देशभारतमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

मुस्लीमानो ! , विचारांची दिशा बदला, नक्कीच दशाही बदलेल !

सादिक खाटीक यांचे मत प्रचंड उत्साहात सादिक खाटीक यांचा कराडात सत्कार

कराड दि . ८ ( प्रतिनिधी )
मुस्लीमांच्या झालेल्या दुरावस्थेची ” दशा ” बदलायची असेल तर मुस्लीमांनी विचारांची “दिशा ही” बदलली पाहीजे . असे मत कुरेश कॉन्फरन्स दिल्लीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी व्यक्त केले .
मुस्लीम बक्कर कसाब जमाअत ट्रस्ट कराड यांच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागाचे राज्याचे उपाध्यक्ष आटपाडीचे सादिक खाटीक यांची कुरेश कॉन्फरन्स नवी दिल्ली भारत च्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल इरफान कुरेशी यांच्या हस्ते सत्कार करणेत आला . त्याप्रसंगी सादिक खाटीक बोलत होते .
कुरेश कॉन्फरन्सच्या सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झालेबद्दल अनुक्रमे मोहंमद कलाल सातारा , म . गौस खाटीक सांगली , याकुब चौधरी कोल्हापूर यांचा तर सांगली, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झालेबद्दल तौफीक खाटीक इस्लामपूर, फिरोज खाटीक कोल्हापूर यांचा आणि वाळवा, कराड तालुका अध्यक्षपदी निवड झालेबद्दल मलीक खाटीक इस्लामपूर, लियाकत मसुरकर कराड यांचा आणि कराड शहर अध्यक्षपदी निवड झालेबद्दल बाबासाहेब कलाल कराड यांचा यावेळी सत्कार करणेत आला .
कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन अन्वर पालकर यांनी केले . यावेळी आटपाडीचे इन्नुस खाटीक, रहिमान खाटीक, मुन्ना उर्फ दस्तगीर मुलाणी ( गोमेवाडी ), अमोल खंदारे, नदिम खाटीक, मिरजेचे हाजी गुलाम पटेल, हाजी पप्पु पटेल, रफीक पटेल, मुजाहीद खाटीक, इस्लामपुरचे रफीक खाटीक, अलताप खाटीक,समीर खाटीक, इम्रान खाटीक, कोल्हापूरचे अजिज चौधरी, युसूफ खाटीक, मुनाफ खाटीक, अकील कुरेशी, सलीम पटेल , किर्लोस्करवाडीचे समीर कुरेशी, रेहान कुरेशी, बिलाल कुरेशी, कराडचे मोहंमद मसूरकर, शेरअल्ली मसुरकर, इरफान कुरेशी, हाजी खत्ताल मसुरकर, सादिक पटेल, फारूक तासगांवकर, अस्लम कुरेशी, फिरोज कुरेशी, बबलु पन्हाळकर, नजीर खाटीक, एजाज बेपारी, रेहान कुरेशी, निसार पन्हाळकर, हाजी महिबूब मसूरकर, वसिम तासगांवकर, एजाज कुरेशी, मुनाफ कुरेशी, शब्बीर कुरेशी, नजीर कुरेशी, जावेद मसूरकर, महिबूब कलाल, साजिद खान, अल्ताप पन्हाळकर, सैफ पटेल, मुजफ्फर कुरेशी, मोहसीन पन्हाळकर , तन्वीर खाटीक, वजीर कलाल, निहाल मसूरकर, इम्रान कलाल, नजीर खाटीक, इकबाल पन्हाळकर, सलीम पन्हाळकर इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते .
आपल्या भाषणात सादिक खाटीक म्हणाले , स्वातंत्र्य प्राप्तीवेळी शिक्षण, नोकरी, व्यवसाय, राजकारण आदी सर्वच क्षेत्रात पहिल्या चारात स्थान असणाऱ्या मुस्लीमांची स्वातंत्र्याच्या त्र्याहत्तरीत सर्वच क्षेत्रात जबर पीछेहाट झाली आहे . या दारूणावस्थेस तो स्वतः जबाबदार आहेच तथापि व्यवस्थेचेही त्यांच्याकडे झालेले कमालीचे दुर्लक्ष या दुरावस्थेस कारणीभूत आहे .
शिक्षण हेच सर्वंकष परिवर्तनाचे मुख्य साधन असल्याने प्रत्येक मुला – मुलींना उच्च शिक्षित, उच्च संस्कारीत करावे . मी भारतीय आहे आणि सर्व भारतीय माझे बंधु – भगिनी आहेत, हाच जीवनमंत्र प्रत्येक मुस्लीमाने अंगीकारावा .
मुस्लीम खाटीक समाज, पशुपालक, शेतकरी आणि मांसाहार करणारे बांधव यांच्या सर्व समस्या, प्रश्न, सोडविण्यावर आपला भर राहणार आहे. मुस्लीम खाटीक समाजाने बोकडे, बकरे, खरेदी विक्री, मटन विक्री, कोंबड्या, मासे विक्री यापुरतेच मर्यादित न राहता, व्यवस्थेतील प्रत्येक क्षेत्राला या पुढच्या काळात आपलेसे करीत आपले जीवनमान उंचवावे, देशभरातल्या खाटीक समाजाच्या चौफेर व सर्वांगीण विकासासाठी कुरेश कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सुप्रिम कोर्टात वकीली करणारे ॲड . सनोबर अली कुरेशी यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ करून दाखविणार आहे .
१९५० सालच्या तत्कालीन राष्ट्रपती डॉ . राजेंद्रप्रसाद यांच्या घटनेखालील अध्यादेशाने मुस्लीम मागासांना मिळणारी अनुसूचित जातीच्या आरक्षणाची सवलत बंद झाली . नंतरच्या घटनादुरुस्ती द्वारे अनुक्रमे मागास शिख आणि नवबौद्ध यांचा अनुसूचित जातीच्या आरक्षणात समावेश करण्यात आला . नवबौद्ध म्हणून S . C . चे आरक्षण देताना डॉ . बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या सोबत धर्मांतर करणाऱ्या मागास बांधवांचे पूर्वीचे मागास असणे ग्राह्य धरण्यात आले. मुस्लीमांच्या सर्व स्थितीच्या अभ्यास करण्यासाठी केंद्र आणि राज्यसरकारने नेमलेल्या वेगवेगळ्या आयोग, कमिशन, समिती, अभ्यास गटापैकी काहींनी एक गोष्ट प्रकर्षाने पुढे आणली, ती म्हणजे बहुतांश मुस्लीम धर्मांतरीत आहे . पूर्वीचा हिंदू खाटीक – धर्मांतरानंतर मुस्लीम खाटीक, कसाई झाला. पूर्वीचा हिंदू माळी – मुस्लीम बागवान झाला . हिंदू नाभीक – मुस्लीम हजाम बनला . हिंदू परीट – मुस्लीम धोबी बनला . हिंदू चांभार – मुस्लीम मोची बनला . हिंदू मेहतर ( भंगी ) – मुस्लीम मेहतर बनला . हे वास्तव लक्षात घेऊन नवबौद्ध बांधवांप्रमाणे धर्मांतरीत मुस्लीम खाटीक, मुस्लीम मेहतर, मुस्लीम मोची वगैरे मुस्लीम अति मागासांना नवमुस्लीम म्हणून अनुसूचित जातीच्या आरक्षणाची कवाडे उघडली जावीत,
मुस्लीमांच्या रोजगाराच्या, आर्थीक संधी मध्ये कमतरता, अल्पसंख्य मुस्लीमांची लक्षणीय लोकसंख्या, त्यांच्यात उद्योजकता आणि कौशल्याचा असलेला अभाव, त्यांना कर्ज मिळविण्यात येणारी अडचण, कारागीरीला प्रोत्साहन नसणे, बँकाकडून असहकार्य, शैक्षणीक मागासलेपण, माध्यमिक स्वरूपाच्या शिक्षणापासून ही वंचित, विद्यापीठांमध्ये वस्तीगृहांपासून समोर येणाऱ्या विविध समस्या, परिणामी मेरीटचा अभाव, शिष्यवृत्तीच्या योजनांचे पाठबळ नसणे, केंद्रीय हायस्कूल आणि विद्यापीठांमध्ये अत्यल्प प्रमाण विविध बाबीत होणाऱ्या भेदभावांकडे दुर्लक्ष, अशी मुस्लीम समाज मागे राहण्यास असलेली शेकडो कारणे न्यायमुर्ती राजेंद्र सच्चर आयोगाने समाजासमोर आणली आहेत . या सर्वांमागे मुस्लीमांना मागासवर्गीय आरक्षणा पासून वंचित ठेवले जाणे हेच मुख्य कारण दिसून येते . आरक्षणामुळे यातील बहुतांश प्रश्न निकाली निघाले असते . म्हणूनच १९३६ ते १९५० या दरम्यान मुस्लीम खाटीक यांच्यासह मुस्लीम मागासांना मिळणारी अनुसूचित जातीच्या ( S C ) आरक्षणाची सवलत पुन्हा त्यांना मिळावी, यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा. दलित बांधवांप्रमाणे मुस्लीम मागासांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी आरक्षण, संरक्षण आणि समर्थन दिले जावे . असे ही शेवटी सादिक खाटीक यांनी आपल्या भाषणात म्हंटले आहे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!