अमरावतीदेशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

डॉ पंजाबराव देशमुख यांनी सामाजिक समतेची दृष्टी समजण्यास ओबीसी मराठा असफल


महात्मा फुले यांनी वैदिक संस्कृतिचा विरोध करून सामाजिक समतेचे रणशिंग फुंकले समाजांत अनेक जाणकार लोकांचा समुह एकत्रीत येऊन महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाच्या कार्याला गती देण्यासाठी संघर्ष सुरू केला. छत्रपती शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर डॉ पंजाबराव देशमुख यांनी सामाजिक समतेची चळवळ पुढे नेली.
अमरावती येथील अंबा देवीच्या देवळात अस्पृश्य समाजाचे लोकांना प्रवेश मिळावा यासाठी 26/11/1927 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर व पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वात मंदिर प्रवेश सत्याग्रह सुरू झाला. त्या आधी मंदिर कमेटीला दोनदा अर्ज दिला परंतु तो नामंजूर करण्यात आला. मात्र देवळांचे विश्वस्त दादासाहेब खापर्डे यांनी अस्पृश्यांसाठी देवळात प्रवेश देण्यात येईल असे आश्वासन डॉ बाबासाहेब आंबेडकर व डॉ पंजाबराव देशमुख यांना देण्यात आले. व सत्याग्रह स्थगित करण्यात आला.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 15/8/1936ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली.
स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करण्यात आली त्याच वेळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरनामा मध्येच वर्हाडात प्रांतीक शाखा स्थापन करण्यात येईल असे नमूद करण्यात आले होते. नागपूरचे मजूर पुढारी रावसाहेब आर डबलू फूले यांनी पुढाकार घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पत्र लिहून संमती घेण्यात आली. अनुमती मिळाल्यानंतर रावसाहेब फूले यांनी एल एन हरदास व अमरावतीचे सत्यशोधक विचारांचे डॉ पंजाबराव देशमुख यांच्याशी विचारविनिमय करून कार्यकर्त्यांची बैठक रावसाहेब फुले यांच्या निवासस्थानी बोलाविण्यात आली.ही बैठक 5/11/1936रोजी एस जी नाईक एम एल सी.अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यात मध्यप्रदेश वराड प्रांत शाखा स्थापन करण्यात आली व कार्यकारणी निवडण्यात आली.
डॉ पंजाबराव देशमुख अध्यक्ष सिताराम हाडके कार्याध्यक्ष एल एन हरदास मुख्य कार्यवाह अँड आर डबलू फूले व रेवाराम कवाडे कार्यवाह विठू फकिरा रंगारी खजिनदार पक्षाचे कार्यालय अँड आर डबलू फूले यांचे निवासस्थान वाकर रोड नागपूर येथे राहील.
मध्यप्रांत डिप्रेस्ड क्लासेसच्या फेडरेशनच्या पारलामेटरी बोर्डाची बैठक18/10/1936 मध्ये निवडणूक लढविण्यास सब अमेठी पतीतपावनदास शंभू जी खंडारे बसीलाल रामटेके रेवाराम कवाडे विठ्ठल साळवे अमरावतीचे एल जी नाईक व डॉ पंजाबराव देशमुख यांचे सारखे पुरोगामी स्पृश्य पुढारी
17/2/1937 मध्ये निवडणूक घेण्यात आली.ही निवडणूक काँग्रेसनी प्रतिष्ठेची मानली होती. शेड्युल कास्ट फेडरेशनच्या 15उमेदवार व दोन उमेदवारांना स्वतंत्र मजूर पक्षानी पाठींबा जाहिर केला. त्या पैकी13निवडून आलेलं दोन पाठिंबा दिलेले निवडून आले डॉ बाबासाहेब आंबेडकर मुंबईतुन निवडून आले.
मध्य प्रदेश विदर्भात राखीव जागेबरोबरच खुले जागेवर उमेदवार उभे करण्यात आले. पक्षांची धुरा डॉ पंजाबराव देशमुख सांभाळीत होते. यावेळी डॉ पंजाबराव देशमुख त्याची पत्नी विमलाबाई देशमुख विठ्ठल बंडू जी चौबळ वकील खुल्या जागेवर निवडणुक लढवित होते.
राखीव जागेवर
संभाजी अनुसजी खंडारे अकोला बाळापूर खेडे विभाग
यादवराव पवार चिखलीकर चिंचोली मेहकर
संपत यादोराव नाईक एलीचपूर दर्यापूर मेळघाट
डी के भगत यवतमाळ दार व्हा खेडे विभाग
देवाजी शिवाजी खोब्रागडे चांदा ब्रम्हपुरी
दौलत भिमसेन बारसे छिदवाडा सौसर
केशव नामदेव उर्फ पतितपावन दास हिंगणघाट वर्धा
राघव गंभिर घोडीचोर भंडारा साकोली
रावसाहेब फूले वकील नागपूर मजूर संघाचे वतीने
पंजाबराव देशमुख अमरावती
विठ्ठल बंडू जी चौबळवकील वराड पूर्व विभाग
विमला पंजाबराव देशमुख अकोला अमरावती स्त्री विभाग
रावसाहेब लाला जयनारायण रामटेक तहसिल विभाग
सिताराम पाटील नागपूर उमरेड
एल एन हरदास नागपूर कामठी
15पैकी5उमेदवार निवडुंग आले.
एल एन हरदास
राघोबा जी घोडीचोर
देवाजी शिवाजी खोब्रागडे
डी के भगत
सिताराम पाटील
दशरथ लक्ष्मण पाटील पतीतपावनदास यांना पाडुन अपक्ष निघुन आले हिंगणघाट वर्धा
गणपतराव जाभुळकर छिदवाडा सौसर
यांनी स्वतंत्र मजूर पक्षाला पाठिंबा दिला.
काँग्रेस तर्फे
भटकर एल एस केशव जानुजी खंडारे
गणेश आकाजी गव ई
अमरावती मधून डॉ पंजाबराव देशमुख यांचा चार मतांनी पराभव झाला विमलाबाई देशमुख यांचा दुर्गाबाई जोशी यांनी पराभव केला.
ज्यावेळी भारताचे संविधान तयार करणे सुरू होते त्यावेळी डॉ पंजाबराव देशमुख बाबासाहेब आंबेडकर यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांनी प्रश्न केला की मराठा ओबीसीना आरक्षण दिले किंवा नाही. तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मी बाहेरून येते तोपर्यंत हा मजकूर वाचा.बाबासाहेब बाहेर गेले
पंजाबराव देशमुख यांनी ते वाचले. त्यांच्या डोळ्यात पानी आले.बाबासाहेब आल्यावर त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आभार मानले की त्यांनी मराठा ओबीसी करीता आरक्षणाची तरतुद केली होती.
ही बातमी मराठ्यांना सांगितली तेव्हा मराठयानी मुंबई येथील राजगृहावर मोर्चा नेला व म्हणाले की आम्ही वेड महार नाही आम्ही मराठे आहोत आम्हाला नको आरक्षण . बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला परंतु ते ऐकले नाही. तरी दहा वर्षांनी आयोग नेमण्याची तरतुद केली.जर त्यावेळी थंड डोक्याने विचार केला असता तर आता आरक्षण मागण्याची वेळ आली नसती. डॉ पंजाबराव देशमुख यांची भुमीका ओबीसी मराठा समजू शकले नाही.

विनायकराव जयवंतराव जामगडे
9372456389
7823093556

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!