केंद्र सरकार व निवडणूक आयोग या एकाच नाण्याच्या दोन बाजू. – संजय राऊत

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे. आम्हीही निवडणुकांना सामोरे जाऊन परिवर्तनाचा चंग बांधलेला आहे. परंतु निवडणूक आयोगावर जनतेची शंका आहे. कारण त्यांची कार्यपद्धती पाहता ते सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करतात, असं जनतेला वाटतं. त्यामुळे उद्याच्या निवडणुकांत निवडणूक आयोगाने जनतेच्या शंकाचं निरसन करावं, निष्पक्षपणे काम करावं, कायदा सुव्यवस्था आणि पैशांची उधळपट्टी यावर नियंत्रण आणावं.
टी एन शेषन जेव्हा निवडणूक आयुक्त होते, तेव्हा निवडणुकांत घोटाळा, चोऱ्यामाऱ्या होणार नाही, अशी जनतेला खात्री होती परंतु आज निवडणुकांत घोटाळा, चोऱ्यामाऱ्या होणार नाही यात्री खात्री कोण देणार? अशा शब्दात निवडणूक आयोगाला लक्ष्य करीत पारदर्शक निवडणुकांची गॅरेंटी पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतील काय? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी विचारला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत