देशभारतमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

आंबेडकरी समाजातील बांधवांनी कांग्रेस व बिजेपी पासून सावधान राहावे


अत्यंत आक्रमक अशा आकाश आनंद ला ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातून हटवणे बसपाला महागात पडले. आकाश आनंदने भाजप आणि कॉंग्रेस दोन्हींच्या विरोधात आक्रमक होत मोहीम सुरू केली होती.

मायावती या कांशीराम यांनी १९९० च्या दशकात जे समाजकारण, राजकारण सुरू केले होते त्यात सोशल इंजिनिअरिंगची भर घालण्यात मग्न होत्या. २००७ साली त्यांना एक हाती सत्ता मिळाली. या सत्तेत मुसलमानांचाही सहभाग होता. पण माध्यमांनी सातत्याने सवर्णांनी त्यातही ब्राह्मणांनी मते दिल्याचा प्रचार केला. त्यामागे दोन कारणे होती. पहिले म्हणजे बसपाच्या निरंकुश सत्तेची त्यांना भीती वाटत होती. आता बसपाच्या माध्यमातून दलित शेकडो, हजारो वर्षांचा बदला घेतील का ही ती भीती. त्यामुळे त्यांनी आधीच ब्राह्मणांच्या मतांमुळे बसपा सत्तेत आल्याचा जोरदार प्रचार सुरू केला.

बसपाने या निवडणुकीत ब्राह्मणांना साद घातली होती हे खरे आहे. पण ब्राह्मणांनी स्ट्रॅटर्जिकली मतदान केले. जिथे बसपा निवडून येणारच होती, तिथे ब्राह्मणांचे मतदान बसपाकडे आले. विश्लेषणात अशा दोन ते तीन सीट्सवर भर देण्यात येत होते. त्यातून सातत्याने ब्राह्मणांची मतं म्हणून माध्यमे कोकलत होती. उत्तर प्रदेशात ब्राह्मणांचे मतदान सहा टक्क्यापासून ते तेरा टक्क्यापर्यंत असल्याचे दावे केले जातात. तेरा टक्के हा आकडा बहुधा माध्यमांनी फुगवलेला आहे. यामागे देशाचा पंतप्रधान उत्तर प्रदेशच्या ब्राह्मण जातीचा असावा ही अपेक्षा आहे. याच तेरा टक्क्यांचा मोह होऊन मायावती २००७ च्या यशाच्या चक्रव्यूहात अडकल्या.

ही अशी स्टेज होती जिथे उत्तर प्रदेशात दलित सत्ताधारी होत आरक्षण सोडून द्यायच्या भूमिकेत शिरत होता. कांशीराम यांनी २००२ सालीच आरक्षणाला शंभर वर्षे झाल्याने आता आरक्षण सोडून द्यायची वेळ आलेली असल्याचे जाहीर केले होते. त्यामागे एक निश्चित रणनीती होती. जो समाज मागणारा असतो तो सत्ताधारी होऊ शकत नाही. जो समाज देणारा असतो तो सत्ताधारी बनतो. बसपाची भूमिका ओबीसींना आरक्षण देण्य़ाची होती.

असे झाले असते तर देशभरात बसपाची लाट आली असती. यासाठी ब्राह्मण, बनिया , ठाकूरांनी प्लॅन करून भाजपला सत्तेत बसवले. एक तर २००९ च्या निवडणुकीत जी धांदली झाली, निकालाच्या आदल्या दिवशीच चुकून निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उद्याचा निकाल आज जाहीर झाला, त्याचे पुरावे भाजपने घेतले, दुसर्या दिवशी तोच निकाल लागल्याने भाजप न्यायालयात जायची तयारी करू लागली. पुराव्यासहीत न्यायालयात केस दाखल केल्यावर कॉंग्रेसची निवडणूक रद्द तर झालीच असती पण कॉंग्रेस पक्षाची मान्यता रद्द करण्य़ाचा निर्णय झाला असता. ही माहिती बी जी कोळसेपाटलांच्या वॉलवर होती. आता आहे कि नाही कल्पना नाही.

यासाठी कॉंग्रेसने भाजपशी समझौता केला. २०१४ ला सत्ता दहा वर्षांसाठी भाजपला देण्याचा करार झाला. त्यामुळे भाजपाने न्यायालयात जो दावा दाखल करायचा होता त्यात बदल करत कॉंग्रेसने केलेल्या गैरप्रकारांऐवजी मशीनमुळे गैरप्रकार होऊ शकतात असा दावा केला. त्यात भाजपाकडून दिलेले तांत्रिक प्रेझेंटेशन आणि अन्य पुरावे यामुळे सर्वोच्च न्यायालयाने २०१३ साली दिलेल्या ऐतिहासिक निकालात ईव्हीएम मुळे निवडणूक सुरक्षित नाही असा निकाल दिला आणि पेपर ट्रेल लावायचा सल्ला दिला. या निकालाच्या सहाय्याने भाजप पुन्हा कधीही न्यायालयात जाऊ शकत होते.

२०१४ ला कॉंग्रेसमधून निवडून येऊ शकणारे २०० च्या वर बडे नेते भाजपात दाखल झाले. लक्षात ठेवा या आधी ईडी, सीबीआय हे सर्व कॉंग्रेसच्या ताब्यात होते. मग हे लोक भाजपात कुठल्या भयाने गेले ? यातले किमान १५० लोक भाजपातून निवडून आले. हे खरे कारण आहे कि सत्ता भाजपकडे गेली. मोदी लाट वगैरे देखावा होता. कॉंग्रेस आणि भाजपा यांचे षडयंत्र ध्यानात येऊ नये यासाठी केलेले ते नेपथ्य होते. कॉंग्रेसमुक्त भारत हा मोदींचा नारा फसवा होता. भाजपाला कॉंग्रेस नष्ट व्हावी असे मुळीच वाटत नाही. १९९७ साली अडवाणी म्हणाले होते कि देशात दोनच पक्ष असावेत. एक भाजप आणि दुसरा कॉंग्रेस. जर आम्हाला मत द्यायचे नसेल तर कॉंग्रेसला मत द्या. अटलबिहारी वाजपेयी यांनी बीएसपी साफ और एसपी हाफ हो जायेगी हे त्याच दरम्यान म्हटले होते.

प्रमोद महाजन यांनी इतर पक्षांवर निवडणूक आयोगाने बंदी आणून द्विपक्षीय लोकशाही आणावी असे म्हटले होते. कॉंग्रेसच्या एका नेत्याने असेच मत व्यक्त केलेले होते. कॉंग्रेसचे सरचिटणीस जितेंद्रप्रसाद यांनी आरक्षण संपावे ही इच्छा व्यक्त केली होती तेव्हां राहुल गांधी सक्रीय राजकारणात होते.

अलिकडे नितीन गडकरी यांनी कॉंग्रेस कमजोर होऊन प्रादेशिक पक्ष वाढणे चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. देशाच्या स्थैर्यासाठी कॉंग्रेस सशक्त होणे गरजेचे आहे असे म्हटलेले आहे.

याचाच अर्थ कॉंग्रेस आणि भाजप हे विरोधी पण एकमेकांना पूरक असे राजकीय पक्ष आहेत. यातला एक पक्ष संपला तर दुसरा संपला. निव्वळ दोनच पक्षांभोवती राजकारण फिरले पाहीजे यासाठी आघाड्यांची पद्धत आली. माध्यमांनी त्यांना कॉंग्रेस आघाडी आणि भाजप आघाडी अशी नावे देऊन देश कॉंग्रेस आणि भाजपामधे विभाजित झाला आहे असे चित्र निर्माण केले.

यातूनच मग एकाला रोखायचे तर दुसर्याच्या छावणीत जाणे गरजेचे असल्याचे कंपल्शन निर्माण झाले आणि यातून बी टीमचे हत्यार बाहेर आले. खरे तर ए आणि बी टीम ही संकल्पना कांशीराम यांची. पण तिचे संदर्भ बदलून ती दलितांच्याच विरोधात वापरून शरण या नाहीतर उद्ध्वस्त करू असे धमकीचे राजकारण सुरू झाले.

मायावती यांनी या बदललेल्या राजकारणाची नोंद घेतली नाही. त्या अद्याप २००७ च्याच काळात वावरत राहिल्या. ब्राह्मण आपल्याला मत देतील तार आपली सत्ता येईल या स्वप्नात राहिल्या. बदललेल्या परिस्थितीत समीकरणांचे राजकारण कामाचे नसून आपला कोअर व्होटर जपणे हे आवश्यक असल्याचे त्यांच्या ध्यानात आले नाही आणि २०२४ ला कोअर व्होटर बी टीमच्या प्रचाराला बळी पडून, संविधान बचावच्या प्रचाराला बळी पडून सपासोबत गेला तो भाजपला रोखण्यासाठी.

यामुळे मायावती खडबडून जाग्या झाल्या. त्यातच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि आता आकाश आनंद यांची आक्रमक शैलीच कोअर व्होटरला पुन्हा एकत्र ठेवू शकते याची जाणिव झाली.

रस्त्यावर उतरून आंदोलन ही बसपाची शैली नाही. पण आकाश आनंद यांची आहे. आणि आताच्या परिस्थितीत बसपाला आपले पारंपारिक तत्त्वज्ञान बाजूला ठेवून रस्त्यावर उतरावे लागणार आहे. मायावती यांनी आता आकाश आनंद यांच्याकडे परिस्थिती सोपवलेली आहे.

न्यायालयाच्या निर्णयाने देशभरात अनुसूचित जाती आणि जमातींमधे फाळणी करायची आणि काही भाजप तर काही कॉंग्रेससोबत जोडायच्या हा प्लान आहे. न्यायालयाचा हा निकाल राजकीयच आहे. ब्राह्मणांमधे न्यायिक प्रामाणिकता नसते हे ब्रिटीशांचे निरीक्षण पुन्हा सिद्ध झाले आहे. कुणीही कॉंग्रेसवाला या निकालाच्या विरोधात बोलत नाही. उलट तेलंगणामधे स्वागत झाले आहे. संविधान बचाव म्हणणारा ढोंगी राहुल गांधी गप्प बसला आहे. कॉंग्रेसचे ट्रोल्स दलितांना वर्गीकरण झाले तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे असे विचारत आहेत.

अशा वेळी भाजपा सोबतच कॉंग्रेसच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणारे आकाश आनंदचे युवा नेतृत्व पुढे येणे काळाची गरज होती. आंदोलन निर्णायकी झाले तर त्यात भाजप आणि कॉंग्रेस आपले मोहरे घुसवून त्याला भलतेच वळण लावण्याची शक्यता आहे. २१तारखेच्या भारत बंद च्या हाकेमागे कुठलेच नेतृत्व दिसत नव्हते. आता आकाश आनंद असल्याने किमान या भारत बंदबाबत विश्वास आहे.

जर उत्तर प्रदेशात कोअर व्होटर परत आला तर सपा ,कॉंग्रेस खिळखिळे होतील. मुसलमान पुन्हा सशक्त बसपाकडे येईल. बसपा उत्तर प्रदेशात सशक्त झाली कि देशभरात दलितांचे राजकारण पुन्हा सुरू होईल.

भाजप आणि कॉंग्रेसने जे कपटी आणि पाताळयंत्री राजकारण सुरू केले आहे, त्याचा थांगपत्ता न लागल्याने देशभरात दलित नेत्यांना फटका बसत आहे. त्यामुळे हे कारस्थान उघड करणे हे देशभरातल्या आंबेडकरी इंटेलेक्च्युअल्सचे काम आहे.

त्याऐवजी ते थिल्लरपणात मश्गुल आहेत. तर मग ते काम कसे व्हावे ?
कोण आभाळातून पडणार आहे का लोकांना जागृत करण्यासाठी ?

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!