भारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीय

प्राणप्रतिष्ठेचे गौड बंगाल एकदा समजून घ्या…

डॉ. सुभाष देसाई कोल्हापूर

अयोध्येतील प्रभू श्री राम जन्मभूमी मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी मकर संक्रांति 15 जानेवारी ते 23 जानेवारी दरम्यान वेगवेगळ्या रामलीला कार्यक्रमाचे आयोजन केले आहे असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केले आहे यावरून प्राणप्रतिष्ठा म्हणजे नेमके काय याबद्दल जनमानसामध्ये उत्सुकता पसरली आहे.

कोल्हापूर मध्ये एका प्रसिद्ध मंदिरामध्ये असलेल्या देवीची मूर्ती जीर्ण झाल्यामुळे त्याच्यावर काही वेळेला वज्रलेप झाले या वज्रलेपाच्या वेळी पुरोहितांचा असा दावा होता की देवीचे प्राण ते एका घागरीमध्ये काढतात मूर्ती निष्प्राण होते नंतर मुर्तीवर वज्रलेप होतो आणि पुन्हा हे पुजारी देवीच्या मूर्तीत प्राणप्रतिष्ठा करतात याबाबतचा वाद चालू असताना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व पुजारी व कोल्हापुरातील जनता उपस्थित होती. त्याला राज्याचे नंबर दोनचे मंत्री, जिल्हा पोलीस प्रमुख, जिल्हाधिकारी आमदार असे सारेच उपस्थित होते. त्यावेळेला पालकमंत्र्यांनी मला विचारले तुमचे यावर काय मत आहे? मी सरळ जाहीर सभेत सांगितले की” देवीचे प्राण हरण करणारे हे पुजारी म्हणजे यमदूत आहेत का ?” यावर सभेमध्ये प्रचंड अशा पिकला सांगण्याचा उद्देश असा की देवी पेक्षा वरचढ कोणीतरी असल्याशिवाय देवीचे प्राण हरण करणे आणि पुन्हा प्राण अर्पण करणे हे सोपे काम आहे कां ?

देवीची काकड आरती झाल्यानंतर सोवळ्यांनिशी महाद्वार रोडला एका खोलीत पहिल्या धारेची दारू ढोसणारे, हे धार्मिक विधी कसे काय करू शकतात ?आणि त्याला पावित्र्याचा मुलांमा कसे देतात ?
हे अनेकांनी सवाल केले पण त्याला उत्तरे काहीही मिळाली नाहीत.

आता तीच गोष्ट प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची आहे. प्राणप्रतिष्ठा हे काय गौड बंगाल आहे याचा उलगडा शेकडो वर्षांमध्ये कोणी केलेला नाही. धर्म सिंधू सारख्या हिंदू धर्म ग्रंथामध्ये सुद्धा उत्तर नाही .पुजारी आपले प्राण जर मूर्तीमध्ये घालत असतील तर पुजारी मरून पडायला पाहिजे .आईच्या उदरात असणाऱ्या गर्भामध्ये केव्हा हृदयाचे ठोके सुरू होतात हे शोधणे कठीण होते तेथे मूर्ती सजीव होते याला कोणते विज्ञान आहे ? आणि कोणते तर्कशास्त्र लडवले जाते ? हे जर पाहिले तर ही अंधश्रद्धा आहे आणि पुजाऱ्यांनी बहुजन समाजाच्या डोक्यामध्ये असे विषय घातल्यामुळे तो नंदीबैला सारख्या मानच ढोलवतो .बाकी सवाल करत नाही

वास्तविक पाहता जर मूर्ती प्राण घातल्यानंतर म्हणजे प्राणप्रतिष्ठानंतर सजीव होत असेल तर ती हालचाल का करत नाही ? डोळे का मिचकावत नाही ? आशिर्वादासाठी हात खालीवर का करत नाही ? किंवा एका जागेची दुसऱ्या जागी स्थलांतर का करत नाही ? हे सारे प्रश्न विचारणे म्हणजे हिंदू धर्माच्या भावना दुखावण्याचा प्रकार आहे असा ठपकाही ठेवला जातो ट्रोल केले जातात. बहुजन समाजाने ह्या पुरोहितांना हे सवाल जरूर विचारावेत की प्राणप्रतिष्ठा म्हणजे नेमकं काय प्राण आल्यानंतर ती मूर्ती सजीव होते म्हणजे काय ती कुणाशी बोलते का ? काय होतं ?
कां ही मानसिक पातळीवरची अनुभूती असते ?
एकदा हे पुजार्यांनी स्पष्ट करावं.

त्यामुळे तूर्तास मूर्तीतील प्राणप्रतिष्ठा हा शेकडो वर्षे हिंदू धर्मातील पुजाऱ्यांनी बहुजन समाजाची दिशाभूल करण्यासाठी वापरलेले एक धार्मिक षडयंत्र आहे याशिवाय दुसरे काहीही नाही

तर असे म्हणा की अनैतिक चारित्र्याच्या पुजाऱ्यांच्या पेक्षा बहुजन समाजातील भोळ्याभाबड्या लोकांच्या ज्या श्रद्धा आहेत त्या मुळे तिथे जी पवित्र स्पंदने तयार होतात त्या स्पंदनशक्तीतून अनेक भक्तांना लाभ होतो. पण त्यांची लुबाडणूक करणारे हे टोळभैरव जागचे हलत नाही .
हे धंदे आता कुठेतरी थांबायला हवे आम्हाला कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेल्या राम मंदिराची गरज नव्हती. देशामध्ये अशी अनेक राम मंदिरे पडून आहेत त्या ऐवजी गावागावांमध्ये तयार होणारा प्लास्टिकचा व इतर कचरा त्याची निर्गत करण्यासाठी जी मशिनरी आवश्यक होती ती पुरवली असती , किंवा शुद्ध पाणी मिळण्यासाठी ज्या योजना राबवल्यास ,त् चांगले शिक्षण मिळण्यासाठी ,वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी संशोधन केंद्र हवे होते. त्याची गरज होती.

भपकेबाजपणा आणि धार्मिक उन्माद ही केव्हाही समाजाच्या प्रगतीला उपयोगी पडत नाहीत याची पक्की खूप गाठ बाळगा.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!