दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणसामाजिक / सांस्कृतिक

आले नवे-नवे पाणी!

“पाणी कुठलं साहेब? साधं की बिस्लेरी?”
वेटरनं विचारलं.
बाहेर कुठे रिस्क घेणार? म्हणून म्हणालो, ‘दे बाबा बिस्लेरीच!’
‘बिस्लेरी’ म्हणजे मिनरल वॉटर. ब्रॅंड कुठला असेल, हे काही सांगता येत नाही. पण, कोणतंही ‘मिनरल वॉटर’ म्हणजे ‘बिस्लेरी’च असते!
त्यानं ‘बिस्लेरी’ आणली.
बघतोय तर ब्रॅण्ड वेगळा होता.
वेगळा म्हणजे फारच वेगळा.
कोणता?

बाटलीवर नाव होतं-
20th MARCH

२० मार्च १९२७ ही तर चवदार तळ्याच्या सत्याग्रहाची तारीख.
पाच आंबेडकरवादी तरुणांनी पुण्यात स्थापन केलीय ही कंपनीः 20th March Ventures Pvt Ltd.

सार्वजनिक पाणवठ्यावर ज्यांना पाणीही पिऊ देत नव्हता तुम्ही, त्यांनी आता स्वतःचे शुद्ध पाणवठे उभारलेत आणि सढळपणे, चोख पैसे घेऊन, तुम्हाला पाणी पुरवताहेत!
त्यांची कॅचलाइन आहे-
Respect every Drop
पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं महत्त्व आणखी कोणाला कळावं?

बाटलीबंद पाण्याच्या धंदेवाईकपणाविषयी वा कोणत्याही कंपनीविषयी मी काही बोलणार नाही. इथे मुद्दा आहे तो २० मार्चने दिलेल्या प्रेरणेचा.

क्रांती अशी असते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलंय, हे अशावेळी जाणवतं. कोणाचाही देव करु नये, हे खरं; पण बाबासाहेब ‘देव’ का होतात, हे अशावेळी समजतं! एक नवी सृष्टी जन्माला घातली बाबासाहेबांनी. नवं ‘जीवन’!

उसळत घुसळत फेसाळत
जल धावे दाही दिशांनी
आले नवे नवे पाणी

हे पाणीच वेगळं आहे!

  • संजय आवटे

(‘We The Change- आम्ही भारताचे लोक’ या माझ्या पुस्तकातून.)

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!