कायदे विषयकमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

नरेंद्र दाभोळकर खून खटल्याचा निकाल १० मे रोजी; सरकार आणि बचाव पक्षाचा चा अंतिम युक्तिवाद पूर्ण

पुणे : देशभर गाजलेल्या दाभोळकर खून खटल्याचा निकाल जवळ आला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ रोजी पहाटेच्या वेळी हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

या प्रकरणात सरकारी पक्ष, तसेच बचाव पक्षाकडून युक्तिवाद पूर्ण झाला आहे. डॉ. दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर जवळपास अकरा वर्षांनी या खटल्याचा निकाल लागणार आहे. हत्येनंतर तब्बल आठ वर्षांनी हा खटला सुरू झाला होता. प्राथमिक तपास पुणे पोलिसांनी केला होता. परंतु जून २०१४ मध्ये केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपास सोपविण्यात आला होता.

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात १५ सप्टेंबर २०२१ रोजी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले होते.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येने समाजाचे अतोनात नुकसान झालेले आहे. देशाला अंधश्रद्धा आणि कर्मकांडातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. उशिरा का होईना पण दोषींना कडक शाशन व्हावे अशी भावना जनमानसातून व्यक्त होत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!