
भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार देशाच्या विविध भागातून दिल्लीला जाणाऱ्या ११ रेल्वे गाड्या आज विलंबाने धावत आहेत. देशाच्या उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट कायम आहे. दाट धुक्यामुळे कमी झालेल्या दृश्यमानतेमुळे रेल्वे आणि हवाई वाहतूक विस्कळीत झाली आहे. दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थान,उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश आणि बिहारमधील तुरळक ठिकाणी दाट धुक्याची नोंद झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. आज सकाळी देखील दिल्लीला धुक्याने लपेटले असून पहाटे साडेपाच वाजता दिल्लीचं किमान तापमान ६ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेले. पुढच्या दोन दिवसांत उत्तर भारतात दाट धुकं कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत