मुसलमानाला स्पर्श केल्याने अशुद्ध असलेला ब्राह्मण, क्षत्रिय, आणि वैश्य शुद्ध होत ?

प्रा. गंगाधर नाखले
मुसलमान हा हिंदू पेक्षाही पवित्र होता , त्याचा स्पर्श केल्याने अशुद्ध असलेला ब्राह्मण, क्षत्रिय, आणि वैश्य शुद्ध होत होता. अशा शुद्ध आणि पवित्र मुस्लिमांबद्दल तिरस्कार का निर्माण करण्यात येत आहे.
एकेकाळी भारतात मुसलमानांना अतिशय पवित्र समजल्या जात होते. अशुद्ध झालेला हिंदू मुसलमानाला स्पर्श केल्यावर तो हिंदू पवित्र होत होता तर मग आज मुसलमानांचा इतका तिरस्कार शत्रुत्व समाजात का निर्माण केल्या जात आहे.
अहमदाबाद मध्ये 14 व 15 एप्रिल 1921 ला संपन्न झालेली सप्रेस क्लास च्या कॉन्फरन्स मध्ये दिलेल्या आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये गांधी म्हणाले होते,”जेव्हा मी जवळजवळ बारा वर्षाचा होतो तेव्हाच माझ्या मनात एक विचार निर्माण झाला होता. एक झाडूवाला अस्पृश्य की ज्याचे नाव उखा होते माझ्या घरी आमची संडास (टट्टी) साफ करीत होता.
मी अनेकदा माझ्या आईला विचारत होतो की त्या व्यक्तीला स्पर्श करणे का योग्य नाही. मला त्याला स्पर्श करण्यापासून का रोखल्या जात आहे. जर कधी अचानक माझा उखाला वर्ष झाला तर मला आपल्या शरीराला शुद्ध करण्यासाठी आणि प्रायचित्त करण्यास सांगितले जात होते.
मी त्यांच्या आदेशाचे पालन करीत होतो, परंतु हसत हसत मी माझा विरोध सुद्धा करीत होतो की अस्पृश्यता धर्माच्या नावावर मान्य होऊ शकत नाही आणि अशी मान्यता मिळणे अशक्य आहे.
मी अतिशय कर्तव्यनिष्ठ आणि आज्ञाधारक मुलगा होतो आणि आई-वडिलांच्या आदेशाचे पालन कडकपणे करीत होतो. अनेकदा या विषयावर माझा त्यांच्यासोबत वादविवाद होत असे. मी माझ्या आईला सांगितले होते की शरीराने उखाणा स्पर्श केल्याने कोणतेही पाप लागत नाही आणि असा विचार करणे चुकीचे आहे.
“मी शाळेत अनेकदा अस्पृश्यांना स्पर्श करीत होतो आणि मी या सत्य घटनेला मी माझ्या आई वडिलांपासून कधीही लपवून ठेवत नव्हतो. माझी आई मला सांगत होती की अस्पृश्य व्यक्तीला स्पर्श झाल्यानंतर स्वतःला शुद्ध करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे-जवळून जात असलेल्या मुसलमानाला स्पर्श करून अशुद्धतेपासून मुक्त होऊन जाने आणि मी नेहमी माझ्या आईचा आदर करीत तिचे म्हणणे मान्य करीत होतो, परंतु मी कधीही विश्वास ठेवला नाही की धार्मिक दृष्टिकोनातून हे आवश्यक आहे.”
येथे फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे की अस्पृश्याला एखाद्या हिंदूचा जर स्पर्श झाला तर त्या अशुद्ध झालेल्या हिंदूला शुद्ध होण्यासाठी मुसलमानाला स्पर्श करावा लागत होता. म्हणजेच मुसलमान त्यावेळी अस्पृश्य म्हणजेच आजच्या ओबीसी एसटी एससी यांच्यापेक्षा तो पवित्र होता.
मग आज मात्र एकेकाळी पवित्र असलेल्या मुसलमानाविषयी तिरस्कार का निर्माण केल्या जाते. मुस्लिमांपासून या देशाला धोका आहे असे का वारंवार सांगितल्या जाते? याचे कारण एकच आहे की भ्रम पसरविणाऱ्या टोळीला मुसलमानाची भीती दाखवून त्या देशाच्या सत्तेवर आपला ताबा कायम ठेवायचा आहे. (संदर्भ: अछुत क्या कहते है ? गांधी से सावधान पृष्ठ क्रमांक 35)
प्रा. गंगाधर नाखले
11/09/2024
7972722081
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत