
ऑनलाइन आर्थिक फसवणुकीला आळा घालण्यासाठी पैसे हस्तांतरणाचा पहिला व्यवहार पूर्ण होण्यासाठीचा कमीत कमी कालावधी वाढवण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. त्यानुसार दोन हजार रुपयांहून अधिक रकमेचा पहिला ऑनलाइन व्यवहार पूर्ण होण्यासाठी चार तासांचा अवधी निश्चित करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ला दिली.
या प्रक्रियेमुळे पैसे हस्तांतरणाचे ऑनलाइन व्यवहार काही प्रमाणात घटण्याची शक्यता असली तरी सायबर असुरक्षिततेबाबतचा धोका कमी करण्यासाठी हे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. सरकारने असा निर्णय घेतल्यास तो ‘आयएमपीएस’, ‘आरटीजीएस’ आणि ‘युपीआय’ या सर्व सेवांना लागू होईल. दोन व्यक्तींमधील पहिल्या व्यवहारास विलंब करणे किंवा त्यावर मर्यादा घालण्याच्या हेतूने हा प्रस्ताव तयार करण्यात आलेला नाही, तर दोन वापरकर्त्यांमधील प्रत्येक पहिल्या व्यवहाराचे नियमन करण्याचा उद्देश त्यामागे असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पंरतु तुम्ही प्रथमच एखाद्याला पैसे हस्तांतरीत केले तर ते आपल्याकडे परत फिरवण्यासाठी किंवा त्यात बदल करण्यासाठी तुमच्याकडे चार तास असतील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत