
महिलांना स्वावलंबी करण्यात बचत गटांचा मोलाचा वाटा आहे. स्वातंत्र्याचं शतक महोत्सवी वर्ष देश विकसित राष्ट्र म्हणून साजरं करेल अशी शपथ आपण घेतली आहे. भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात महिलांची भूमिका महत्त्वाची असेल असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या काल राजस्थानमध्ये एका कार्यक्रमात बोलत होत्या. देशातली प्रत्येक स्त्री जेव्हा स्वावलंबी होईल तेव्हाच हे उद्दीष्ट साध्य होईल असं राष्ट्रपती म्हणाल्या. आंतरराष्ट्रीय अभ्यासातूनही हे निदर्शनास आल्याचं त्यांनी सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत