महाराष्ट्रमुख्यपानराजकीयशेतीविषयक

“शेतकरी आणि झोपडीधारकांसाठी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय”  

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी गारपिटही झाली. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पिक शेतकऱ्यांच्या हातून निसटून गेले. परिणामी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना या आर्थिक संकटातून बाहेर काढण्याकरता अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. तसंच तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार, अवकाळी पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याकरता तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच, आजच्या बैठकीत झोपडीधारकांना दिलासा मिळेल असाही निर्णय घेण्यात आला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!