महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

मनोबल


कोणत्याही व्यक्तीचे मनोबल वाढवण्यासाठी, यशस्वी व समाधानासाठी दर रविवारी विहारात सर्व कुटुंबीय गेलेच पाहिजे.
एखाद्या व्यक्तीला तु चांगला हो चांगला वाग असे म्हटल्याने तो लगेच चांगला होईल किंवा लगेच चांगला वागायला लागेल असे नाही. जोपर्यंत त्याची स्वतःची इच्छाशक्ती त्याचे मन (मनोबल)तयार होत नाही तोपर्यंत हे सर्व घडून येऊ शकत नाही.
जेव्हा त्याचे मन मानसिक दृष्ट्या चांगल्या गोष्टींचा स्वीकार करण्यास तयार होते तेव्हाच तो आपल्या इच्छाशक्तीला जागृत करू शकतो व त्याच्याकडुन चांगले कार्य घडुन येऊ शकतात. तो चांगला होऊ शकतो,चांगला वागु शकतो.


आपले आदर्श बोधिसत्व बाबासाहेबांना बघितले तर त्यांचे मनोबल किती उंच होते,strong होते. ते म्हणतात,”माझ्या समाजाची अस्पृश्यता मी नष्ट करू शकलो नाही तर मी स्वतःला गोळी मारून घेईल”…ईतका प्रचंड आत्मविश्वास त्यांना स्वतःवर होता.
जे जे महापुरुष होऊन गेले त्यांचे मनोबल मोठे होते. आपल्यालाही स्वतःत जर परिवर्तन करावयाचे असेल तर मनोबल वाढवावे लागेल. यासाठीच दर रविवारी धम्माच्या अभ्यासासाठी कुटूंबासह वेळ काढावा लागेल.
कारण धम्मच माणसात आत्मविश्वास निर्माण करतो,त्याचे मनोबल वाढवितो.

धम्म संदेश प्रसारक
अशोक तुळशीराम भवरे सिडको, नांदेड.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!