देशमहाराष्ट्रमुख्यपान

26/11 च्या मुंबई हल्ल्यात वीरमरण आलेल्या अशोक कामटेंचे आठवणीतल क्षण…

मुंबईवर चाल करून आलेल्या दहशतवाद्यांचा सामना करताना  मुंबई पोलीस दलातील अनेक जवान शहीद झाले. हेमंत करकरे, विजय साळसकर आणि अशोक कामटेंसारख्या धडाकेबाज पोलीस अधिकाऱ्यांनाही वीरमरण आलं. देशाच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या अधिकाऱ्यांबाबत लोकांच्या मनात आजही प्रेम आणि आदर कायम आहे. पण एकेकाळी गुन्हेगारी विश्वामध्ये या अधिकाऱ्यांची कमालीची दहशत होती. संबंधित अधिकाऱ्यांचं नाव जरी ऐकलं तरी गुन्हेगार थरथर कापायचे. यामध्ये आयपीएस अधिकारी अशोक कामटे सर्वात पुढे होते. सोलापूरमधील राजकीय गुंडगिरी आणि गुन्हेगारी मोडून काढण्याचं श्रेय अशोक कामटेंना दिलं जातं. यांच्या धाडसाचे अनेक किस्से सांगितले जातात.

सोलापूरमधील राजकीय गुंडगिरी आणि गुन्हेगारी मोडून काढण्याचं श्रेय अशोक कामटेंना दिलं जातं.

२६ नोव्हेंबर २००८ हा दिवस आठवला तरी अनेक मुंबईकरांच्या उरात धडकी भरते. कारण आजच्याच दिवशी पंधरा वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या काही माथेफिरू दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. गोळीबार आणि बॉम्बस्फोटानं संपूर्ण मुंबई शहर हादरलं होतं. नागरिकांनी स्वत:ला घरात कोंडून घेतलं होतं. सर्वत्र पोलिसांच्या हालचाली सुरू होत्या. बाहेर काय घडतंय? याबाबत अनेकांच्या मनात धाकधूक होती. या दहशतवादी हल्ल्यात १७७ जणांचा मृत्यू झाला, तर शेकडो लोक जखमी झाले होते. मृतांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांसह सामान्य नागरिकांचा समावेश होता. या हल्ल्याच्या जखमा आजही मुंबईकरांच्या मनात ताज्या आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!