दि. १९ एप्रिल १९५३; सुर्यपुत्र यशवंत उर्फ भैयासाहेब आंबेडकर व महाउपासिका मीराताई आंबेडकर यांचा मंगल परिणय दिन

भैयासाहेबांचे नारायणराव जाधव मित्र होते. त्या दोघांचे खूप घनिष्ठ संबंध होते. एक दिवस भैय्यासाहेब नारायणराव यांच्या खार येथील घरी गेले असता, त्यांना जेवण करून जाण्याचा आग्रह केला. जेवण वाढण्याचे काम एक नवखी पाहुणी करत होती. अत्यंत शालीनतेने प्रेमळ आग्रह करून तिने सर्वांना जेवन वाढले. जाताना भैय्यासाहेबांनी नारायणराव यांच्याकडे ‘पाहुणी कोण व कुठची’ अशी चौकशी केली. नारायणराव यांच्याकडे आलेले पाहुणे विठ्ठलराव साळवे यांनी आपल्या मुलीला नारायणराव यांच्याकडे ठेवले आणि जाताना म्हणाले, “नारायणराव माझ्या मीरासाठी चांगला वर शोधा. आपण तिचे लवकरच लग्न करायच्या विचारात आहोत.”
यशवंतरावांच्या लग्नाची तयारी सुरू झाली.शंकरानंद शास्त्री यांना लग्नासाठी उपस्थित राहून बौद्ध पद्धतीने लग्न लावण्याची सूचना बाबासाहेबांनी केली होती. बाबासाहेब एक दिवस अगोदरच मुंबईला पोहोचले होते.
दोघांचा विवाह १९ एप्रिल १९५३ ला आर.एम.भट हायस्कूल येथे संपन्न झाला. हा विवाह बौद्ध पद्धतीने शंकरानंद शास्त्री यांनी पाली भाषेतील गाथा म्हणून लावला. यावेळी १९५३ साली बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला नव्हता. परंतु बौद्ध धर्म स्वीकारायचा हे ठरले होते. वडिलांच्या आज्ञेनुसार भैयासाहेबांचा विवाह बौद्ध पद्धतीने संपन्न झाला.
(संदर्भ-लोकनेते भैय्यासाहेब आंबेडकर, लेखक- प्रा. प्रकाश जंजाळ, पान नं.७४.)
संकलन- आयु. प्रशांत चव्हाण सर.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत