
काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केली आहे. तसेच भाजपावर आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. सगळ्या देशात राम मंदिराचा ट्रेंड आहे, जो माझ्यासाठी त्रासदायक आहे असेही सॅम पित्रोदा यांनी म्हटले आहे. राम मंदिरात होणारी प्राणप्रतिष्ठा आणि उद्घाटनाची तयारी यामुळे धर्माला जास्त महत्त्व दिले आहे असे म्हणत त्यांनी या सगळ्या गोष्टींबाबत चिंता व्यक्त केली आहे. सॅम पित्रोदा म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे त्यांचा जास्तीत जास्त वेळ मंदिरांमध्ये घालवत आहेत. याच गोष्टीची मला चिंता वाटते. मला वाटते त्यांनी शाळांमध्ये वेळ घालवला पाहिजे, विज्ञान केंद्रांमध्ये गेले पाहिजे तसेच वारंवार मंदिरांमध्यल्या फेऱ्या थांबवल्या पाहिजेत. देशात धर्माला जास्त महत्त्व दिले जात आहे. मात्र काय महत्त्वाचे आहे? राम मंदिर की बेरोजगारी?
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकशाहीची मूल्ये कमी करीत आहेत. १० वर्षे ते प्रधानमंत्री आहेत मात्र त्यांनी अद्यापपर्यंत एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. मला या गोष्टीची चिंता वाटते आहे. आपला देश चुकीच्या दिशेने चालला आहे किंवा भरकटतो आहे म्हणेन धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रत्र आहे. राष्ट्रीय अजेंडा म्हणून वापरले चुकीचे आहे. देशाचा अजेंडा शिक्षण, रोजगार, विकास, अर्थव्यवस्था, महागाई, आरोग्यसेवा, पर्यावरण, प्रदूषण निर्मूलन हा पाहिजे याच मूल्यांच्या तुम्ही एका आधुनिक निर्मिती करु शकता. मला गोष्टीशी काही घेणेदेणे नाही तुम्ही कुठला धर्म मानता?
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत