खान्देश

नाशिक जिल्यात जोरदार पाऊस, सखल भागात पाणीच पाणी.

 

नाशिक दि. ८ : अखेर गेल्या तीन आठवड्यांपासून गायब झालेल्या पावसाने गुरुवारी जोरदार पुनरागमन केले .नाशिकसह जिल्हाभरात पावसाने जोरदार कमबॅक केले आहे त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. तर जिल्ह्यातील शेतीपिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला असून पुढील तीन दिवस पाऊस असल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. 

नाशिक शहरासह ग्रामीण भागातही मुसळधार पावसाच्या सरींनी हजेरी लावल्याने सर्वाना दिलासा मिळाला आहे . पाण्याअभावी मान टाकू लागलेल्या पिकांनाही या पावसामुळे जीवदान मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. काल रात्रीपासून पावसाने सुरुवात केली असून यामुळे खरीप पिकांसाठी दिलासा मिळाला आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून उघडीप दिलेल्या पावसाने नाशिककरांवर आभाळमाया केली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात 8 आणि 9 सप्टेंबरला हवामान विभागाने यलो अलर्टचा इशारा दिला आहे.

यंदा जूनपासून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रत्येक महिन्यात पाऊस सरासरीदेखील गाठू शकलेला नाही. अलनिनो वादळाचा प्रभाव जाणवला. याचा फटका शेती आणि शेतकऱ्यांना बसला. पावसाला विलंब झाल्याने पेरण्याही उशिराने झाल्या. नंतर पुन्हा पाऊस गायब झाला. त्यामुळे मका, सोयाबीन, भात पिकासह खरिपातील बहुतांश पिके जळून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. अखेर गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची आतुरतेने वाट बघणाऱ्या नाशिककरांसाठी हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पावसाचा ‘येलो अलर्ट’ ही गोड बातमी ठरली आहे. गुरुवारी मध्यरात्री 2 वाजेपासून सुरू झालेल्या सरींचा वर्षाव पहाटेपर्यंत जोरात सुरू आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!