महासंस्कृती महोत्सव मध्ये स्थानिक कलावंत डावलले, सोबतच किशोर बळी ह्यांचा अवमान प्रकरण धक्कादायक – राजेंद्र पातोडे

अकोला, – पर्यटन व सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी कार्यालय अकोला आयोजित महासंस्कृती महोत्सव मध्ये स्थानिक कलावंत डावलून करण्यात आलेले नियोजन फसले असून ह्याच कार्यक्रमात किशोर बळी ह्यांचा माईक बंद करून अवमान केले जाणे हे प्रकरण धक्कादायक असून जिल्हा प्रशासनाने माफी मागितली पाहिजे अशी मागणी वंचीतचे राज्य प्रवक्ते
राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.
दोन चार कोटी खर्च करून अकोल्यात आयोजित कथीत महासंस्कृती महोत्सव
मध्ये स्थानिक कलावंताच्या कलागुणांना वाव देण्या ऐवजी प्रस्थापित पुणे मुंबई मधील कलावांत आणून त्यांचा उदोउदो करण्यात आला.मात्र अकोल्यातील कलावंताचा अपमान करण्यात आला हा प्रकार कुणाच्या इशाऱ्या वर करण्यात आला आहे, ह्याचा खुलासा जिल्हा प्रशासनाने करून माफी मागितली पाहिजे.किशोर बळी सारख्या कलावंताचा माईक बंद करणे ही कसली संस्कृती आहे ? जिल्हा प्रशासनाने ह्याचे उत्तर दिले पाहिजे.निधी जिल्ह्यासाठी आणि स्थानिक कलावंत ह्यांचा अवमान करून बाहेरून आणलेल्या कलावंताना पैसे देण्याचा आणि जिल्ह्यातील लोक कलावंत ह्यांची अवमान करून कसली संस्कृती मोठी होणार आहे ?
जिल्हा प्रशासनाने माफी मागून ह्या नियोजनात कोण कोण होते, स्थानिक कलावंत डावलून बाहेरून कलावंत आणण्याचा तुघलकी निर्णय कुणी घेतला, त्यांची नावे जाहीर करावी अशी मागणी करून घ्या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.
राजेन्द्र पातोडे
प्रदेश प्रवक्ते
वंचित बहुजन आघाडी
महाराष्ट्र प्रदेश
9422160101
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत