महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांचा २३२८ वा जन्मोत्सव त्रिरश्मी बुद्ध लेणी , नाशिक येथे वैचारीक पद्धतीने मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा


नाशिक : सालाबादप्रमाणे यंदाही महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांचा जन्मोत्सव महान चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती महोत्सव समिती मार्फत नाशिक मध्ये विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडवू शकत नाही, आणि म्हणूनच जो दैदिप्यमान इतिहास महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या स्वरूपात या भारत देशाला लाभला आहे त्यांना विसरून कसे चालेल? आणि म्हणूनच महान चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती महोत्सव समिती गेल्या ९-१० वर्षांपासून महान चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती महोत्सव मोठ्या धुमधडाक्यात थाटात साजरा करत असते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधान निर्मितीत अमूल्य योगदान देत महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांची चार सिंह असलेली राजमुद्रा (अशोक स्तंभ), भारत देशाचे आताचे सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य, सम्राट अशोकांचे अशोक चक्र राष्ट्रीय ध्वजावर दिले, सैन्यात दिला जाणारा सर्वोच्च शौर्य पुरस्कार अशोक चक्र, सम्राट अशोकांच्या काळात असणारी व्यवस्थापन प्रणाली या व अशा अनेक बाबी त्यांनी या देशाला दिल्या व म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांना आपल्या अनन्यसाधारण अश्या कृतीतून ही सर्व प्रतिके विचार देऊन जोपर्यंत हा देश आहे तोवर ही आदरांजली वाहण्याचे महान कार्य त्यांनी आपल्या कृतीतून केले.
आणि म्हणूनच संपुर्ण जग जसे बुद्ध पौर्णिमा जयंती, आंबेडकर जयंती साजरी करते अगदी तसेच महान चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती साजरी करणे आपले आद्य कर्तव्य समजून गेल्या ९-१० वर्षांपासून महान चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती महोत्सव समिती सम्राट अशोक जयंती मोठ्या धुमधडाक्यात थाटाने साजरी करते, आणि हेच सातत्य बघत आता समितीला मध्य प्रदेश, सुरत अश्या बाहेर राज्यांमधून ही संपर्क होऊ लागला आहे व जयंती साजरी कशी करावी या साठी तिथे ही मार्गदर्शन करण्याची संधी मिळत आहे.
ज्या महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी आपली संपूर्ण संपत्ती, आपली मुले माता संघमित्रा व महामहेंद्र यांना धम्माच्या प्रचार प्रसार करण्यासाठी दान दिले व संपूर्ण जगात बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार केला त्यांना जयंती मार्फत अभिवादन करणे हे समिती आपले आद्य कर्तव समजतेच सोबतच दर वर्षी हा जयंती महोत्सव मोठा लोकोत्सव कसा होईल यासाठी प्रयत्नशील राहून वर्षभर कार्य करते.
महान चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती महोत्सव शहरातला मुख्य चौक अशोक स्तंभ येथे सर्वांनी एकत्र येत संपूर्ण स्तंभ पंचशील ध्वज, फुले, हार यांनी सजवण्यात आला नंतर महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या प्रतिमेला दस्तुरखुद्द संतोष आंभोरे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व सर्व उपस्थितांना त्रिसरण पंचशिल पुज्यनीय. भिक्खू भंते धम्मरक्षित यांच्या तर्फे देण्यात आले व कार्यक्रमाला सुरुवात झाली. संपूर्ण शहरातल्या भीम जयंती महोत्सव प्रमुख, सर्व बुद्ध विहरांचे प्रतिनिधींनी महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.
अशोक स्तंभ येथून ज्या रथ, कार आणि बाईक रॅली ची सुरुवात होणार होती त्या रॅली ला भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय संघटक आयु. मोहन भाऊ अढांगळे यांनी ध्वज दाखवून रॅली ला सुरुवात करण्यात आली.
अशोक स्तंभ येथून रॅली पुढे विश्वरत्न. बोधिसत्व. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शालिमार येथील पुतळ्या जवळ येऊन पोहचली तिथे सर्व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करत वाहतूक नियमांचे पालन करीत मुंबई नाका मार्गे त्रिरश्मी बुद्ध लेणी येथे रथ, कार आणि बाईक रॅली पोहचली. ही रथ, कार आणि बाईक रॅली समितीने अतिशय नियोजन पूर्वक सर्व वाहतूक नियमांचे पालन करीत काढली आणि विशेष म्हणजे इतका मोठा मार्ग असून देखील या रॅली मुळे कुठेही वाहतूक यंत्रणा खोळंबली नाही हे विशेष.
दुसऱ्या सत्रात प्रमुख व्याख्याते आ. अतुल भोसेकर सरांसोबात, कॅप्टन कुणाल गायकवाड, दान पारमिता फाऊंडेशन चे आयु. सुनील खरे, प्रविण जाधव व अनिकेत चव्हाण ज्यांनी सर्व कायदेशीर बाबी सांभाळल्या त्यांचा विशेष सन्मान समिती मार्फत करण्यात आला. सोबतच नाशिक मधील प्रमुख विहारांमधील उपस्थित मान्यवरांचे समिती तर्फे स्वागत करण्यात आले.
प्रास्ताविक महान चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती महोत्सव समितीचे संस्थापक दस्तुरखुद्द संतोष आंभोरे यांनी करत असताना जयंती दर वर्षी वेगळ्या तारखेला का, कशी येते हे सांगून, आपण जयंती का साजरी केली पाहिजे? त्याचा समाजात काय आणि कसा फरक पडेल सोबत बदल कसा होईल या विषयी मार्गदर्शन केले.
ज्या महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी ८४ हजार विहारे बांधली त्यांची प्रतिमा आपल्याला विहारात दिसत नाहीत-नव्हती म्हणून महान चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती महोत्सव समिती मार्फत त्रिरश्मी बुद्ध लेणी विहार येथे महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांची भव्य प्रतिमा व स्टँड विहारास दान देण्यात आले.
आ. अतुल भोसेकर सर यांनी महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जीवन कार्यावर सखोल प्रकाश टाकून उपस्थितांना सम्राट अशोक यांची दूरदृष्टी, महानता, कल्पकता, शासनप्रणाली व अनेक पैलु उलगडून सांगितले.
उपासक अनिल गायकवाड यांनी भविष्यात सर्वांच्या साथीने त्रिराश्मी लेणी च्या पायथ्याशी अशोक स्तंभ उभारण्याचा मानस व्यक्त केला.
ज्ञानाची भुक भागवून झाल्यानंतर पोटाची भुक भारतीय पुरातत्व सर्वेक्षण च्या आयु. सलीमभाई पटेल व सहकाऱ्यांनी भोजन दान करून आपली दान पारमिता पूर्ण करून पुण्य अर्जित केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी भारतीय बौद्ध महासभा माजी जिह्वाध्यक्ष भगवान बच्छाव, सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब थोरात, नाशिकरोड़ सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या उपाध्यक्षा सुचित्राताई
गांगुर्डे, सुशिलाताई जोपूळकर, धम्मनायिका महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवीताई शिरसाठ, आंबेडकर स्टडी सेंटरच्या संचालिका रोहिणीताई जाधव, सामाजिक कार्यकत्या ज्योतीताई गायकवाड, धम्मकाया मिशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अनिल बागुल, सचिन गायकवाड, शशी सुलताने, आम्ही सारे नागवंशी बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संविधान गायकवाड, स्वयंदीप समाज प्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष भरत यशवंते, बौद्धाचार्य नानासाहेब केदार, विश्रांत तायडे, अशोक पाटील, वासुदेव लोणारे, सोनकांबळे, संघमित्रा बुद्ध विहाराचे सचिव देविदास जगताप, चारिका फाऊंडेशनचे उपाध्यक्ष सागर रामटेके, मंदाकिनी दाणी, गोकर्णाबाई वानखेडे, सोनालीताई पाठक आदी. सोबतच सहभागी बुद्धविहारे श्रावस्ती बुद्ध विहार अंबडगांव, वैशाली बुद्ध विहार सिंहस्थ नगर, त्रिसरण बुद्धविहार उत्तम नगर, आम्रपाली बुद्ध विहार (राजवाडा ) गंगापूर गांव, संघमित्रा बुद्धविहार, पाथर्डी फाटा, तक्षशिला बुद्ध विहार कामटवाडे आदी, बुद्ध विहारांच्या उपासक उपासिकांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद बनसोडे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रविण जाधव यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिकेत चव्हाण, अक्षय मोरे, किशन आंभोरे, सिद्धार्थ खरे, वैभव काळे, रामेश्वर साबळे, रमेश कदम, किरण कदम, रवींद्र गायकवाड, प्रमोद नरवाडे, प्रभाकर लोखंडे, सुजाता मोरे, अंकित दोंदे, तुषार दोंदे, भगवान बोर्डे, तेजस जोगदंड, भारत यशवंते, नाना केदार, विश्राम तायडे, सोनाली निसर्गन, दीपक अचलखांब, सुरेखा चव्हाण, के एस सोनवणे, सचिन गायकवाड, वासुदेव लोणारे, सागर रामटेके, संदीप मोरे, मारोती घायतडक, नितीन पिंपळीस्कर, ब्रम्हानंद मोरे, सुनील गायकवाड, प्रमोद नरवडे, रमेश हटकर, नितीन पगारे, दिलीप बागुल, एस एस गायकवाड, भास्कर गवळी, नंदा थोरात, संतोष खैरे, माधव कांबळे, प्रतिभा लोंढे, सत्यभामा वाळवंटे, मंगल जाधव, शकुंतला शिनगारे, कोकिळा आराख, आशा पौळ, पंचशिला बोडके, आम्रपाली भोसले, सुप्रिया पौळ, कांता कांबळे, कोकिळा दीपक आदी नाशिक मधून सहभागी झाले होते.
मुंबई, नवी मुंबई, शहापूर, ठाणे येथून देखील जयंती महोत्सवात अरविंद लोंढे, युवराज वाघ, संतोष जाधव, मंगला बोढारे, माधवी शिरसाठ, रोहिणी जाधव, निलिमा बिऱ्हाडे, प्रतिन संसारे आदींनी परिश्रम घेतले व व सहभागी होऊन जयंती महोत्सव लोकोत्सव बनवून तो साजरा केला.
सोबतच ज्ञात अज्ञात अनेक नावे अनेक हात दररोज झटत होते त्या ही सर्वांचा सन्मान समिती मार्फत जयंती मध्ये करण्यात आला.
- महान चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती महोत्सव समिती.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत