पाच नोव्हेंबरला 2,359 ग्रामपंचायतींसाठी मतदान.

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करण्यात आला असून ५ नोव्हेंबर रोजी मतदान करण्यात येणार आहे.
मुंबई महापालिकेबरोबरच राज्यातील अनेक महानगरपालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित असताना स्थानिक स्वराज्या संस्थेतील अंतिम घटक असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. राज्यभरातील जवळपास २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. यासोबतच या दिवशी राज्यभरातील २ हजार ९५० सदस्यपदाची आणि १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी मतदान होणार आहे. याबाबतची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी मुंबईत केली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत