दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

बुद्ध का जवळचा वाटतो ?

कारण बुद्ध प्रश्न विचारायला सांगतो, तेही स्वतःला आणि उत्तर शोधायला प्रवृत्त करतो, तुम्हाला तुमच्या धडावर असलेलं डोकं वापरायला सांगतो.

” मी सांगतो म्हणून नाही तर मी जे सांगतो ते किंवा जे कुणीही सांगेल ते, तुमच्या तर्काच्या, बुद्धीच्या कसोटीवर घासून पहा आणि पटलं तरच स्विकारा. “

मी परमेश्वर आहे आणि माझ्या पायावर डोस्की आपटली की मी तुम्हाला मोक्ष देतो असला काहिही भंपकपणा न करणारा हा धर्म संस्थापक वेगळाच.

ज्या धर्मात असमानता, विषमता, शोषण या सगळ्यांतून बुद्धाने बाहेर पडूनही त्या धर्माचा, माणसांचा द्वेष केला नाही, तर प्रेमाचं तत्वज्ञान सांगितलं.

आपल्याला आपलं डोकं वापरायला सांगतो म्हणून आपल्याला बुद्ध जवळचा वाटतो आणि त्याला समजून घ्यायला त्याच्या प्रतिमेची भव्यता आडवी येत नाही, ना तिचं दडपण येतं. बुद्ध कायमच असं हाताला धरून चालवणाऱ्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत सगळीकडं भेटतो.

काळाच्या ओघात आम्ही त्याच्याही मूर्ती बनवून त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध देवत्व देऊन टाकलं हा भाग वेगळा.

ज्यांना बुद्धाचं तत्वज्ञान आणि आपल्या बुद्धीचा वापर अडचणीचा वाटला, त्यांनी त्याला थेट विष्णूचा अवतार बनवून टाकला.

तरीही ह्या सगळ्यांना पुरून उरला तो बुद्ध.

‘मेंढरं बनू नका, माना डोलावणारे नंदीबैल बनू नका तर विचार करणारी माणसं बना’ हे बुद्ध आपल्या कृतीतून सांगतो.

म्हणूनच आज सगळ्यात जास्त बोधकथा सांगितल्या जातात त्या बुद्धाच्या, ज्यात माणसांच्या जगण्याचं तत्वज्ञान असतंय.

बुद्ध जवळचा वाटतो तो ह्यासाठी !!

बुद्धपौर्णिमा , २३ मे २०२४

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!