आम्हाला फक्त समाजातच अस्पृश्य म्हणून वागवलं जात नाही, तर राजकारणातही – प्रकाश आंबेडकरांचा घणाघात


प्रकाश आंबेडकर म्हणाले, “आम्हाला फक्त समाजातच अस्पृश्य म्हणून वागवलं जात नाही, तर राजकारणातही अस्पृश्य म्हणूनच वागवलं जातं. भाजपा-आरएसएसचा उगम होताच सनातन धर्म मानणारे आणि त्याचे प्रचारक असणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघेही राजकारणात अस्पृश्यता पाळायला लागले आहेत.” वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत सहभागी न करून घेतल्याने वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे.
काँग्रेसच्या नेतृत्वात देशभरातील विरोधी पक्षांनी मोदी सरकारला टक्कर देण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीची स्थापना केली. मात्र, काही पक्षांना या आघाडीत सहभागासाठी निमंत्रणच न दिल्याने काँग्रेसवर सडकून टीकाही होत आहे. महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत सहभागी न करून घेतल्याने वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वेळोवेळी टीका केली. आता प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी शुक्रवारी (८ सप्टेंबर) एक ट्वीट करत भूमिका मांडली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत