शासनकर्ती जमात कशी बनणार ? – आयु. बाळासाहेब ननावरे

बंधूनो जरा वेळ काडा आणि वाचा..
डॉ. बाबासाहेबांनी स्वाभिमान शिकवला. अगदी रसातळाला गेलेल्या समाजाला जागृत करून त्याला राजकीय हक्क दिला मान सनमान दिला . पण काही लोक बाबासाहेबांच नाव घेवून हाजीहाजी करत फिरत आहेत. हे पाहून स्वाभिमानी मानसाला अतिशय दुःख वाटत आहे. ह्या हाजीहाजी करणा-या लोकांना बाबासाहेबांचे अनूयायी म्हणणे बरोबर होणार नाही . आज भारतीय राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे. त्याचा फायदा आंबेडकर वाद्यांनी घेण्याऐवेजी हाजीहाजी करत सुटले आहेत. नुसते आम्हाला हे द्या आम्हाला ते द्या. आम्हाला हे पाहिजे आम्हाला ते पाहिजे. असे वागुन सत्ता मिळत नसते. सत्ता मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो . बाबासाहेबांनी कोणाच्याही पुढे हाजीहाजी केली नाही. परंतु बंधूनो बाबासाहेबांची संतान म्हणवनारे हाजीहाजी करत सुटले आहेत. बाबासाहेबांचे खंड छापत नाही किंवा मुंबईत स्मारक झाले पाहिजे ह्यासाठी भिक मागण्या पेक्षा आपली ताकत निर्माण करा. आपोआपच आपले सर्वकार्य पुर्ण होईल. जेव्हा बहूजन ताकत महाराष्ट्रात मजबूत होती तेव्हा प्रस्थापितांनीच लोकसभेवर चार चार लोक महाराष्ट्रातून पाठीवले आणि विद्यापीठाचे नामांतर ही झटक्यात झाले. हे लक्षात ठेवा .
हे माग ते माग करायचे आणी आमदारकी मंत्रीपद मिळवण्यासाठी प्रस्थापितांच्या पुढे लोटांगण घालायचे हे आंबेडकरी रक्ताला शोभत नाही. स्वाभिमानी बनण्यात समाजाचे आणि तुमचेही हीत आहे.
हिंदू धर्माचे नाव घेऊन देव देवतेवर शिव्या देणे बंद केले पाहिजे. आणी बाबासाहेबांचे नाव घेऊन आंबेडकरादाला संपावयचे आणी मनूवाध्यांना सत्तेचा रास्ता मोकळा करून देवू नका आता समाज शाहाणा झालेला आहे. तुम्हाला निट रास्ता दाखवल्या शिवाय राहणार नाही. ..
धम्म प्रचारक.
बाळासाहेब ननावरे.
जयभीम नमो बुद्धाय
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत