मुख्य पान

छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचा लिहीलेला विकृत इतिहास

छत्रपती शिवाजी महाराज बहुजनांचे प्रेरणास्थान होते. ब्रिटिश कागदपत्रात अशी माहिती मिळते की, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज रणभूमीत आहे हे कळताच सैन्यात कमालीचा उत्साह येत असे. छत्रपती शिवाजी महाराज युध्दभूमीत कधीच कोणाला शरण गेले नाही. मात्र त्यांना ब्राह्मणांनी छळले. जेवढे त्यांच्या ह्यातीत छळले नसेल तेवढे त्यांच्या मूत्मूनंतर पुणेरी भटांनी त्यांचा खोटा-नाटा इतिहास लिहून छळले. यापैकी “रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई, वि.का.राजवाडे, टिळक हे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी दोन राज्यभिषेक केले. ब्राह्मण दुसर्या राज्यभिषेकाबद्दल का बोलत नाही ? कारण तो शाक्त अथवा शाक्य परंपरेने, बौद्ध परंपरेने झाला होता म्हणून ? ब्राह्मणांनी आपल्या सोईचा, ब्राह्मणांना अनुकूल असा इतिहास लिहीलेला आहे. ‘मराठी रियासत’ मध्ये रामदासांचे एवढे उदात्तीकरण केले आहे की, असे चित्र भासविले आहे की, जर का रामदास नसता तर शिवाजीचे काय झाले असते ? छत्रपती शिवाजी महाराजांचे फार योजनापूर्वक ब्राह्मणीकरण केले गेले त्याची मुहूर्तमेढ ही बाळ गंगाधर टिळक यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा शेवट हा घातपातानेच झाला असे काही इतिहास अभ्यासक मानतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा घातपात मंत्री मंडळातील पेशवा कोकणस्थ ब्राह्मणांनी केला. पण ते पाप लपविण्यासाठी सूड उगवला छत्रपती संभाजी महाराजांवर ! छत्रपती संभाजी महाराजांना वेळोवेळी चरित्रहीन ठरविण्यासाठी या ब्राम्हणांनी त्यांच्या मूत्यूच्या १६० वर्षानंतर बनावट बखरी लिहील्या. बखरी या इतिहासाचे साधन नसतात. पण बखरींनाच इतिहास सांगून छत्रपती संभाजी महाराजांची यथेच्छ बदनामी करण्यात आली. मुलगा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज बिघडलेला आहे अशा तोर्यात सरदेसाई नावाच्या भटाने वर्णन केलेले आहे. वास्तविक पाहता हा ब्राह्मणीद्वेष आहे. ही बदनामी केवळ छत्रपती संभाजी महाराजांचीच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांची पण आहे. छत्रपती संभाजी महाराज हे फार वाईट आहेत असे ग्रूहीत धरुनच भटांनी इतिहास लिहिला. कारण सरदेसाई मुळेच छत्रपती संभाजी महाराजांची फार मोठ्या प्रमाणात बदनामी करण्यात आली. सरदेसाईने भाकडकथांना, दंतकथांचा इतिहास सांगून छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी केली. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांने औरंगजेबाच्या कैदेतून अकल्पित रीतीने आपली सुटका करुन घेतली, त्यांची अक्कल प्रत्यक्ष पोटच्या पुत्रापुढे गुंग व्हावी आणि त्या चिंतेतच त्यास मरण यावे यापेक्षा दुसरा खेदकर दैवदुर्विलास कोणता ! जगाच्या रहाटीत थोर पुरुषांच्या नशिबात थोरच दु:खे लिहीलेली असतात. अशा तर्हेने बखरीत लिहिलेल्या भटी भाकडकथांना इतिहास सांगून सरदेसाईने छत्रपती शिवाजी महाराजांचे ब्राह्मणीकरण केले व त्यासोबतच छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्रहनन केले.
वास्तविकरित्या सरदेसाई पेशव्यांची रियासत लिहायला हवी होती. पण ते काय लिहीणार की, पेशवे रंडीबाज, बदफैली, क्रुर, स्वार्थी आणि षड्यंत्रकारी हे लिहायचे ? पेशव्यांच्या पापांना झाकण्यासाठी सूर्यालाच दोष देण्याचे पाप सरदेसाईने केले.
खरा छत्रपती संभाजी महाराज १९६० च्या पुढे आले ते म्हणजे वा.सी.बेंद्रे यांचे लिखाणातून सरदेसाईने हा अपप्रचार केला की, “संभाजीने बापास विषप्रयोग केला अशा प्रकारचे तर्कवितर्क चालू झाले.” या छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी करणार्या थोर इतिहासकारास १९५९ ला तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूने सरदेसाईला पद्मभूषण पुरस्कारही दिला. कशासाठी तर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम केले याबद्दल बक्षीस ! संभाजीने आपल्याला जहर दिले यामुळेच उद्विग्न होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या राज्याची भिक्षा समर्थास घातली आणि सातारा किल्ल्यावरुन परळीच्या किल्यावर समर्थाशी त्यांनी संभाषण केले वगैरे या दंतकथा आहेत, विशेषत: त्यांचा पुत्र ‘संभाजी’ दुर्वत्त निघाला, त्याजवर इतराजी झाली, त्यास श्रूंगारपुरी ठेविले’ असे उल्लेख आहेत, हेच कारण शिवाजींच्या उद्विग्नतेचे असावे आणि त्यामुळे बाहेर भलत्यासलत्या बातम्या उठल्या.”
पुढे मराठी रियासत खंड २ मध्ये बापाच्या विरोधात संभाजी वागला, दुराचारी झाला असे लिहिले. “मुलाच्या दुर्वर्तनामुळे शिवाजीची बुद्धी देखील कुंठित झाली आणि त्यास मूत्यूही विमनस्क स्थितीत झाला.” छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची षडयंत्रपूर्वक ही केलेली बदनामीच होय. सरदेसाई, पारनिस ही भट मंडळी लुटणारी आहे हे कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज जाणत होते. मुद्दा हा आहे की, जे ब्राह्मण आज इतिहास म्हणून पुढे करतात तो खरा इतिहास नाही. किरण छत्रपती संभाजी महाराज व सावत्र आई सोयराबाई यांचे कोणतेही वैर नव्हते पण त्यातही बनावट कहाण्या रचल्या. त्या बनावट कहाण्या बनविण्यात सरदेसाई प्रथम स्थानी होता. छत्रपती संभाजी महाराज हे चारित्र्यसंपन्न, कर्तूत्ववान पुत्र, पित्याबद्दल नितांत आदर, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय समज असलेला कर्तूत्ववान व्यक्तीमत्व होते. पोर्तुगीज दस्तऐवजात पोर्तुगीज लिहितात की, छत्रपती संभाजी महाराज यांना गंडविणे शक्य नाही, त्यांच्याशी सावधगिरीनेच वागायला हवे. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अनेक काल्पनिक स्त्रियाची नावे जोडून भटांनी यथेच्छ बदनामी केली. एवढेच काय तर औरंगजेबाच्या पन्नाशी गाठलेल्या मातेसमान असलेल्या महिलेशी संबंध जोडले. जेबुनिस्सा अखेरपर्यंत महाराष्ट्रात कधीच आली नाही. किती विक्रूत मानसिकता म्हणायची ही ! सरदेसाई व कुरुंदकरने तर संभाजी आठ वर्षांच्या वयापासुन त्यास वाईट सवयी लागल्या होत्या अशा घाणेरड्या व खोट्या बाबी लिहीलेल्या आहेत.

सदर लेखातील संदर्भ हे भटमान्य टिळक विरुद्ध छत्रपती शाहू महाराज एक ऐतिहासिक संघर्ष यातून घेतलेले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा, जय शिवराय, जय भीम

सोनू ईश्वरदासजी कांबळे
वर्धा

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!