देशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

” जेव्हा शांतता, सद्भावना, अन सन्मार्गाचा गैर अर्थ घेतला जातो. !”

पांथस्थ असे, बुद्ध विचारांचा,
अंगीकारलाय, मार्ग समतेचा, बंधुत्त्वाचा, शांतीचा,
वीट असे, तंटा बखेडा,भांडण तांडण, अन कलहाचा.!

अनुभवलेत परिणाम, गत काळात,
वैर भावाचे, द्वंद्वाचे, अन युद्धाचे,
खच पडलेल्या, कलेवरांचे,
माय भगिनींच्या, आर्त टाहोंचे,
पांढर्‍या कपाळाने, वावरण्याचे,
म्हातारपणाची, काठी तुटल्याचे,
वारेमाप नुकसानीचे,
अन देशाच्या विकासात खीळ पडल्याचे.!

पण काय करू ?
डीवचतोय गनिम, काढून खोड्या,
वारंवार,
कधी बॉम्ब स्फोट घडवुन,
दहशतवादी, हल्ला करून,
देशांतर्गत, दंगली पेटवून,
आतंकवादाला, खत पाणी घालुन,
केला कहर, आप्तांच्या समोर,
धर्म विचारत, गोळ्या घालून.!

घेतलाय गैर अर्थ त्याने,
शांततेचा, सद्भावनेचा,
मानवता जोपासण्याचा,
संग्रामातील भीषणता, टाळण्याचा,
वसुंधरेच्या, विध्वंसाचा .!

पण वेळ आणलीय, बाजिंद्याने,
ताकत दाखवून देण्याची,
जशास तसे, उत्तर देण्याची,
शेजार्‍यांशी भिडण्याची,
” हम तुम्हारे बाप है. “
हे पुन्हा एकदा, दाखवून देण्याची.!

हे पुन्हा एकदा, दाखवून देण्याची.!!

हे पुन्हा एकदा,
दाखवून देण्याची.!!!

अरुण निकम,
9323249487.
मुंबई.
दिनांक…08/05/2025.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!