दिन विशेषदेश-विदेशमहाराष्ट्रमुख्य पानमुख्यपानविचारपीठ

शिवबांच्या स्वराज्याचे स्वप्न राजकारण्यानी भंग केले.!!

———-लेखन. संतोष कांबळे।

शिवबा तुमच्या जन्माने या महाराष्ट्राची माती पवित्र झाली अनं सह्माद्रिच्या पर्वत रांगांची उंची उतुंग झाली. दऱ्याखोऱ्यात गर्जना झाली जय भवानी .जय शिवाजी..! अनं इथला रयत सुखावला, तुम्ही माता -बहिणीला वाघीण केले.घाम गाळणाऱ्या बळीराजाच्या शेतात सोन्याचा नांगर लावला , त्याचा जुलमी शेतसारा माफ केला, आणि त्याला समृद्धी दिली. कारण तुमचे स्वप्न होते प्रामाणिक स्वराज्याचे,,जनतेच्या हिताचे. आणि म्हणून तुम्ही ‘पण’ केला हिंदवी स्वराज्याचा .शिवबा तुमची विचारधारा प्रगल्भ होती. कारण तुम्हाला इथल्या मातीची”आन” होती आणि सामान्य जनता हि तुमच्या साठी शान होती. शिवबा तुम्ही खूप प्राण पणाने स्वराज्याचा झेंडा सह्माद्रिच्या छातीवर रोवला पण तुमच्या नंतर तुमच्या नावाच्या गर्जना देत जन्माला आलेली राजकीय “फितुरं” शत्रू पेक्षा ही नीच ,आणि स्वार्थी निघाली .तुम्ही तुमचा गणिमी कावा शत्रूनां पराभूत करण्यासाठी अमलात आणला .पण राजे शिवबा इथे तुमच्या स्वराज्यात सगळे राजकारणी लांडग्यांच्या कळपात असल्या गत माणूस पण हारवून बसले. तुम्ही सोन्याचा नांगर दिलेला बळीराजा आज नागवा झालाय , रोज एक माता आपल्या कुंकवाला पोरकी होत आहे .कर्जाच्या ओझात रोज एक पोशिंदा राजा ‘बळी’पडत आहे . आया -बहिणी वर अत्याचार केले जात आहेत. आई -बाप वृधाश्रमात आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या लेकी कुंटणखाण्याच्या दारात विकल्या जात आहेत. आजही पुस्तकात डोकवणारे वय असलेली लेकरं-बाळ पोटासाठी उसाच्या फडात कोयता घेऊन नसीबाचा पाचोळा गोळा करत आहेत . आणि सामान्य माणसाच्या मतावर मोठी झालेली नेते मंडळी चिरेबंदी वाड्याच्या ढाळजात कुञाला मेवा खायला घालत आहेत . आणि याच राज्यात डोंबाऱ्याची लेकरं अजून तारेवरच नसीबाला फास देत आहेत. आणि निरलर्यज्य राजकारण्यांची शानदार पोरं मात्र आया -बहिणीची इज्जत काढुण एकमेकांना घोडे लावत आहेत.आणि पुन्हा तेच तुमच्या नावाचा जयघोष करायला तुमच्या स्वराज्याचे वारसदार म्हणून तयार. शिवबा आता तुमच्या राज्यात सगळे ठेकेदार स्वराज्याचे शिलेदार झाले आहेत ,तुमच्या पायाची धुळ लावायची ज्यांची लायकी नाही ते सुद्धा तुमच्या सोबत सेल्फी घेण्याची गुत्तेदारी करू लागले आहेत . शिवबा तुम्ही रक्ताचे पाणी करून उभे केलेले स्वराज्य राजकीय आखाडयात इथल्या नेत्यांनी स्वार्थापोटी “बोली”लावून लुटले आहे .म्हणून वाटते शिवबा तुमच्या स्वप्नांचा भंग झाला .आणि लबाड नेता मात्र आयत्या स्वराज्याचा सुभेदार झाला ।।विद्रोही लेखक संतोष कांबळे.8999180009——–///——————////——

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!