दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठविदर्भ

परभणी उद्रेक ,,, कारण आणि उपाय?

ऍड अविनाश टी काले अकलूज
9960178213
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
परभणी येथे दोन दिवस उसळलेली दंगल आणि त्याची पार्श्वभूमी तपासली असता , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या जवळ असलेल्या संविधान प्रति कृती वर दगड मारून त्याची विटंबना केली असल्याच्या रागातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा समूदाय रस्त्यावर उतरला ,
त्यांनी रस्त्यातील गाड्या , दुकाने यांना भक्ष केले , इतकेच नाही तर थेट जिल्हाधिकारी कार्यालयात ही घुसून आपले उपद्रव मूल्य , संताप दर्शवून दिला ,
आत्ता शासन कोंबिंग ऑपरेशन राबवून यातील आरोपींना पकडेल आणि त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई ही करेल ,
हा प्रकार घडण्या पूर्वी बांगला देशात तेथील बहुसंख्याक मुस्लिम समुदाया कडून हिंदू अल्पसंख्य जनतेवर जो अन्याय आणि हिंसाचार केला जात आहे त्याचे निषेधार्थ हिंदू संघटनांनी मोर्चा चे आयोजन केले होते ,
नुकतेच सरकार स्थापन झाले आहे , अजून मंत्रिमंडळ वाटप होऊन जबाबदार मंत्री नेमले जाणार आहेत , या पार्श्वभूमीवर वर ही दंगल झाली आहे ,
आदरणीय ऍड प्रकाश जी आंबेडकर साहेब यांनी त्यांच्या ट्विटर वरून अश्या प्रकारच्या विटंबना या नवीन नाहीत , आणि शासनाने 24 तासात दंगेखोर यांच्या वर कारवाई करावी अशी मागणी केली आहे ,,
तर केंद्रीय मंत्री ना रामदास जी आठवले साहेब यांनी ही या प्रकरणाचा निषेध करत असताना या मागील षडयंत्र तपासावे असे आवाहन केले आहे ,,
कांहीं उद्रेकी जनतेने वेगळ्या शंका उपस्थित करत याचे बोट हिंदुत्व वादी संघटना कडे केले आहे आणि भीमा कोरेगाव ची पूर्व तयारी म्हणून हे घडवले जात आहे असे ही म्हटले आहे .
मूळ प्रश्नाची उत्तरे शोधताना आपण ही बाब लक्षात ठेवली पाहिजे की , प्रत्येक कृती मागे हेतू असतो ,
हेतू शिवाय कोणतीच कृती होत नाही ,
आज हिंदुत्व वादी सरकार स्थापित झालेले असताना या सरकारला पेचात पकडण्याचे डावपेच आखले गेले असतील का?
शिवसेना प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी हिंदुत्व वाद्यांच्या मोर्चात “बटेंगे तो कटेंगे” असे नारे लावल्याचे ही म्हणले आहे ,,
या घोषणेची आपत्ती नेमकी कुणाला असावी?
हिंदू म्हणून आणि संस्कृती म्हणून जात व्यवस्थेच्या वर जाऊन धार्मिक ऐक्य व्हावे म्हणून हिंदू संघटनांनी केलेले प्रयास कुणाला आपत्ती का वाटावी ? हा खरा प्रश्न आहे ,
आम्ही आंबेडकरी समाजाला वारंवार सांगत आहोत की , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या हिंदू धर्मा अंतर्गत सुधारणा वाद आणि अस्पृश्यता विरोधी लढ्याला हिंदू विरोधी ठरवण्याची चूक करू नका . आणि हिंदू धर्मियांना शत्रू स्थानी ही टाकू नका .
आंबेडकर वादी समाज स्वाभिमानी आहे , आक्रमक आहे , आणि तो रस्त्यावरची लढाई लढताना मागे पुढे पाहत ही नाही हे वास्तव आहे , पण याच वर्तनाचा गैर फायदा घेऊन त्यांना उचकवण्याचे षडयंत्र कोणी रचत तर नाही ना? हे ही तपासण्याची आवश्यकता आहे ,
भारतीय राज्य घटना ही देशाची घटना आहे , तिचे रक्षण करणे , तिचे पावित्र्य राखणे ही जबाबदारी शासन व्यवस्थेची व देशातील सर्व भारतीय नागरिकांची ही आहे , ती एकट्या नवबौध्द समाजाची नाही .
भारतीय राज्य घटना धोक्यात आहे , तिला नष्ट केले जाणार आहे आणि हिंदू धर्मीय कायदे लागू करून पुन्हा गुलामी चे संकट तुमच्यावर येणार आहे ही भीती मागास वर्गीय आणि त्यात ही नवबौध्द समाजात पसरवण्याचे काम कोण करत आहे?
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या मातीतील धम्म आपल्याला दिला , आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकर देशाशी इमान ठेऊन राहिले ,
घटना प्रदान केल्या नंतर त्यांनी सांगितले नागरिक म्हणून या पुढे तुमच्या मागण्या सनदशीर कायद्याच्या चौकटीच्या अधीन राहून करा , अगदी सविनय कायदेभंग , आणि सत्याग्रह सारखे प्रयोग ही तुम्ही करू नका , त्यांचे अनुयायी उपद्रवखोर कसे असतील?
ज्यांना आंबेडकर वादी पुरोगामी समजतात ते पुरोगामी नाहीत तर अत्यंत प्रखर जातीय वादी , आर्थिक सामाजिक विषमता वादी आहेत , आणि स्वातंत्र्या पासून आज तागयात
आर्थिक समानते साठी त्यांनी कुठलेही उपाय योजले नाहीत ,
सामाजिक पातळीवरील ऐक्य अस्तित्वात यावेत म्हणून ही प्रयास केलेले नाहीत , या उलट सत्तेचे केंद्रीकरण घराणे शाहीत करून याच घराण्याचे संस्थानिक बनवण्याचे काम त्यांनी केले , मागास वर्गीय समाजाच्या तोंडाला अपुऱ्या “अर्थ संकल्पा” ची पाने पुसून त्यांना कायम दारिद्र्य आणि आर्थिक विवंचनेत ठेवले ,
एका जात समुदायाच्या विरोधात दुसऱ्या जात समुदायाला उभे करण्याचे काम केले आणि या विभाजन आणि कुर्वाळने यातून त्यांनी स्वतः साठी स्वर्ग निर्माण केले
या त्यांच्या स्वर्गाला नख लावण्याचे काम हिंदुत्व वादी पक्षाने केले ,, त्याचा राग या कथित पुरोगाम्यांच्या मनात आहे ,
आपल्यात त्यांनी प्रक्षेपित केलेली भीती , आणि यातून निर्माण झालेली आपल्या मनातील असुरक्षित तेची भावना याला हात घालायचा असेल तर डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राज्य घटना यांच्या विटंबना इतके प्रभावी अस्त्र दुसरे असू शकत नाही हे त्यांना माहीत आहे , म्हणूनच हे जाणीवपूर्वक घडवले गेले आहे ,
आपल्या समाजाला पिसाळलेले ठरवायचे आहे , याचे उत्तर दगड फेक , जाळपोळ , आणि हिंसाचार हे असू शकतं नाही ,
केंद्रीय सत्तेचे बळ आपल्या अविवेकी बुध्दी चे लक्षात येत नाही , जिथे खलिस्तान सारखी सशस्त्र चळवळ मोडून टाकली जाते ,
जिथे पोलीस ॲक्शन घेऊन निजाम स्टेट विलीन केले जाऊ शकते , रझाकार गाडले जाऊ शकतात , काश्मीर खोरे शांत केले जाऊ शकते ,
तिथे आपले दगड काय करणार?
झालेल्या घटनेचे आरोपी गाव किंवा शहर होते काय?
दंगल म्हणून सामान्य निरपराध लोकांच्या चारचाकी , दु चाकी , आणि दुकाने यांना टार्गेट करण्याचे कारण च काय?
हे चळवळीच्या कार्यकर्त्यांचे गुण नाहीत , हे समाज कंटकांचे दुर्गुण आहेत , अश्या आपल्या कृतीतून समग्र समाजाच्या रोषाचे धनी आपण बनतोच पण तिरस्कारास ही पात्र बनतो ,,
आंबेडकरी समाजाचा घटक म्हणून मी आपणास विनंती करतो की , आपण आपले जीवन शांततामय रित्या जगण्याचा प्रयत्न करू ,
सदाचार आणि पंच शील या प्रमाणे भ गौतम बुध्दाच्या मार्गाने चालत राहू ,
हिंदू धर्मातील आस्था , श्रद्धा , अंध श्रद्धा त्यांच्या उपासना , रूढी , परंपरा , देवी देवता याच्या चिकित्सा आणि टीका थांबवु ,,
समाज म्हणून आपण या प्रवाहाचे शत्रू न राहता एकमेकाच्या धर्म श्रध्देचा मान राखू ,,, एवढं जरी केलं तरी पुरेसे आहे ,
अधिक काय लिहू ,,,,?
निर्णय तुम्ही आम्ही घ्यायचा आहे ,
जय भीम 🙏🙏🙏🙏🙏🙏
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!