बौद्ध समाजाची लग्न उशिरा लागण्याची करणे.

लग्न विधी वेळेवर लावण्यात बौद्ध समाज पूर्णपणे अपयशी
बौद्ध समाजाची लग्ने वेळेवर लागत नाहीत ही मोठी शोकांतिका निर्माण झालेली आहे
अपवाद वगळता बहुसंख्य लग्न 3 वाजेनन्तर लावली जातात त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात, समाजातील बेशिस्त दिसून येते.इतर जातीसमुदायला हेच हवे असते व ते म्हणायला तयार होतात हे अजूनही सुधारलेले नाहीत.
बौद्ध समाजाचे लग्न आहे का ?मग आपण दुसरे दोन ,तीन लग्न आटोपून परत येऊ शकतो असे काही सवर्ण मित्र मंडळी कुत्सितपणे म्हणते तेव्हा मनाला वेदना होतात.
याला जबाबदार आपणच आहोत हे मान्य करावेच लागेल.
आपला विधी सर्वांना आवडतो ही जरी जमेची बाजू असली तरी लग्न खूपच उशिरा लागणे ही खेदाची बाब आहे हे मान्य करावे लागते.
आपल्या लोकांची लग्न उशिरा लागण्याची करणे.
1-लग्नाच्या आदल्या दिवशी खूप उशिरा पर्यत नाच गाणं चालणे (त्यात धम्माने वर्ज्य केलेले मद्यपी )यांना आवर न घालणे,मग आपोआप उशीर होतो हिच पाहुणे मंडळी सकाळी खूपच उशिरा म्हणजे 9 ते 10 वाजता उठते मग ते तयारी करतात त्यात 12 वाजतात मग पुढचे नियोजन पूर्ण विस्कळीत होते.
2-वराकडील किंवा वधू कडील मंडळी दुसऱ्या गावाहून येत असेल तेही खूप उशिरा पोहचतात त्यांच्यात समन्वय अजिबात नसतो.
3-बँड ,डीजे वाल्याला नाचतांना थांबवणारे जास्त व मंडपात घेऊन जायला सांगणारे कमी असतात.
4-लग्न मंडप व नवरदेव(वर)उतरण्याचे किंवा थांबण्याचे ठिकाण जवळ न ठेवता नाचणाऱ्या लोकांसाठी लांब ठेवलेले असत्ते मग आपोआप उशीर होतो.
आपल्यात सर्वच साहेब आणि साहेबिनी झालेल्या असतात म्हणून जबाबदारी घेणारे खूपच कमी असतात,म्हणजे बघ्याची भूमिका घेणारे आणि नाव ठेवणारे जास्त आढळतात.म्हणून उशीर होतो
5-बहुतांश लग्न बौद्धचार्य फार कमी पैशात किंवा फुकट लावतात त्यामुळे विधी नगण्य मानला जातो.बौद्धचार्य ला लग्नासाठी निमंत्रित केले जाते पण पाहिजे तशी व्यवस्था केली जात नाही धम्मदान देतांना जीवावर येते.
6-पांढरा पोशाख बदलण्याची ऐनवेळी धावपळ होते तेव्हा वेळ जातो.वर घोड्यावर येतांना वेगळा पोशाख परिधान करतो व नंतर पांढरा बदलतो त्यात वेळ जातो
7-ऐनवेळी मंगलसुत्त शोधले जाते त्यात वेळ जातो.
8वधू ,वरचे मातापिता यांना धम्ममंचकावर बोलवले जाते त्यावेळेस त्यांना यायला बराच उशीर होतो.
आपण मुहूर्त पाहत नाही म्हणतात आणि हिंदूंच्या मुहूर्त तारखा बघून त्याच तारखा आपले लोकं लग्न तारखा ठरवतात त्यामुळे सगळ्या गोष्टी महाग घ्याव्या लागतात.
9-सुयोग्य नियोजनाचा अभाव आढळतो.म्हणून लग्न उशिरा लागतात
10-वाढपिंकडे कोणीही लक्ष देणारा नसतो त्यामुळे त्यांच्यात वाढतांना सातत्य नसते.
अशी अनेक कारण आहेत त्यामुळे आपल्या लग्न समारंभाला उशीर होतो.
म्हणून योग्य उपाय करणे गरजेचे आहे
विवाहस्थळी दोन्ही पक्षांनी वेळेवर पोहचणे (मग ते कोणत्याही गावाहून येणारे असोत) आवश्यक आहे.
नवरदेव उतरतो त्याठिकाणी शेवया, कुरडया इत्यादि खाद्यपदार्थ आणून खाऊ घालणे बंद केले पाहिजे
म्हणजे वेळेची बचत होईल.त्यांना लग्न लागल्यानंतर च जेवण दिले पाहिजे.
सुक्या नावाचा प्रकार व त्यातील रुसवे फुगवे बंद केले पाहिजे.
घोडा सिस्टीम बंद करून डायरेक्ट मंडपात च वधू -वर यांचा विवाह लावला तर फारच वेळ वाचेल.
वधू किंवा वर पक्षाने लग्नाअगोदर आपले भाऊबंदकी किंवा विश्वासू 10,12 मित्रांची मिटिंग घेऊन वेगवेगळ्या कामांवर जातीने लक्ष ठेवण्यासाठी नेमले ,पाहिजे म्हणजे कामांचे वाटप झाले पाहिजे जेणेकरून सर्व कामे व लग्न वेळे वर लागेल.
आपल्या लग्नात 2,4 मद्यपी व भांडखोर नातेवाईक असतातच त्यांना कितीही जवळचा असला तरी लग्नात आमंत्रित करु नये ,त्याचा राग त्याच्याकडे राहु द्यावा.
लग्न वेळेवर लागण्यासाठी भन्तेजी किंवा बौद्धचार्य यांनी दोघ पक्षांकडून धम्मदान निश्चित घ्यावे,उशीर झाल्यास लग्न लावण्यास स्पष्ट नकार द्यावा तर समाजातील बेशिस्त दूर होईल.
अशा व इतर काही उपाययोजना केल्यास विवाह वेळेवर लागतील व इतरांचा आपल्या बाबतीत दृष्टिकोन सकारात्मक होईल
आपल्याला काय वाटते
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत