
तेलंगणा विधानसभेच्या 119 जागांसाठी काल मतदान पार पडलं. राज्यातील सर्व जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडलं. तेलंगणा विधानसभेच्या 119 जागांसाठी 2290 उमेदवारांनी आपलं नशीब आजमलं आहे. तेलंगणा राज्याची निर्मिती 2014 साली झाली. तेव्हापासून दोनवेळा झालेल्या निवडणुकीत भारतीय राष्ट्र समिती अर्थात बीआरएस पक्षाला यश मिळालं आहे. बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव तेलंगणाचे पहिले आणि दुसरे मुख्यमंत्री बनले आहेत. त्यानंतर आता के. चंद्रशेखर राव (केसीआर) पुन्हा तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाचा मान मिळवतात का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आकडेवारीनुसार काँग्रेस आणि बीआरएस पक्षामध्ये काँटे की टक्कर बघायला मिळत आहे. तर भाजप हा पक्ष तीन नंबरला असण्याची शक्यता आहे.
एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार तेलंगणात काँग्रेस आणि बीआरएसमध्ये काट्याची टक्के बघायला मिळणार आहे. तर काँग्रेस हा तीन नंबरचा पक्ष ठरणार आहे. पॉलस्ट्रेटच्या पोलनुसार, बीआरएस पक्षाला 48 ते 58 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 49 ते 59 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 5 ते 10 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच एमआयएम पक्षाला 6 ते 8 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत