उपवर्गीकरण पूर्वग्रहदुषित हेतूने बौद्ध धर्मांतराला रोख लावण्यासाठी केलेले षडयंत्र आहे त्यामुळे महार (बौद्ध) – मातंग या भावा भावा मध्ये वाद न करता समजूतदारपणा दाखवावा लागेल-ॲड डॉ एस के भंडारे

छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्मात समानता नसल्यामुळे अस्पृश्य समाजाचे बौद्ध धम्मात धर्मांतर केले. त्यामध्ये महार समाजाने धर्मांतराची स्वीकृती केली, देव धर्म, पूजा अर्चा इत्यादी सोडून देऊन शिक्षणाकडे लक्ष्य देऊन शिकले, अस्पृशाची कामे सोडून देऊन शहराकडे आले त्यामुळे तत्कालीन महार आत्ताच्या बौद्ध समाजाची प्रगती झाली आहे. अस्पृशातील मातंग , चांभार , ढोर आणि ओबीसी व सवर्ण समाजाच्या काही लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे त्यांचीही प्रगती झाली आहे .मातंग समाजाच्या सर्व लोकांनी व अनुसूचित जाती पैकी इतर 58 जातीनी उपवर्गीकरणाची मागणी केलेली नाही. त्यामुळे वाद ऐवजी समन्वय साधून उपवर्गीकरणामुळे नोकरीची संधी कमी मिळून नुकसान कसे होईल हे समजूतदारपणे सांगावे लागेल. 13 टक्के आरक्षण हे महाराष्ट्रातील सरकारी नोकर भरतीमधील असून ते 1961 च्या जनगणनेनुसार आहे. त्यात त्यानंतरच्या 1971,1981, 1991,2001,2011 च्या जनगणनेनुसार सरकारने बदल केलेला नाही.2011 च्या जनगणनेनुसार बौद्ध आणि अनुसूचित जातीची लोकसंख्या 18 टक्के आहे. एवढेच नाही तर लोकसभा मधील खासदारांची संख्या 1971 च्या जनगणनेनुसार आणि विधानसभा यामधील आमदारांची संख्या सुद्धा 2001 च्या जनगणनेनुसार आहे.आपल्याला सरकारी नोकरीत आणि लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, जिल्हापरिषद, ग्रामपंचायत इत्यादी मध्ये जास्त प्रतिनिधित्व मिळू नये म्हणून हे षडयंत्र आहे. संविधान कलम 82 नुसार आता 2026 च्या जनगणनेनुसार लोकसभा खासदार इत्यादीची संख्या बदलणार आहे त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी व संविधान कर्त्यानी संविधान मध्ये एससी, एसटी ची यादी निश्चित केलेली आहे ती एकजिनशी (होमोजिनियस ) आहेत. त्यामुळे सर्वांनी एकसंघ राहून एससी मध्ये उपवर्गीकरण होता कामा नये आणि जनगणना मध्ये ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे त्यांनी धर्माच्या ठिकाणी बौद्ध, जातीच्या ठिकाणी धर्मांतरापूर्वीची जात लिहावी त्यामुळे एस सी म्हणून नोकरीतील , शिक्षणातील,राजकीय प्रतिनिधित्व, सरकारी योजनांचा लाभ योग्य प्रमाणात मिळेल. मात्र शाळेत प्रवेश घेताना धर्म बौद्ध लिहावा आणि जात लिहू नये असे सरांवशाने, बीएसआय मिशन: 25 अंतर्गत संविधान समर्थक समाज जोडो अभियान अनुसूचित जाती उपवर्गीकरण व बौद्ध जनगणना प्रबोधन आणि समता सैनिक दल शताब्दी वर्ष 2027 निमित्त दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा छत्रपती संभाजी नगर महानगर जिल्हा शाखा आयोजित दिनांक 10/5/2026 रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विधी महाविद्यालयातील मेळाव्यात केले. ॲड डॉ एस के भंडारे यांनी संविधानातील कलम 82,81,330,332, 150, 243,341, 342, 335, 16(4) ही वाचावीत असेही सांगितले आणि त्यांनी,”जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मज भीमराव” आणि ” पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून, ती कष्टकरी आणि श्रमिकांच्या तळहातावर तरलेलीआहे ” या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रसिद्ध ओळी सांगून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी केलेली सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक त्याचबरोबर राजकीय क्रांती गतिमान करण्यासाठी “चलो बुद्ध की ओर….” व “संविधान समर्थक समाज जोडो अभियान ” यशस्वी करण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन केले. ————-
धर्मांतरित डी एस नरसिंगे(लातूर )यांचा उप वर्गीकरणास विरोध
————–
यावेळी राज्य संघटक व धर्मांतरित बौद्ध डी एस नरसिंगे यांनी उपवर्गीकरण बाबत बोलताना उपवर्गीकरण आंध्रप्रदेश, पंजाब येथून कसे सुरू झाले याची माहिती सांगून असे सांगितले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जातीची केलेली यादी एकसंघ (होमोजिनियस) आहे. उपवर्गीकरण करून पूर्वीप्रमाणे हिंदू धर्मातील अस्पृश्य म्हणुनच रहावे यासाठी हे षडयंत्र केले गेले आहे. त्यामुळे उपवर्गीकरण करू नये यासाठी आणि बौद्ध जनगणना बाबत दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) यांनी घेतलेली भूमिका नुसार काम करावे.
———–
डॉ.राजाराम बडगे यांचाही विरोध.
—————
तसेच संस्थेचे ट्रस्टी डॉ.राजाराम बडगे यांनी सुद्धा उपवर्गीकरण केल्यास नुकसान होईल आणि जनगणनेमध्ये आम्ही समाजाच्या हितासाठी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्यावतीने घेतलेल्या भूमिकेनुसार धर्म बौद्ध आणि जात धर्मांतरापूर्वीची जात आणि अवगत भाषा मध्ये पाली भाषाही लिहावी असे सांगितले.
धर्मांतरित बौद्ध अमर सिंह ढाका (बीड) यांनीही केला विरोध. — महाराष्ट्र राज्य संघटक व धर्मांतरित बौद्ध अमरसिंह ढाका यांनीही उपवर्गीकरणास विरोध दर्शविला. मेळाव्यात प्रत्येक तालुका शाखेने व रांजणगाव शाखेने एक एक हजार सैनिक तयार करणे, प्रत्येक सैनिक व कार्यकर्त्याने पाच सैनिक तयार करणे, सैनिक शिबिरात शाखेच्या वतीने कॅप बॅच सह टोपी देणे आणि कार्यकर्त्यांनी/ शाखेने शिबिरार्थीना भोजन देणे.(यावेळी 23 जणांनी भोजन दान देण्याचे ठरविले ) इत्यादी ठराव करण्यात आले त्याचे वाचन राज्य संघटक किशोर जोहरे यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानगर जिल्हा अध्यक्ष रमेश बनसोडे होते. मेळाव्यात प्रा अरविन्द कांबळे , विलास पठारे ,अशोक कांबळे, अनिल राऊत यांनी आपले विचार मांडले.सूत्रसंचलन मिलिंद खंडेराव यांनी केले आणि प्रास्ताविक नागेश झोडपे यांनी केले. आभार प्रदर्शन आनंद भिसे यांनी केले.या मेळाव्यास सोयगाव, सिल्लोड, कन्नड, वैजापूर, पैठण, गंगापुर, फुलंब्री , खुलताबाद तालुक्याचे, छत्रपती संभाजीनगर पच्छिम, पुर्व, महानगर येथील समता सैनिकदलाचे सैनिक व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत



