साद घालतो कबीर

सत्य…..या सत्याच्या शोधासाठी अनेक धर्मसंस्थापकांनी,विचारवंतानी आपले आयुष्य खर्ची घातले.महात्मा फुल्यांनी तर आपल्या धर्माचे नावच “सत्यशोधक समाज”ठेवले. “सार्वजनिक सत्यधर्म” या ग्रंथात पानोपानी सत्य म्हणजे काय हे महात्मा फुल्यांनी सांगितले आहे.
सत्याविण नाही धर्म तो रोकडा
जनांशी वाकडा //मतभेद
सत्य तोच धर्म करावा कायम
मानवा आराम //सर्व ठायी
मानवांचा धर्म सत्य हीच नीती
बाकीची कुनीती //जोती म्हणे
कबिरांनी सत्याचा जोरदार पुरस्कार केलेला आहे.
सॉंच बराबर तप नही
झूठ बराबर पाप
ज्याके हिरदे सॉंच हैं
ता हिरदे गुरू आप
सत्यासारखं तप नाही आणि असत्यासारखं पाप नाही. ज्याच्या हृदयात सत्य आहे त्याच्या हृदयात सद्गुरु असतो.
सॉंचे श्राप न लागई
सॉंचे काल न खाय
सॉंचे को सॉंचा मिले
सॉंचेमाहि समाय
सत्याला कोणताच शाप लागत नसतो. सत्याला काळाचे भय नसते.सत्य सत्याला भेटते आणि सत्य सत्यातच सामावून जाते.
प्राचार्य वसंत वावरे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत