ही केवळ निवडणूक नसून संविधान वाचविण्यासाठी ची अटीतटीची अंतिम लढाई आहे – राहूल गांधी

भाजपा देशात विषमता पसरवू पाहत आहे परंतु देशातील विविधतेचा काँग्रेस स्वीकार करते आणि सर्वांना सोबत घेऊन चालणार आहे ase मत काँग्रेस चे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले.
कन्नूरमध्ये एका भव्य निवडणूक रॅलीला संबोधित करताना त्यांनी वरील विचार मांडले. ते म्हणाले की, लोकसभेची निवडणूक ही कदाचित देशाच्या आधुनिक इतिहासातील पहिलीच अशी निवडणूक असेल, जी देशाची राज्यघटना आणि आपल्या लोकशाही संरचनेशी संबंधित असेल.
आजपर्यंत कोणत्याची राजकीय पक्षाने लोकशाही संपवण्याची, विरोधी पक्ष संपवण्याची, संविधान बदलण्याची भाषा केली नाही परंतु भाजपा देशातील संवेधानिक संरचना धोक्यात आणत आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत