दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

गौतम बुद्ध – जगातील एक महान क्रांतिकारी

  • प्रा गौतम निकम विमलकीर्ती प्रकाशन चाळीसगाव जि जळगाव मो.9423915510

बुद्धाचा जन्म इ. स. पूर्व ५६३ मध्ये भारतात झाला होता. त्यांचा गण हा शाक्त गण होता. प्राचीन भारतामध्ये प्रजासत्ताक जमातींना ‘गण’ म्हणत असत.

मूलनिवासी भारतीयांचा सिंधुसंस्कृती काळापासून चालत आलेला ‘सत्यधर्म’ या आक्रमक ब्राह्मणांनी नष्ट केलेला होता. मूलनिवासी भारतीयांना त्यामुळे स्वतःचा धर्म नसल्याकारणाने त्यांचे जीवन दुःखमय झालेले होते. दुःखी, शूद्र भारतीयांना ब्राह्मण धर्माच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी त्यांना चांगला मानवतावादी धर्म देण्याचे तथागत बुद्धाने ठरविले होते.

समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी समाजक्रांती घडवून आणणे. रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून शाक्य व कोलिया गणांमध्ये विवाद सुरू झाला होता. (कोलिया हा शाक्यांप्रमाणेच प्राचीन भारतामध्ये एक गण होता.) शाक्यांनी कोलियांच्या विरुद्ध युद्ध पुकारले.

कोलियांच्या विरुद्ध युद्ध करण्यासाठी शाक्यांच्या सेनापतीने सर्व शाक्य तरुणांना सैन्यांमध्ये दाखल होण्याचा आदेश दिला. सिद्धार्थाने युद्धास नकार दिला.

आपला आदेश मोडल्याबद्दल सेनापती सिद्धार्थाला शिक्षा देऊ इच्छित होता. त्यामुळे शिक्षा म्हणून सिद्धार्थाला त्याने दोन बाबींपैकी एक बाबीची निवड करण्याचे सांगितले. त्या म्हणजे, मृत्यूदंड किंवा हद्दपारी म्हणजे त्याच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार.

या घटनेने कोसलाचा राजा पसेनजितचे लक्ष वेधले. तो या दोन्ही गणांवर प्रमुख होता.

सिद्धार्थाने मृत्युदंड स्वीकारण्याचे ठरविले. होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार करून सेनापती घाबरला.

त्यामुळे शाक्यांनी सिद्धार्थाला आपले घरे सोडून निघून जाण्याचा पर्याय सुचविला. सिद्धार्थ याच घटनेची वाट बघत होता. दुसऱ्यांच्या दुःखासाठी त्याला आपले घर सोडायचे होते.

त्यामुळे त्याने आनंदाने आपले घर सोडले आणि आपल्या गृहत्यागाचा महान उद्देश आपल्या माता-पित्यांना व पत्नीला सांगितला. समाजाच्या भविष्यासाठी त्याचे असलेले महान उद्दिष्ट ऐकून त्यांनीसुद्धा त्याच्या गृहत्यागाला आणि त्याच्या महान उद्देशाला मान्यता दिली.

त्याकाळी बहुतांश सर्वच ज्ञानाची केंद्रे व ते शिकविणारे गुरू हे अरण्यामध्ये राहत असल्याने सिद्धार्थ ज्ञान मिळविण्यासाठी अरण्यामध्ये गेला होता आणि विविध आचार्यांकडून त्याने ज्ञान मिळविणे सुरू केले. अलारा कलाम, उदक रामपुत वगैरे आचार्यांकडून त्याने ज्ञान मिळविले.

तथागत बुद्धाने आपल्या संपूर्ण जीवनामध्ये एकाही ब्राह्मण आचार्याकडून ज्ञान मिळविले नाही. त्याचे पहिले पाच शिष्य हेसुद्धा त्यांचे सहकारी होते आणि सर्व मूलनिवासी भारतीय होते.

शरीराला आत्मक्लेश दिल्याने शरीर आणि आत्म्याला मुक्ती मिळते. या सिद्धांताची उलटतपासणी करण्यासाठी सिद्धार्थान ६ वर्षे अन्नत्यागाचा प्रयोग स्वतःवरच केला; परंतु या प्रयोगाअंती त्याला हे आढळून आले की, अन्नत्यागाची कृती ही स्वतःच्या शरीरालाच घातक आहे.

त्यामुळे त्याने चिंतनात्मक किंवा तत्त्वज्ञानाची विपश्यना स्वीकारली. बुद्धाच्या काळी तेव्हा जवळजवळ २६३ विविध मूलनिवासी पंथ ब्राह्मण

पंथाच्या विचारधारेशी (ब्राह्मणवादाशी) संघर्ष करण्यात गुंतलेले होते. त्यांचे प्रवर्तक मकखली गोशाल, चार्वाक, लोकायत, संजय बेलापुत, निर्गय नाथपुत्त (जैनपंथाचा प्रवर्तक) वगैरे अशा वेगवेगळ्या नावांनी उत्तर भारतात प्रसिद्ध होते व ते आपापल्या परीने आपल्या मूलनिवासी विचारधारेचा प्रचार-प्रसार करून ब्राह्मण धर्माशी संघर्ष करण्यात गुंतलेले होते. अशा विविध विचारधारांचे प्रायोजिक परीक्षण करण्यासाठी सिद्धार्थ पिंपळ वृक्षाखाली बसला आणि त्याने विचार किंवा चिंतन चालू केले. जगातील दुःख, त्यांची कारणे, त्यावर उपाय काय आणि त्या दुःखांमधून बहुजनांना कसे मुक्त करता येईल, यावर त्याने खूप खोलात जाऊन चिंतन सुरू केले. त्याने चार्वाक, लोकायत, सांख्य, आजीविका, जैन अशा विविध मूलनिवासी विचारधारांना एकत्र जोडून बघण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून त्यामधून ब्राह्मणवादाला प्रतिकार करणारी प्रभावशाली विचारधारा निर्माण करता येईल.

तथागत बुद्ध हे बहुजनांच्या दुःखावर उपाय शोधण्यासाठी आणि त्यातून त्यांची मुक्ती करण्यासाठी वैचारिक चिंतनातून नवीन विचारधारा निर्माण करण्याच्या उद्देशाने बसलेले होते. संपूर्ण मानवाच्या दुःख मुक्तीसाठी त्याने एक नवीन तत्त्वज्ञानाची निर्मिती केली, ज्याला पुढे बौद्ध धम्म म्हणून ओळखले जाऊ लागले.

अन्यायकारी ब्राह्मणधर्म हा मानवी मनामध्ये वासना, द्वेष, मत्सर, राग, लोभ, मोह हे दुर्गुण निर्माण करण्यास कारणीभूत आहे. ज्याचा परिणाम म्हणून मानवसमाज दुःखी बनलेला आहे. त्यामुळे लोकांना त्यांच्या दुःखातून मुक्त करण्यासाठी अन्यायकारी ब्राह्मणधर्म नष्ट करण्याचे तथागताने ठरविले. त्यामुळे मानवतावादी बौद्ध धम्माची निर्मिती करून बुद्धाने विषमतावादी व अन्यायकारी ब्राह्मण धर्माच्या विरुद्ध रणशिंग फुंकले. त्यांच्या युद्धाचे घोषवाक्य ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे होते. जे आजच्या लोकशाही आणि साम्यवादाप्रमाणे आहे.

तथागत बुद्धांच्या हे लक्षात आले की, बहुजनांच्या दुःखाचे मूळ कारण हे ब्राह्मण व त्यांचा ब्राह्मणधर्म आहे. या अन्यायकारी ब्राह्मणवादातून मुक्त करण्यासाठी तथागत बुद्धाने बौद्ध धर्माच्या रूपाने एक मानवतावादी धर्म स्थापन केला.

विचारधारा ही विचारधारेनेच नष्ट करता येते. त्यामुळेच विषमतावादी व अन्यायकारी ब्राह्मण धर्माला नष्ट करण्यासाठी तथागत बुद्धाने त्याच्या स्वतःच्या व घरच्यांच्या विरोधात जाऊन गृहत्याग केला होता. तथागतांच्या गृहत्यागाच्या घटनेला ‘महाभिनिष्क्रमण’ म्हणतात. तथागतांच्या महाभिनिष्क्रमणाची ही घटना जगाच्या इतिहासात एक सुवर्णक्षण आहे. त्या घटनेमुळे संपूर्ण जगाच्या इतिहासाला कलाटणी मिळालेली आहे. तथागत बुद्धासहित भारतातील सर्व मूलनिवासी बहुजन लोक हे नागवंशी होते.

तथागत बुद्धाच्या चित्रातील नाग साप हा भारतातील नाग लोकांचे प्रतिनिधित्व करतो. शिवाच्या गळ्यामध्येही नाग, साप दाखविलेला असतो, याचा अर्थ असा नाही की, तो नागाला गळ्यामध्ये घेऊन हिंडत असे, याचा अर्थ हाच की, तथागत बुद्धाप्रमाणेच शिव हासुद्धा विदेशी ब्राह्मणांच्या विरोधात लढणारा प्राचीन मूलनिवासी महापुरुष आहे. त्याकाळी उत्तर भारतामध्ये अतिशय घनदाट जंगले होती आणि त्यामध्ये वाघ, सिंह, लांडगे, अस्वल, नाग अशा वन्य हिंस्र प्राण्यांचा सुळसुळाट होता. त्यामुळे तथागत बुद्धाला संरक्षण देणे हे मूलनिवासी बहुजनांचे आद्य कर्तव्य होते. कारण तथागत त्यांच्या मुक्तीचे एकमेव तरणोपाय होते. त्यामुळे काही मूलनिवासी नाग लोक हे तथागतांच्या संरक्षणासाठी नेहमीच त्यांच्या सभोवताली दूरवरून पहारा देत असत. त्यामुळेच तर तथागत बुद्ध त्या घनदाट जंगलांमधून सतत सहा वर्षे एकटे फिरले; परंतु त्यांना कोणताही धोका झाला नव्हता. या संरक्षणकर्त्या नागलोकांना त्या काळच्या चित्रकारांनी व शिल्पकारांनी नाग सापाच्या स्वरूपात तथागत बुद्धांच्या मागे फणा काढून संरक्षणाच्या तयारीत दाखविलेले होते. त्याकाळी लेखनकला अस्तित्वात नसल्यामुळे चित्राच्या व शिल्पाच्या स्वरूपात लोकांनी हा इतिहास जतन करून ठेवलेला होता. मुलीचंद हा नाग लोकांचा राजा होता व त्याने स्वतः कित्येक वेळा तथागत बुद्धांचे संरक्षण केलेले होते. म्हणून त्या राजाच्या नावावरून त्या चित्रातील नागाला ‘मुलीचंद नाग’ म्हणतात.

त्याच्या बौद्ध धम्मरूपी विचारधारेने अन्यायकारी ब्राह्मण धर्मातील प्रत्येक विचाराला विरोध केला. त्यांनी वेदाला नाकारले. त्यांनी देवाला नाकारले. त्यांनी आत्मा, परमात्मा, पाप-पुण्य, अवतारवाद या ब्राह्मणी संकल्पनांना नाकारले. त्यांनी ब्राह्मणांचे वर्चस्व नाकारले.

तथागत बुद्ध आणि त्यांच्या धम्माच्या प्रभावामुळे मूलनिवासी बहुजनांनी विदेशी ब्राह्मण आणि त्यांच्या ब्राह्मण धर्माच्या विरुद्ध आंदोलन चालू केले आणि त्याचाच परिणाम म्हणून नंतरच्या काळामध्ये मूलनिवासी बहुजनांचे बलाढ्य असे मौर्य साम्राज्य भारत खंडामध्ये अस्तित्वात आले. बुद्धांच्या क्रांतिकारी आंदोलनाने शूद्रांना केवळ राजेच बनविले नाही तर जगज्जेते सम्राट बनविले.

ब्राह्मणांनी तथागत बुद्धांचा इतिहास विकृत केला

ब्राह्मण कवी अश्वघोषाने संस्कृत भाषेमध्ये ‘बुद्धचरित्रम्’ हे काव्य लिहिले. तथागत बुद्धाने आपल्या अनुयायांना स्पष्ट निर्देश दिलेले होते की, त्यांच्या विचारधारेचा प्रचार-प्रसार स्थानिक ‘पाली’ भाषेमधूनच करायचा; परंतु ब्राह्मणांनी मुद्दामहून त्यांचा हा आदेश मोडून टाकला; जेणेकरून त्यांच्या आंदोलनाला मूठमाती देता येईल. तसेच ब्राह्मणाचा दुसरा उद्देश यामागे असा होता की, संस्कृत ही फक्त ब्राह्मणाचीच भाषा होती. त्यामुळे ब्राह्मणांनी तथागत बुद्धांच्या जीवनचरित्रामध्ये व शिकवणुकीमध्ये काही विकृती निर्माण केल्यास बाकी बहुजन लोकांच्या लक्षात येणार नाही आणि तथागतांच्या बाबतीत असाच विकृत इतिहास पुढे येणाऱ्या पिढ्यांना स्वीकारावा लागेल.

तथागत बुद्धाने मूलनिवासी बहुजनांना ब्राह्मणी गुलामीतून स्वतंत्र करण्यासाठी आपले घर सोडलेले होते; परंतु ब्राह्मण लेखकांनी असे लिहिले की, चार प्रकारची दुःखमय दृश्ये बघून बुद्धाने घर सोडले होते. जे की पूर्णतः खोटे आहे. त्याचप्रमाणे ब्राह्मणांनी असे सांगितले की, बुद्धाने झाडाखाली बसून फक्त ध्यानसाधना (विपश्यना) केली, जे की पूर्णतः खोटे आहे. ब्राह्मणांनी हाही खोटा प्रचार केला की, तथागत बुद्धाने नवीन विचारधारा निर्माण केली, जे की पूर्णतः खोटे आहे. सत्य हे आहे की, बौद्ध धर्म हा सिंधु संस्कृतीपासून चालत आलेला प्राचीन धर्म आहे. सिंधू संस्कृतीच्या उत्खननामध्ये शास्त्रज्ञांना ध्यानस्थ योग्याची मूर्ती सापडली आहे. तो योगी तथागत बुद्धाप्रमाणेच अवस्थेमध्ये बसलेला आहे. तसेच, तेथे त्यांना धम्मचक्र आणि पिपळवृक्षांची व पिंपळ पानाची शिल्पे व मृदुचिन्हे सापडलेली आहेत. पिंपळवृक्ष हा बौद्ध धम्मामध्ये पवित्र वृक्ष समजला जातो. तथागत बुद्धाने स्वतः म्हटलेले आहे की, त्यांच्यापूर्वी २७ बुद्ध होऊन गेलेले आहेत आणि ते त्या पूर्वीच्या बुद्धांच्याच विचारधारेचा प्रचार-प्रसार करीत आहे. ऋग्वेदामध्ये मूलनिवासी सिंधुजनांच्या धर्माला ‘सत्यधर्म’ म्हटलेले आहे. बौद्धधम्म हाच सत्यधर्म आहे. अर्थात, सिंधु संस्कृतीचा धर्म हा ‘बौद्ध धम्मच होता. सिंधु संस्कृतीमधील चार्वाक, बळी, प्रल्हाद, कपिल, विरोचन वगैरे तत्त्वज्ञ प्राचीन बौद्ध तत्त्वज्ञ होते. त्याचमुळे, तथागत बुद्धाने कपिलाच्या सांख्य तत्त्वज्ञानामधील बरेचसे तत्त्व आपले धम्माचे तत्त्वज्ञान विकसित करताना घेतले होते. भारतीय मूलनिवासी लोक कपिलाला एवढे महत्त्व देत असत की, बुद्धांच्या जन्मस्थानाला कपिलाच्या नावावरूनच ‘कपिलावस्तू’ (कपिलावस्तू म्हणजे कपिलाचे ठिकाण) हे नाव दिलेले होते. हे उदाहरण दर्शविते की, तथागत बुद्ध व पूर्वीचे मूलनिवासी तत्त्वज्ञ यांच्यामध्ये सरळ वांशिक व वैचारिक संबंध होते.

तथागत बुद्ध हे दुःखिकष्टी मूलनिवासी बहुजनांना त्यांच्या दुःखातून मुक्तीसाठीचा मार्ग दाखविणारे होते आणि त्यामुळेच बुद्ध हे युरेशियन ब्राह्मणांना मोठे आव्हान होते.

तथागत बुद्ध हे ‘मूर्तिपूजे’च्या स्पष्टपणे विरोधात होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊनच सर्व मूलनिवासी बहुजन उद्धारक महापुरुष जसे की, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बसवाण्णा, शाहूजी महाराज, सर्व वारकरी संत वगैरे आणि प्रेषित मुहम्मद, येशू ख्रिस्त वगैरे धर्म संस्थापकांनी मूर्तिपूजेला विरोध केला.

मूर्तिपूजा ही ब्राह्मणांना फायदेशीर आहे तर मूलनिवासी बहुजनांना घातक आहे. मूर्तिपूजेमुळे विदेशी ब्राह्मणांचे पुरोहित म्हणून महत्त्व वाढते. विदेशी ब्राह्मणांनी मूलनिवासी भारतीयांना फसविण्यासाठी व त्यांची पिळवणूक करण्यासाठी मूर्तिपूजेला नेहमीच प्राधान्य दिलेले आहे. त्यांनी सामान्यजनांना आपल्या मानसिक गुलामीत ठेवण्याकरिता देव आणि धर्माचा नेहमीच गैरवापर केलेला आहे. आपल्या सर्वच महान पूर्वजांनी ब्राह्मणांच्या या कपटी कृत्यांना वेळोवेळी प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यामुळेच, ब्राह्मणांनी तथागत बुद्ध, कृष्ण, बसवाण्णा, सर्व वारकरी संत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज अशा महापुरुषांच्या हत्या केल्या आणि त्यांचे शारीरिक अस्तित्व नष्ट केल्यानंतर, त्यांच्या विचारांना नष्ट करण्यासाठी कपटी ब्राह्मणांनी या महापुरुषांच्या मूर्त्या बनविल्या आणि त्या मूर्त्यांपुढे स्वतःच पुरोहित बनून त्या महापुरुषांच्या अनुयायांना अंध भक्त बनवून त्यांची लूट चालू केली.

बुद्धाने आपल्यानंतर दुसरा कोणी आपल्या जागेवर नियुक्त केला नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, त्यांच्यानंतर त्यांचा धम्म हाच त्यांच्या ठिकाणी असेल आणि लोकांनी आपले जीवनमान सुधारण्यासाठी केवळ धम्मालाच आपला गुरू मानून त्याप्रमाणे वर्तन करावे; परंतु तथागत बुद्धाच्या या आदेशाला फाटा फोडण्यासाठी आणि लोकांना बहकून देण्यासाठी कपटी ब्राह्मणांनी तथागत बुद्धांच्या भिक्षुसंघामध्ये घुसखोरी करून वेगळा ‘महायान’ पंथ निर्माण केला आणि त्यामध्ये बुद्धाला देवत्व प्रदान करून बुद्धांची मूर्तिपूजा सुरू केली. वास्तविक क्रांतिकारी बुद्धाला विस्मरणात नेण्यासाठी ब्राह्मणांनी महायानाच्या माध्यमातून बुद्धाला देवता म्हणून पुढे आणले. त्यामुळे लोक खरा ऐतिहासिक असा क्रांतिकारी बुद्ध व त्यांचा क्रांतिकारी धम्म विसरले आणि त्यांनी काल्पनिक अशा बुद्ध देवाचा अनुनय करणे सुरू केले. काही काळानंतर ब्राह्मणांनी या बुद्धासाठी प्रार्थना रचायला सुरुवात केली आणि ते त्यांचे पुजारी बनले. बरेचसे ब्राह्मण हे बौद्ध भिक्षू बनले आणि नंतर काही शतकांनी त्यांनी बुद्धाला विष्णूचा नववा अवतार म्हणून घोषित केले. अशाप्रकारे ब्राह्मणांनी पद्धतशीरपणे क्रांतिकारी बौद्ध धम्माला पुरोहितवादी महायान बौद्धधम्मामध्ये परिवर्तित केले. हे कृत्य म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून ऐतिहासिक बुद्धाला आणि त्यांच्या क्रांतिकारी धम्माला मारण्याचे क्रूर ब्राह्मणी षड्यंत्र आहे. १९ व्या शतकापर्यंत ब्राह्मणांनी तथागत बुद्धाला अज्ञानाच्या इतक्या अंधःकारात ढकलून दिले (जो बुद्ध स्वतःच अज्ञानाचा संहारक होता.) की, तथागत बुद्ध किंवा त्यांचा धम्म किंवा सम्राट अशोक किंवा मौर्य साम्राज्य यांच्याबद्दलची माहिती एकाही माणसाला नव्हती. जनरल कनिंगहम नावाच्या एका इंग्रजी अधिकाऱ्याने सन १८३७ मध्ये प्रथमच अशोकाचे शिलालेख शोधून काढले आणि तथागत बुद्ध त्यांचा धम्म, सम्राट अशोक व त्यांचे मौर्य साम्राज्य या महान गोष्टींची जगाला माहिती करून दिली.

तथागत बुद्धाला पाली भाषेमध्ये ‘भगवान’ म्हणत असत. भगवान या शब्दाचा अर्थ देव होत नाही. तथागत बुद्धाला ब्राह्मण देवता विष्णूचा नववा अवतार सिद्ध करण्यासाठी बाह्मणांनी मुद्दामहून भगवान या शब्दाचा देव असा विकृत अर्थ बनविला. भगवान हा पाली भाषेतील शब्द आहे आणि त्याचा अर्थ म्हणजे, ‘ज्या व्यक्तीने राग, लोभ, मोह, मत्सर, द्वेष, विषमता, जातीयता, वर्णवाद या ब्राह्मणी दुष्ट संकल्पनांना नष्ट केलेले आहे.’ ‘भग्ग’ म्हणजे नष्ट करणे आणि ‘वाण’ म्हणजे मोह, मत्सर, द्वेष, विषमता, वर्णवाद अशा प्रकारची ब्राह्मणी दुष्ट संकल्पना. बौद्ध धम्मामध्ये असे म्हटलेले आहे की, ‘भग्गा रागो, भग्गा दासो, भग्गा मोहिनी भग्गवा’ याचा अर्थ असा की, त्याने राग, लोभ, मोह, तृष्णा यांचा त्याग केलेला आहे तो म्हणजे भगवान. अर्थात, भगवान म्हणजे असा महापुरुष ज्याने आपल्या ज्ञानाच्या जोरावर राग, मोह, लोभ, मस्तर अशा मनवी विकृतींवर विजय मिळविलेला आहे.

तथागत बुद्ध हे क्रांतिकारी होते आणि त्यांनी आपल्या क्रांतिकारी आंदोलनाच्या माध्यामातून ब्राह्मण धर्म नष्ट केलेला होता. त्याचमुळे, त्यांना भगवान म्हटले जाते. ‘भगवान’ या शब्दामुळे तांबट-पिवळसर ‘भगवा’ हे नाव पडले. तथागत बुद्ध आणि त्यांचे अनुयायी भिक्षू हे तांबट-पिवळसर रंगाचे चिवर परिधान करीत असत. गौतम बुद्ध जेव्हा आपल्या अनुयायांना मार्गदर्शन करीत असत, तेव्हा ते लोक त्यांचे शब्द इतक्या तल्लीनतेने ऐकत असत की, त्यांना तथागत बुद्धांच्या जागी फक्त भगव्या रंगाची प्रतिकृतीच दिसत असे. तथागतांच्या भगव्या रंगाच्या चिवरमुळे त्यांना तसा भास होत असे. त्यामुळे तथागतांच्या ‘भगवान’ या नावावरून त्यांच्या चिवरच्या रंगाला ‘भगवा’ रंग हे नाव पडले. अर्थात, भगवा रंग हा बुद्धांचा आणि बौद्ध धर्माचा रंग आहे. त्यामुळे बुद्धांची आठवण-प्रेरणा म्हणून वारकरी संतांनी तो रंग आपल्या वारकरी झेंड्यासाठी स्वीकारला आणि त्यांच्यापासून ते प्रेरणा घेऊनच पुढे छत्रपती शिवरायांनी आपल्या स्वराज्याचे ‘भगवे’ निशाण ठेवले होते; भगवा रंग हा ब्राह्मणांचा नसून तो बुद्धांचा व बौद्ध धर्माचा रंग आहे.

तथागत बुद्धाने हा रंग आपल्या चिवरसाठी वापरण्याचे कारण म्हणजे तो रंग मूलनिवासी भारतीयांच्या सुबत्तेचा रंग होता. मूलनिवासी भारतीय संस्कृती होती. कारण ते अन्नधान्याच्या शोधात एका ठिकाणावरून दुसरीकडे सतत भटकत असत. आपल्या या भटक्या प्रवृत्तीमुळे वैदिक आर्यांना ‘ब्राह्मण’ हे नाव पडले. (‘भ्रमण’ म्हणजे भटकणे. ‘भ्रमण’ या शब्दापासून पुढे ‘ब्राह्मण’ हा शब्द बनला.)

मूलनिवासी भारतीयांच्या गुरूंना ‘श्रमण’ म्हटले जाई. त्याउलट वैदिक आर्यांच्या गुरूंना ‘ब्राह्मण’ म्हटले जाई. मूलनिवासी श्रमण हे काम केल्याशिवाय अन्न ग्रहण करीत नसत. त्यामुळे त्यांना ‘श्रमण’ म्हटल्या जायचे. (श्रम म्हणजे मेहनत आणि श्रमण म्हणजे असा मुनी जो मेहनत करून आपली गुजराण करतो.) त्याचमुळे गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी भिक्षू हे दात्याला काहीतरी मार्गदर्शन केल्याशिवाय त्यांच्याकडून अन्न स्वीकारत नसत. अशाप्रकारे तथागत आणि त्यांचे भिक्षू हे अन्नदानाच्या बदल्यात ज्ञानदान करीत असत. ज्ञानी समाज हा सुखी, संपन्न व खुशहाल समाज असतो. तो कुणाचीच गुलामी स्वीकारत नाही आणि कुणाला गुलाम करीतही नाही. ब्राह्मणांना मात्र मूलनिवासी भारतीय समाजाला गुलाम बनवायचे होते. त्यामुळे ज्ञानी समाज त्यांना परवडणारा नव्हता. समाजाला अज्ञानी व मूर्ख बनविण्यासाठी त्यांनी समाजामध्ये भ्रम फैलावायला सुरुवात केली.

लोकांना भ्रमामध्ये ठेवण्यासाठीच त्यामुळे ब्राह्मणांचे धार्मिक ग्रंथ काल्पनिक व मिथक कथांनी भरलेले आहेत आणि त्यामध्ये काल्पनिक व भ्रामक संकल्पनांची भरमार आहे. मूलनिवासी भारतीयांना भ्रमाच्या नावाने भयग्रस्त केल्यानंतर ब्राह्मणांनी त्यांना मोक्ष या काल्पनिक गोष्टीचा सहारा देणे सुरू केले. मोक्षाच्या नावाने मूलनिवासी बहुजनांची सत्ता, संपत्ती लुटण्यासाठी पुढे ब्राह्मणांनी यज्ञसंस्थेची निर्मिती केली. ब्राह्मणांचे यज्ञ हे आजकालच्या रेव्ह पार्टीसारखे असत. ज्यामध्ये दारू पिणे, मटण खाणे, अश्लील चाळे करणे, उन्मत्त नाचणे, उघड्यावर संभोग करणे या गोष्टी सर्रास केल्या जायच्या.

गौतम बुद्धाचा इतिहास विकृत होण्यामागची कारणे :

गौतम बुद्धाच्या काळी लिहिण्याची कला विकसित झालेली नव्हती. गौतम बुद्ध जे काही सांगत असत, त्याला नीट ऐकून त्यांचे अनुयायी पाठांतर करीत असत. बहुतांश करून भिक्षु हेच तथागतांच्या शिकवणुकीचे स्मरण करीत असत. अर्थात तथागतांनी जे शिकविले ते भिक्षूना आपल्या स्मरणात ठेवावे लागे. त्याकाळी काही खास लोक नेमलेले असत. त्यांचे काम केवळ पाठांतर करणे व धम्म स्मरणात ठेवणे हेच होते. अशा लोकांना ‘भनक’ म्हटल्या जायचे. बुद्धांच्या संघाला विकृती आणण्याकरिता काही ब्राह्मण हे मुद्दामहून बौद्ध भिक्षु बनले होते आणि तथागतांच्या धम्माला विकृती आणण्याकरिता त्यांच्यापैकी काहीजण मुद्दामहून ‘भनक’ बनले होते. ते सर्व ब्राह्मण भिक्षू हे छद्‌मी भिक्षु (खोटे भिक्षु) असत. कारण त्यांना बौद्ध धर्मामध्ये काहीही आवड नव्हती. केवळ बौद्ध राजांकडून विविध तन्हेने फायदा उकळता यावा आणि बुद्धांच्या शिकवणीला (धम्माला) व खऱ्या बौद्ध भिक्षूना हानी पोहोचवावी, याच हेतूने ते बौद्ध भिक्षू बनत असत. त्यामुळे मूलनिवासी बहुजनांचे खरे बौद्ध भिक्षु या ब्राह्मण भिक्षूना ‘छद्‌मी बौद्ध’ म्हणत असत. सम्राट अशोकाने अशा ६०,००० छद्‌मी बौद्ध भिक्षूना भिक्षुसंघातून काढून टाकलेले होते. कपटी ब्राह्मण शंकराचार्य हा त्यांच्याकाळी छद्‌मी बौद्ध म्हणून खूप प्रसिद्ध झाला होता. त्याने तथागत बुद्धांच्या एकूण एक शिकवणुकीला विकृत अर्थ प्रदान केला होता. एवढेच नव्हे तर त्याने बुद्धाला विष्णूचा नववा अवतार असा खोटा आरोप लावला होता. या दुष्कृत्यांमागे त्याचा उद्देश हाच होता की, भारतातून बौद्ध धर्माचा समूळ नायनाट करावा. अशा दुष्ट मार्गांनी त्याला आपला उद्देश सहज साध्य करता आला. ब्राह्मण नागार्जुन, आसंग वसुबंधू, अश्वघोष हे इतर प्रसिद्ध छ‌द्मी बौद्ध भिक्षू आहेत. तथागत बुद्धांच्या जीवनाचे व शिकवणुकीचे (धम्माचे) विकृत लिखाण करून या ब्राह्मण-बौद्ध भिक्षूनी तथागतांचे खरे ऐतिहासिक जीवनचरित्र व शिकवण (धम्म) यांना पार धुळीस मिळविले.

कपटी ब्राह्मण आदी शंकराचार्य हा प्रसिद्ध असा छद्‌मी बौद्ध होता. ज्याने बौद्ध धर्माचा संपूर्ण भारतातून र्हास केला.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!