युवकांनी आंबेडकरी चळवळीत सक्रिय झाले पाहिजे : प्रा. तुपेरे

महार वतनदार परिषदेचा ९६ वा वर्धापन दिन उत्साहात
सोलापूर : डॉ. आंबेडकर आणि सोलापूर यांच्यात अतूट ऋणानुबंध होते. युवकांनी फुले – शाहू – आंबेडकर चळवळीत काम करताना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, आदर्श विचार समजून घेतले पाहिजे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेऊन चळवळीत युवकांनी सक्रिय झाले पाहिजे, असे आवाहन
प्रा. डॉ.सरिपुत्र तुपेरे यांनी केले.
दि. २६ व २७ नोव्हेंबर १९२७ रोजी थोरला महारवाडा सोलापूर येथे सोलापूर जिल्हा महार वतनदार परिषदेचे दुसरे अधिवेशन डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते. त्याच अधिवेशनाचा ९६ वा वर्षपूर्ती सोहळा समस्त महार वतनदार ट्रस्ट व थोरला राजवाडा मिलिंद नगर बुधवार पेठ यांच्या वतीने
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार मिलिंद नगर बुधवार पेठ येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी तहसीलदार बी.के.तळभंडारे हे होते.
यावेळी प्रा. डॉ.सरिपुत्र तुपेरे यांनी सोलापुरात पार पडलेल्या महार वतन परिषदेच्या अधिवेशनाची माहिती दिली. अधिवेशनात संपन्न झालेल्यां संवादाचे दाखले देत डॉ. आंबेडकर आणि सोलापूर यांचे ऋणानुबंध सांगितले. डॉ. आंबेडकर यांनी सोलापुरात केलेल्या कार्याची माहिती विशद केली. मिलिंद नगरचे आंबेडकरी चळवळीतील योगदान महत्वपूर्ण आहे. मिलिंद नगर हे चळवळीतील क्रांतीचे ठिकाण आहे असे सांगत समस्त महार वतनदार ट्रस्ट मधील युवकांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जेष्ठ नेते आणि ट्रस्टचे प्रमुख राजाभाऊ सरवदे यांनी ९६ वर्षांपूर्वी झालेल्या महार वतन परिषदेतील संवाद आणि परिषदेतील आठवणींना उजाळा दिला.
जेष्ठ नेते व ट्रस्टचे प्रमुख सुभानजी बनसोडे यांनी सोलापूर हे फक्त चळवळीचे नसुन वैचारिक क्रांतीचे शहर आहे असे उद्गार काढत उपस्थितांना बाबासाहेबांना सोलापुरातील अनुयायांकडुन काय अपेक्षित होते आणि आता आंबेडकरी चळवळीस काय अपेक्षित आहे. डाॅ.आंबेडकर यांना अभिप्रेत असणारा समाज आपण कसा घडवू शकतो याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी युवा वक्ते आनंद मसलखांब व नागेश रणखांबे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठ वतनदार उत्तम आबुटे, बापू तळमोहिते, विकास सरवदे, शशिकांत तळमोहिते, संजय बाबरे यांची उपस्थिती होती. प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिस मनोभावे वंदन करण्यात आले. बुद्ध,शिव,फुले,शाहू, आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली.
सूत्रसंचालन सुशील सरवदे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवम सोनकांबळे, प्रवीण तळभंडारे, श्रीनिवास सरवदे, समाधान आबुटे, मयूर तळभंडारे, अतुल सोनकांबळे, अनिकेत आबुटे,अजित सरवदे, विकी तळभंडारे, पंकज बाबरे,आदेश तळभंडारे, रोहित तळमोहिते, साक्षांत बनसोडे आदींनी परिश्रम घेतले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत