सिद्धार्थ गौतमाला जो बोध झाला तो आजवरचा सर्वश्रेष्ठ शोध आहे. .

वयाच्या २९ व्या वर्षी घरदार सोडून
* सहा वर्षे अरण्यात तपस्या करणार्या
* सिद्धार्थ गौतमाला जो बोध झाला.
* तो आजवरचा सर्वर्शेष्ठ शोध आहे.
*"जेव्हा सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला.
* तेंव्हा दोन विचारधारा प्रमुख होत्या_
१.* एक म्हणजे ‘खा, प्या, मजा करा’
असाटोकाचा भोगवाद_
२.* दुसरा प्रकार म्हणजे शरीराला
* आत्यंतिक त्रास होईल अशी तपस्या
* सांगणारा वैराग्य मार्ग_
* "गौतम बुद्धांनी या दोन्ही मार्गांना
* त्यागून मध्यम मार्ग शोधला.
* ज्याला 'सम्यक संबोधी'
* असे म्हटले गेले."_
* सिद्धार्थ गौतमाला मानवी दु:खाचे
* मूळ कारण सापडले.
* त्या दुःखाच्या निवारणाचा मार्ग सापडला.
* ज्याला चार 'आर्यसत्य'
* असे म्हटले आहे.
१.“पहिले सत्य म्हणजे जगात दु:ख आहे.”_ २. “दुसरे सत्य त्या दु:खाला काहीतरी
कारण आहे,”_
३.* “तिसरे सत्य त्या कारणाचे
निवारण करता येते,”_
४.* “आणि चौथे सत्य त्या दु:खाचे
* निवारण करण्याचा मार्ग आहे.”_
* त्या दुःख निवारण करण्याच्या मार्गाला
* गौतम बुद्धांनी 'आर्य अष्टांगिक मार्ग'
* असे म्हटले आहे.
* आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे आठ अंग
* असलेला मार्ग होय.
* ज्याच्याप्रमाणे आचरण
* केले तर तुमचे दु:ख समूळ नष्ट होते.
* दु:ख आणि दु:खाचे निवारण यालाच
* गौतम बुद्धांनी प्राधान्यक्रम दिला.
* गौतम बुद्धांनी
* निरर्थक गोष्टीवर कधीच भाष्य केले नाही"
* "बुद्धांनी दु:खाची व्याख्या केली आणि या
* दु:खापासून मुक्त होण्यासाठी त्यांनी
* आर्य अष्टांगिक मार्ग दिला.
* या मार्गाचे तीन भागात
* विभाजन केलेले आहे.
१.* “पहिला भाग आहे ‘शील’,
२.* “दुसरा ‘समाधी’ आणि
३.* “तिसरा ‘प्रज्ञा’.
१.* शील म्हणजे नियम._
* “समाजात कसे वागावे याचे नियम.
* समाजामध्ये अशी व्यवस्था निर्माण व्हावी.
* जिचा मूलाधार हा न्याय, समता, * व्यक्तिस्वातंत्र्य, आणि समान संधी हा * असेल.
* शील पालनाचा आणि मनाचा खूप
* जवळचा संबंध आहे कारण मनावर ताबा
* असला तरच शील पाळता येते.
* एखाद्दा व्यसनाधीन माणसाला व्यसनाचे
* दुष्परिणाम चांगले ठाऊक असतात.
* व्यसनातून बाहेर
* पडावे असे त्याला वाटत असते.
* पण मनावर ताबा नसल्यामुळे तो
* परत-परत
* त्या चक्रात अडकत जातो.
२.* मनावर संयम मिळविण्याकरिता गौतम
* बुद्धांनी समाधीचा पुरस्कार केला._
* अशी समाधी शिकवली जिचा मूलाधार
* निसर्गनियम आहे.
* श्वास आणि संवेदनेवर आधारित साधना
* शिकवली.
* जी साधना कोणताही माणूस
* सहज करू शकतो.
* त्याला कसलाही अडथळा येत नाही.
* श्वास आणि शरीरावर
* होणार्या संवेदनांचे निरीक्षण करायला
* कसली आलीय अडचण.
* त्यातून मन एकाग्र
* होते आणि मनावर ताबा येतो. “
३.* शील आणि समाधीच्या अभ्यासातून प्रज्ञा
* विकसित होते.
* प्रज्ञा म्हणजे ज्ञान._
* असे ज्ञान ज्यातून दु:खाच्या कारणाचा बोध
* होतो आणि दु:खाचे कारण दूर केले की
* दु:ख दूर होते.
* माझ्या दु:खाला मीच जबाबदार आहे.
* मीच ते निर्माण केले आहे.
* आणि मलाच ते दूर करावे लागेल.
* याचा बोध त्याला होतो.
* आणि तो कार्यशील होतो.
* ज्या माणसाला हे तत्त्व समजले.
* ज्याने याचा अनुभव घेतला तो निरर्थक
* गोष्टीत रमत नाही.
* मी या मानव समाजाचा एक घटक आहे.
* आणि हा समाज सुखी असला तरच
* मी सुखी राहीन.
* ही भावना त्याच्यात वाढीस लागते.
* मग आपोआपच जातीची बंधने तुटू
* लागतात.
* वैरभाव दूर होऊ लागतो”.
* “गौतम बुद्धांनी म्हटले आहे-
* ‘न हि वेरेन वेरानि,सम्मन्तीध कुदाचनं।
* अवेरेनच सम्मन्ति, एस धम्मो सनन्तनो “
* म्हणजे वैर वैराने शमत नाही
* ते अवैरानेच संपते.
* या अवैराच्या विचारातून सर्वांबद्दल
* प्रेम, मैत्री आणि सद्भाव वाढू लागतो.
* यातूनच करुणेचा उदय होतो.
* ही मैत्री करुणाच सामाजिक स्वास्थ्य
* वाढविते.
* मैत्री आणि करुणा हा बुद्धविचाराचा
* स्थायीभाव आहे.
* ते मानवी मनाचे टॉनिक आहे._
* विशेष म्हणजे ते सर्वत्र लागू होणारे आहे.
* त्याला स्थळ-काळाचे बंधन नाही.
* त्यात काळानुरूप बदल करण्याची
* गरज नाही.
* “पंचशील २५०० वर्षांपूर्वी आवश्यक होते,
* आजही ते तितकेच आवश्यक आहे,
* उद्याही ते तितकेच महत्त्वाचे राहणार
* आहे.”_
* बुद्धविचार काळाच्या कसोटीवर
* खरा ठरला आहे.
* म्हणून आजही तो तितकाच
* ताजातवाना आहे*
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत