच त्याचा मृत्यू झाला हे स्पष्ट होतेय. पण राज्य (फडणवीसांच्या) अनाजी पंताच्या हातात अगदी सुरक्षित आहे. बिडच्याच अंबेजोगाई मध्ये 25 डिसेंम्बर 2024 रोजी चक्क पोलीस चौकीसमोर जमीर शेख नावाच्या तरुणावर चाकु आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. 20 डिसेंम्बर 2024 रोजी पुण्यातील वारजे परिसरात एक टोळक्याने कुऱ्हाडीने आणि कोयत्याने अक्षय राजेंद्र कांबळे नावाच्या युवकाचा डाव्या हाताचा कोपरा आणि उजव्या हाताची मनगटच कापून वेगळे केले. यानंतर 26 डिसेंम्बर 2024 रोजी तुळजापूर मधील मिसाई जवळगावचे सरपंच नामदेव निकम यांच्या गाडीवर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. यात सरपंच व त्यांचा भाऊ जखमी झाला. मस्साजोग प्रकरणात तातडीने कठोर कारवाई झाली असती तर कुणाची अशी हिम्मत झाली नसती पण तसे काही होण्याची शक्यताच नाही. आता 2 जानेवारी 2025 रोजी मुंबईच्या घणसोली परिसरात दोन लोकांनी धावत्या लोकल मध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय चव्हाण यांची हत्या केली आणि समोरून येणाऱ्या दुसऱ्या लोकल समोर त्यांचा मृतदेह फेकून दिला. कल्याणमध्ये परप्रांतीय कुटुंबांनी मराठी कुटुंबांना बेदम मारहाण केल्याचा दोन घटना घडल्या आहेत आणि एक घटनेत तर मराठी पोलीस कुटुंबाला गुंडांचा मार खावा लागला आहे. इतिहासात पहिल्यांदा गृहमंत्री फडणवीसांच्याच कार्यकाळात आळंदी येथील वारीत वारकऱ्यांवर पोलिसांचा अमानुष लाठीमार झाला. शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असलेल्या महिला-माणसांवर अंतरवाली सराटी येथे पोलिसांचा लाठीचार्ज झाला. आता आपल्या अतिसक्षम गृहमंत्र्यांचा जिल्हा म्हणजे नागपूर किती सुरक्षित आहे ते पाहू. फक्त एकाच महिन्यात म्हणजे डिसेम्बर 2024 मध्ये तीन अज्ञात लोकांनी एकाला भोसकून त्याचा मृतदेह धंतोली परिसरात फेकून दिला. पोलीस अजून मृताची ओळख पटवू शकले नाहीत. दुसरी घटना अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. वडील आणि मुलाचा खून झाला. तिसरी घटना जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ख्रिश्चन कब्रस्थानच्या चौकीदाराचा अज्ञात व्यक्तीने चाकूने भोसकून खून केला. चौथी घटना कळमना मध्ये आपल्या वहिनीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या मित्राचा एका युवकाने खून केला. पाचवी घटना गांधींबाग परिसरात कालिमाता मंदिरासमोर रवी राठोड व दीपक राठोड या दोन भावांचा खून झाला. ह्या घटना धरून *एकट्या फडणवीसांच्या नागपूर मध्ये 5 दिवसात 6 खून झाले.* पण सरकार किंवा जनतेला याबद्दल अजिबात गांभीर्य नाही. नागपूर शेजारचा अमरावती जिल्हाही मागे नाही. अमरावती मध्ये 20 दिवसांमध्ये तब्बल 7 हत्या झाल्यात. आ. नितेश राणे हे जाहीर सभांमधून कार्यकर्त्यांना बोलतात की "तुम्ही मॅटर करून टाका आणि झाल्यावर सांगा, तुम्हाला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आमची आहे, आपलं कुणी काही वाकडं करू शकत नाही, आपला बॉस सागर बंगल्यावर (गृहमंत्री फडणवीसांचा बंगला) बसलेला आहे." एक ठिकाणी तर ते पोलिसांना म्हणतात जास्त मस्ती कराल तर अशा जागी पाठवून देऊ की बायकोचा फोन पण लागणार नाही. आणखी एका सभेत ते कार्यकर्त्यांना म्हणतात की "इथे किती पोलीस आहेत❓आणि आपण किती आहोत❓ आतमध्ये घेऊन गेलो तर यांचे थोबडे सुजवून बाहेर येतील" इतक्या स्पष्ट आणि जाहीर धमक्या पोलिसांना या अगोदर कधीच कुणीच दिल्या नाहीत आणि पोलिसखातं सुद्धा इतकं लाचार कधीच नव्हतं. सरकारचा पाठिंबा जाऊ द्या पण जनतेलासुद्धा असे आरोपी जेव्हा हिरो वाटायला लागतात तेव्हा ही मोठ्या धोक्याची सूचना आहे हे समजून घेतलं पाहिजे. यांचेच बॉस आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काही महिन्यांपूर्वी भाजपच्या पक्ष कार्यक्रमात कार्यकर्त्यांना जाहीर सांगतात की "आज तुम्हाला परवानगी देतो, आदेश विचारू नका, मैदानात उतरा आणि (विरोधकांना) ठोकून काढा." हे अत्यंत धक्कादायक आहे. एक गृहमंत्री-उपमुख्यमंत्री हे बोलतोय. असा गृहमंत्री नाही तर अशा मानसिकतेचा नेताच कधी या देशात कुठल्याच पक्षात नव्हता. गेल्या विधानसभा निवडणुकीत फडणवीसांच्या विरोधात उभे असलेले उमेदवार जाहीर सभांमध्ये सांगत होते की, "मी निवडून आलो तरी माझ्या आणि माझ्या परिवाराच्या जीवाला धोका आहे." हे फडणवीसांबद्दलचे उद्गार ऐकून तुमच्या लक्षात येईल की ही कोणत्या वृत्तीची माणसे आहेत❓महाराष्ट्राचा बिहार करून टाकला अशी जी बिहारची उपमा लोक देतात त्याऐवजी आता महाराष्ट्राची उपमा देतील इतकी वाईट परिस्थिती आहे.. मी याठिकाणी फक्त ठळक गाजलेली आणि गेल्या ४-५ महिन्याच्या आतीलच प्रकरणे याठिकाणी मांडली आहेत. इतर अनेक प्रकरणे जागेअभावी मांडू शकलो नाही. इतकी प्रकरणे इतर कोणत्याही सरकारमध्ये घडली असती तर यांनी केव्हाच ते सरकार पाडून टाकले असते. वरून ह्यांचा आणि नैतिकतेचा दुरदुरपर्यंत संबंध नाही त्यामुळे जबाबदारी घेण्याचाही प्रश्न नाही. फडणवीसांनी गृहखातं हे जनतेची सुरक्षा करण्यासाठी सोडून फक्त पक्षवाढीसाठी, विरोधकांना दडपण्यासाठी, आमदार फोडाफाडी करून सरकार बनविण्यासाठी वापरलं आणि वापरत आहेत. इतर पक्षाचे आमदार फोडणे, शासकीय अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवणे, विरोधकांवर दहशद निर्माण करणे हे सगळं गृहखात्यामुळे सहज शक्य होते आणि म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे कितीही रुसले तरी गृहखातं त्यांना दिलं नाही. कारण उद्या शिंदेंचा पक्षही फोडावा लागू शकतो. रश्मी शुक्ला यांचं बेकायदा फोन टॅपिंग प्रकरण आणि त्यांचं प्रमोशन आपल्याला माहितीच आहे. विरोधकांनी महागाई-बेरोजगारी, अर्थव्यवस्था, महिला अत्याचार, ढासळलेली आरोग्ययंत्रणा, भ्रष्टाचार असा कोणताही प्रश्न विचारला, चुकीच्या धोरणाला विरोध केला की फडणवीसांचा एक प्रसिद्ध डायलॉग आहे की "विरोधकांनी यात राजकारण करू नये." हे देशाच्या स्वातंत्र्यापासून 60-65 वर्षे आरएसएस, जनसंघ, भाजप यांनी तत्कालीन सरकारच्या प्रत्येक गोष्टीला जीवतोडुन विरोध केला. इतकंच काय पण कोरोनाच्या कठीण काळात सरकारला मदत करायचे सोडून ठाकरे सरकारला देता येईल तेव्हढा त्रास दिला. प्रत्येक गोष्टीत राजकारण केलं पण आता त्यांना कुणी विरोधकच नकोय. विरोधकांना सहज दडपता यावं म्हणून ते अर्बन नक्सल कायदा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपला विरोध करणे म्हणजे गुन्हा आणि देशद्रोह होणार आहे. विदेशी ब्राह्मणांची पिल्लावळ आणि पेशवाईचे वारसदार अणाजी पंत गृहमंत्री आहेत तोपर्यंत हा घटनाक्रमाचा आलेख असाच वाढत जाणार आहे. आता बहुजन समाजाने जागे झाले पाहिजे. अनाजीपंताची सत्ता उलथून टाकायची की पेशवाईच्या गुलामीत जीवन जगायचे जनतेनेच ठरवले पाहिजे.
🙏🏻🌹 हरिदास भिसे पुणे.
🙏🏻🌹 !!..धन्यवाद..!!🌹🙏🏻
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत